रामायण मध्ये वर्णन केलेल्या निषादराज गुह यांच्याकडून कोण कोण प्रेरणा घेऊ शकते, ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांना नदी पार करून दिली? आधुनिक काळात गुह यांच्यासारखे नावाडीच बनणे गरजेचे नाही. ते पूलदेखील बांधू शकतात. जर ते असे करत असतील तर लोकांना नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंतच पोहोचवत नाहीत, तर शेतकऱ्याच्या उत्पादनालाही जवळच्या बाजारापर्यंत पोहोचवतात, जेणेकरून तो कुटुंबाला मदत करू शकेल, एखादा विद्यार्थी पुढच्या गावातील शाळेत जाऊ शकेल आणि एखाद्या गर्भवती महिलेला उत्तम वैद्यकीय उपचार मिळू शकतील. हेच काम पद्मश्री गिरीश भारद्वाज यांनी केले होते. 1989 मध्ये बेंगळुरूपासून 300 किमी दूरच्या त्यांच्या अलेट्टी या जन्मगावचे लोक त्यांच्याकडे आले व पुढच्या गावापर्यंत पूल बांधण्याची अनोखी विनंती केली. लहानपणी भारद्वाज यांना थेट पाचवीत प्रवेश घ्यावा लागला होता, कारण कोणताही मुलगा इतके लांब चालत जाऊन नदी पार करू शकत नव्हता. कदाचित त्यांनाही गुह यांची आठवण आली असेल. भारद्वाज म्हणाले, ‘मी कधीही पूल बांधला नाही.’ तरीही ग्रामस्थ म्हणाले की ‘तुम्ही इंजिनिअर आहात, मार्ग काढाल.’ आणि मग त्यांनी ते आव्हान स्वीकारले. स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य, लोकसहभाग आणि सोप्या इंजिनिअरिंग तत्त्वांचा वापर करून त्यांनी कमी खर्चातच पूल बांधला. ही बातमी नदीच्या प्रवाहापेक्षाही वेगाने पसरली. लवकरच देशभरातून सरकारे व समुदाय त्यांना बोलावू लागले. भारताचे ‘ब्रिज मॅन’ म्हणून प्रसिद्ध भारद्वाज यांचे या मंगळवारी 76 व्या वर्षी निधन झाले. परंतु ग्रामीण भारतात त्यांनी बांधलेले 140 हून अधिक सस्पेन्शन पूल आजही इंजिनिअरिंगपेक्षाही मोठी कहाणी सांगतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यापक समस्येवर तोडगा काढता, तेव्हा ओळख आपोआप तुमच्या मागे येते, याची ते आठवण करून देतात. भारताचा इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे. ई. श्रीधरन यांचेच उदाहरण घ्या, ज्यांनी लाखो लोकांना ती गोष्ट दिली, जी सर्वात ताकदवान लोकही देऊ शकत नाहीत- वेळ. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या शहरांना भव्य इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा अधिक कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे, हे त्यांनी ओळखले. कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो यांसारखे प्रकल्प असामान्य वेगाने व प्रामाणिकपणे पूर्ण करून त्यांनी शहरी वाहतुकीचे चित्रच बदलून टाकले. आज लाखो लोक ट्रॅफिकमध्ये कमी अडकतात, सुरक्षित प्रवास करतात आणि उत्तम जीवनाचा अनुभव घेतात, कारण एका इंजिनिअरने वाहतुकीच्या समस्येच्या निराकरणावर लक्ष केंद्रित केले. अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. डॉ. वर्गीस कुरियन यांनी धवल क्रांतीचे जनक होण्याचे ध्येय ठेवले नव्हते. त्यांनी केवळ ग्रामीण भारताच्या एका मोठ्या समस्येवर तोडगा काढला की, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा. लाखो लोकांना याचा लाभ मिळाला आणि सन्मान आपोआप मिळाला. डॉ. बिंदेश्वर पाठक पुरस्कारांच्या मागे धावले नाहीत. त्यांनी सुलभ शौचालयांच्या माध्यमातून स्वच्छतेच्या संकटावर मात केली. लाखो लोकांना सन्मानजनक जीवन दिले आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत देशाचा दृष्टिकोन बदलला. अरुणाचलम मुरुगनाथम यांनीही आपल्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळेल, असा विचार कधीच केला नव्हता. त्यांनी एका दुर्लक्षित समस्येकडे लक्ष दिले- ग्रामीण महिलांना स्वस्त सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देणे. त्यांच्या या नवनिर्मितीने असंख्य कुटुंबांचे आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका बदलून टाकली. आणि या यादीत राजेंद्र सिंहदेखील आहेत, ज्यांना भारताचे वॉटरमॅन म्हटले जाते. पाण्याची टंचाई गावे आणि लोकांची उपजीविका उद्ध्वस्त करत आहे, हे त्यांनी समजून घेतले. केवळ मोठ्या धरणांवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी पारंपरिक जलसंधारण तंत्रांचे पुनरुज्जीवन केले आणि नद्या तसेच भूजलपातळी पूर्ववत करण्यासाठी समुदायांना एकत्र केले. त्यांच्या प्रयत्नांनी राजस्थानच्या हजारो गावांमध्ये नवसंजीवनी दिली. जेव्हा स्थानिक लोक पर्यावरणीय आव्हाने सोडवण्यात भागीदार बनतात, तेव्हाच शाश्वत विकास यशस्वी होतो, हे त्यांनी सिद्ध केले. या सर्व उदाहरणांमध्ये एक तत्त्व समान दिसते- लाखो लोकांना प्रभावित करणारी समस्या ओळखा, तिच्या निराकरणासाठी स्वतःला समर्पित करा. जेव्हा एखादा शिक्षक मुलांना शिक्षणाशी, एखादा डॉक्टर गावाला आरोग्यसेवेशी, एखादा उद्योजक शेतकऱ्यांना बाजाराशी, एखादा इंजिनिअर तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांशी, किंवा एखादी व्यक्ती आशेला संधीशी जोडते, तेव्हा सर्वात जास्त लोकांचे जीवन कुणी सुधारले, हे जग नेहमी लक्षात ठेवते. फंडा हा आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गरजेचा असा पूल बांधते, तेव्हा लोक त्याचा व्यवसाय विसरून जातीलही, परंतु त्याला खूप दीर्घकाळ लक्षात ठेवतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- बीड: चोरीसाठी थेट १९०० किमीचा प्रवास! बीडच्या आष्टी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हरियाणामधील कुख्यात जनावरे चोरांची टोळी जेरबंद!
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
























Subscribe to my channel



