महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता बिहारमधून जेरबंद; महिनाभरानंतर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई"

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ (टीईटी) च्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी तथा मास्टरमाइंड बिजेंद्र गुप्ता याला ठाणे व भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने (SIT) बिहारमधून अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. मागील जवळपास एका महिन्यापासून पोलिसांना सातत्याने गुंगारा देऊन तो खोट्या नावाखाली आणि छुप्या वस्तीत वास्तव्य करत होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला बिहारमधून ताब्यात घेतले असून पुणे विमानतळावर आणले आहे.

प्रकरणाचा सविस्तर तपशील व तपासातील धक्कादायक खुलासे:

  • कशी फुटली होती प्रश्नपत्रिका: आग्रा येथील 'माहीम पत्रान प्रायव्हेट लिमिटेड' या छापखान्यात टीईटीच्या प्रश्नपत्रिका छापण्यात आल्या होत्या. मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याने छापखान्यातील दोन विद्यमान कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एका भूखंडाचे आमिष दाखवून आणि अवघ्या आठ हजार रुपयांत दारूची पार्टी देऊन फोडले होते. या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेत बुटांच्या तळव्यात लपवून गोपनीय प्रश्नपत्रिका बाहेर काढल्या होत्या.

  • दीड कोटी रुपयांचा व्यवहार: हा अत्यंत महत्त्वाचा पेपर तब्बल दीड कोटी रुपयांना विकला जाणार असल्याचे तपासात उघडकीस आले. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार असलेल्या बिजेंद्र गुप्ताची पत्नी सुमन गुप्ता हिलाही पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत. गुप्ता हा यापूर्वी ओडिशा, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विविध परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांतही गुंतलेला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *