
Pune : चैत्र वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी संस्थानची महत्त्वाची बैठक पार पडली असून आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. राज्यभरातील वारकरी आणि भाविक ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात, त्या पालखीचे यंदा ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
दरम्यान, पालखीच्या पुण्यातील मुक्कामाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. पारंपरिकरित्या १८ दिवसांच्या या प्रवासात पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. मात्र, यंदा दिंडी समाजाच्या बैठकीत काही अडचणी मांडण्यात आल्या. गेल्या वर्षी भवानी पेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने अनेक दिंड्यांना पालखीपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. यामुळे मुक्कामाची जागा बदलण्याची मागणी पुढे आली.
या पार्श्वभूमीवर भवानी पेठेऐवजी वडकी नाला येथे मुक्काम ठेवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र, या निर्णयाला स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकरी संप्रदायाकडून विरोध होत आहे.
भवानी पेठ व्यापारी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचवडे आणि केदारेश्वर विठ्ठल मंदिर (गणेश पेठ) येथील गोपी घोरपडे यांनी याबाबत पत्र देत निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा भवानी पेठेतच पार पडतो आणि संपूर्ण पुणे शहर या दोन दिवसांत भक्तीमय वातावरणात रंगून जाते.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पालखी मुक्कामाच्या काळात सर्व समाजघटक—युवक, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्था, मंडळे आणि सर्व धर्मीय नागरिक—भक्तिभावाने सेवा करतात. तसेच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या जवळ असल्याने भाविकांना दर्शन सोपे होते.
मुक्काम स्थलांतराच्या चर्चेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली असून “हा ऐतिहासिक व भावनिक सोहळा बदलू नये” अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे. गरज असल्यास सोहळ्याचा कालावधी वाढवावा, मात्र पुण्यातील पारंपरिक कार्यक्रमात बदल करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सध्या या मुद्द्यावर अंतिम निर्णय काय होणार, याकडे वारकरी आणि पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




