Bihar : नालंदा मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

Bihar :बिहारमधील नालंदा जिल्ह्यात आज मोठी दुर्घटना घडली. शीतला देवी मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत 8 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारामुळे सकाळपासूनच मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. दर्शन आटोपल्यानंतर बाहेर पडताना अचानक धक्काबुक्की सुरू झाली आणि काही क्षणांतच परिस्थिती बेकाबू झाली. यात अनेकजण एकमेकांवर पडले आणि जीव वाचवण्यासाठी आक्रोश सुरू झाला.

 

प्रत्यक्षदर्शींच्या मते, सुरुवातीला किरकोळ गोंधळ झाला, मात्र गर्दी वाढत गेल्याने चेंगराचेंगरी झाली. काही भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले.

तातडीने बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना नालंदा सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हलवण्याची तयारी सुरू आहे.

परिसर सील, चौकशीचे आदेश
प्रशासनाने मंदिर परिसर रिकामा करून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

निष्काळजीपणाचा आरोप प्राथमिक माहितीनुसार , गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सध्या बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *