छत्रपती संभाजीनगर: खेळण्या-बागडण्याच्या, निष्पापपणे हसण्या- खिदळण्याच्या आणि आई-वडिलांच्या कुशीत वाढण्याच्या कोवळ्या वयात काळाने एकाच घरातील दोन चिमुकल्या जीवांना अत्यंत निघृणपणे हिरावून नेले आहे. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील हसत्या-खेळत्या थोटे कुटुंबावर नियतीने असा क्रूर आघात केला आहे की, ज्यामुळे संपूर्ण गावासह परिसराचे काळीज पिळवटून निघाले आहे. मंगळवारी रात्री कुटुंबाने अत्यंत प्रेमाने एकत्र खाल्लेली खिचडी या परिवारासाठी अक्षरशः काळरात्र ठरली. या अन्नातून झालेल्या विषबाधेने आधी दोन वर्षांचा लाडका चिमुकला आयुष आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अवघ्या सहा वर्षांची बहीण गायत्री या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलग दोन दिवसांत आपल्या पोटच्या दोन्ही निष्पाप गोळ्यांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी आणि अमानुष वेळ एका हतबल पित्यावर ओढवली.
खिचडी खाल्ली अन् पहाटेपासून त्रासाला सुरुवात
चिंचोली लिंबाजी येथील रहिवासी नारायण साहेबराव थोटे (वय ३५) यांच्या घरात मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे चुलीवर स्वयंपाक झाला. पत्नी देवशाला (वय ३०), मुलगी गायत्री (वय ६ ते ७ वर्षे) आणि मुलगा आयुष (वय २ वर्षे) या चौघांनी एकत्र बसून रात्रीची खिचडी खाल्ली. मात्र, बुधवारी पहाटेपासूनच घरातील चारही सदस्यांना अचानक तीव्र उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर प्राथमिक औषधोपचार घेतले. मात्र, गुरुवारी पहाटे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दोन्ही लहान मुलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली.
सिल्लोडला नेताना आयुषने प्राण सोडले; पित्याचा हंबरडा
गुरुवारी पहाटे आयुष आणि गायत्री यांना गावातील खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तातडीने सिल्लोड येथे हलवण्याचा सल्ला दिला. परंतु दुर्दैवाने, सिल्लोडकडे घेऊन जात असताना वाटेतच गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अवघ्या दोन वर्षांच्या आयुषची प्राणज्योत मालवली. ज्या चिमुकल्याच्या हातावर खेळणी खेळायची वेळ होती, त्याच्या निष्पाप पार्थिवाला जड अंतःकरणाने गुरुवारी दुपारी १२ वाजता अग्नी देण्याची वेळ हतबल पिता नारायण थोटे यांच्यावर आली.
दुसऱ्या दिवशी लेकीनेही सोडले प्राण; गावात शोककळा
एका मुलाला अग्नी दिल्यानंतर अश्रू कोरडे होत नाहीत तोच नियतीने थोटे कुटुंबावर दुसरा आघात केला. मृत्यूशी झुंज देणाऱ्या लाडक्या गायत्रीला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, परंतु शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तिचीही प्राणज्योत मालवली. एकापाठोपाठ दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने आई, वडील आणि आजीने फोडलेल्या हंबरड्याने स्मशानभूमीतील प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले. आई-वडिलांची प्रकृती उपचारांनंतर धोक्याबाहेर आली असली, तरी घरातले हसते-खेळते जगच उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण चिंचोली लिंबाजी गावावर शोककळा पसरली आहे.
फॉरेन्सिक व अन्नसुरक्षा पथकाकडून नमुने जप्त
या गंभीर घटनेची माहिती मिळताच अन्नसुरक्षा अधिकारी एम. एल. सिद्दीकी, पिशोर पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात तयार करण्यात आलेल्या अन्नाचे, धान्याचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे डेंग्यूमुळे १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. आता अन्नातील विषबाधेने दोन बालकांचा बळी गेल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
शहर
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
- पुणे: पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडून परतताना काळाचा घाला; मंचर बायपासवर २० फूट खोल खड्ड्यात इको गाडी कोसळून दोघांचा मृत्यू
- पुणे: संतापजनक हुंडाबळी प्रकरण; विवाहितेच्या आत्महत्येनंतर सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, तपासातील त्रुटींवर कुटुंब आक्रमक
महाराष्ट्र
- सांगली: थरारक सशस्त्र दरोडा; जत तालुक्यात तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांचा ट्रक अडवून पिस्तुलाच्या धाकाने २५ लाखांची रोकड व सोन्याचे दागिने लूट
- जालना: विजयी होऊनच परत यायचंय! मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची मुंबई पदयात्रेची घोषणा; २० सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार, अंतरवालीत समर्थकांचा महासागर
- बीड: एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ! बीडमधील आष्टी आगाराच्या विश्रांती कक्षात ४६ वर्षीय एसटी चालकाने संपवले जीवन
- कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल; सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या तरुणाने संपवले जीवन, परिसरात हळहळ
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा




























Subscribe to my channel



