फिफा विश्वचषकात पक्षपाताच्या आरोपांमुळे जगभराततीव्र चर्चा सुरू आहे. अर्जेंटिनाच्या बाजूने फिफाचा कलआहे का, लिओनेल मेसीला विशेष सवलत दिली जातआहे का, मेसीची लोकप्रियता पंच आणिअधिकाऱ्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकते का, समानसंधीच्या तत्त्वाला बाधा होत आहे का, कमी चर्चितखेळाडू असलेल्या संघांवर अन्याय होत आहे का,स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर त्याचा परिणाम होत आहे काआणि या शंका दूर करण्यासाठी फिफाने पुरेशी पावलेउचलली आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित केलेजात आहेत. फिफा विश्वचषकासारख्या स्पर्धेत निष्पक्ष खेळ हीमूलभूत गरज आहे. पंचांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थितहोणे नवीन नाही. मात्र या स्पर्धेतही निर्णयांतील चुकाकमी नव्हत्या. व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) प्रणाली अजूनही वादाचा विषय ठरत असून निर्णयांतील सातत्याबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. भारताचे माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतिया म्हणाले, इजिप्तविरुद्धच्या सामन्यात इराणचा रद्द केलेला गोल चुकीचा निर्णय होता. इराणला दिलेल्या वागणुकीमुळेहीवाद अधिकच वाढला. सामना संपल्यानंतर लगेच इराणच्या खेळाडूंनामेक्सिकोला पाठवले. पश्चिम आशियातील युद्धाच्यापार्श्वभूमीवर ही भू-राजकीय गरज असू शकते. मात्र,इराणचा मुद्दा हा अपवाद नव्हता. अर्जेंटिनाच्या सामन्यांतइजिप्त व स्वित्झर्लंडविरुद्ध झालेले काही निर्णयहीवादग्रस्त ठरले. कोणत्याही मोठ्या स्पर्धेची विश्वासार्हताटिकवण्यासाठी निर्णयांवर संशयाची छाया नसणेआवश्यक असते. याच बाबतीत हा विश्वचषक वादात सापडला आहे. ट्रम्पआणि फिफाचे अध्यक्ष यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरीलचर्चेनेही अनावश्यक वाद निर्माण केला. निर्णय प्रक्रियेतफिफा अध्यक्षांची भूमिका नसल्याचे फिफाने स्पष्ट केलेअसले, तरी या स्पष्टीकरणाने जनमानसातील शंका दूरझाल्या नाहीत. खेळाशी संबंधित विषयावर एखाद्या देशाच्या प्रमुखाने वफिफा अध्यक्षांनी चर्चा करण्याची गरजच का भासावी?त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांच्या शंका वाढत नाहीत का?खेळात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेपस्वीकारार्ह नाही आणि ही घटना संशय निर्माणकरण्यास पुरेशी होती. अशा प्रकारचा संशय एखाद्याजागतिक स्पर्धेच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने योग्य नाही.त्यामुळेच त्यावर उपाय योजना केली पाहिजे. स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून बरेचकाही पणाला लागले आहे. अंतिम काही सामन्यांसाठीफिफाने सर्वोत्तम पंचांची नियुक्ती करावी व प्रत्येकनिर्णय पूर्णपणे निष्पक्ष असल्याची खात्री करावी.आपल्या प्रतिष्ठेवर कोणताही डाग लागू न देणे ही त्याचीजबाबदारी आहे. या आरोपांना कटकारस्थानाचा भागम्हणून नाकारले जाऊ शकते. मात्र प्रत्येक वेळी तसेकरून चालणार नाही. या विषयावरील प्रश्न अधिक तीव्र होत असून, आताअधिक सतर्कतेची गरज आहे. माझ्यादृष्टीने निर्णयांतीलविसंगती ही सर्वात मोठी समस्या आहे. उदाहरणार्थ -इंग्लंड व हॅरी केनविरुद्ध मेक्सिकोच्या सामन्यात दिलेलीपेनल्टी व इजिप्तविरुद्ध अर्जेंटिनाच्या बाजूने दिलेलीपेनल्टी यांची तुलना केली तर निर्णयांतील स्पष्ट विसंगतीदिसून येते. दोन्ही प्रसंगी निर्णय कोणत्याही बाजूने जाऊशकला असता. मेक्सिकोच्या बाबतीत मात्र निर्णयअझ्टेका स्टेडियमवरील यजमान संघाच्या बाजूने गेला.मोठ्या खेळाडूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येत नाहीआणि त्यांच्याशिवाय खेळाची लोकप्रियताही कमी होऊशकते. या दोन्ही बाबींचा विचार व्हायला हवा. ही बाबयेथे लक्षात घेतली पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांच्या मनातीलधारणा. चाहत्यांच्या नजरेत स्पर्धेची प्रतिमा पूर्णपणेनिष्पक्ष असली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या संशयालाजागा नसावी. 19 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वीफिफाने याची खात्री करणे आवश्यक आहे. फिफा हे साध्य करू शकेल का, याचे उत्तरच याविश्वचषकाचा वारसा ठरवेल. अखेरीस कोण जिंकतो आणि कोण हरतो, यापेक्षाखेळाचा विजय अधिक महत्त्वाचा असतो. आणिस्पर्धेतील प्रत्येक निर्णय, प्रत्येक स्तर संशयापलीकडेअसेल तेव्हाच हे शक्य होऊ शकेल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) फिफाने उर्वरित निर्णायक सामन्यांसाठीसर्वोत्तम पंचांची नियुक्ती करावी.प्रत्येकनिर्णय संशया पलीकडचा असलापाहिजे. तिच गोष्ट आपल्या प्रतिष्ठेवरकोणताही डाग लागू देत नाही. खेळाच्याविश्वासार्हतेसाठी ते अत्यावश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



