रामायण मध्ये वर्णन केलेल्या निषादराज गुह यांच्याकडून कोण कोण प्रेरणा घेऊ शकते, ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांना नदी पार करून दिली? आधुनिक काळात गुह यांच्यासारखे नावाडीच बनणे गरजेचे नाही. ते पूलदेखील बांधू शकतात. जर ते असे करत असतील तर लोकांना नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंतच पोहोचवत नाहीत, तर शेतकऱ्याच्या उत्पादनालाही जवळच्या बाजारापर्यंत पोहोचवतात, जेणेकरून तो कुटुंबाला मदत करू शकेल, एखादा विद्यार्थी पुढच्या गावातील शाळेत जाऊ शकेल आणि एखाद्या गर्भवती महिलेला उत्तम वैद्यकीय उपचार मिळू शकतील. हेच काम पद्मश्री गिरीश भारद्वाज यांनी केले होते. 1989 मध्ये बेंगळुरूपासून 300 किमी दूरच्या त्यांच्या अलेट्टी या जन्मगावचे लोक त्यांच्याकडे आले व पुढच्या गावापर्यंत पूल बांधण्याची अनोखी विनंती केली. लहानपणी भारद्वाज यांना थेट पाचवीत प्रवेश घ्यावा लागला होता, कारण कोणताही मुलगा इतके लांब चालत जाऊन नदी पार करू शकत नव्हता. कदाचित त्यांनाही गुह यांची आठवण आली असेल. भारद्वाज म्हणाले, ‘मी कधीही पूल बांधला नाही.’ तरीही ग्रामस्थ म्हणाले की ‘तुम्ही इंजिनिअर आहात, मार्ग काढाल.’ आणि मग त्यांनी ते आव्हान स्वीकारले. स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य, लोकसहभाग आणि सोप्या इंजिनिअरिंग तत्त्वांचा वापर करून त्यांनी कमी खर्चातच पूल बांधला. ही बातमी नदीच्या प्रवाहापेक्षाही वेगाने पसरली. लवकरच देशभरातून सरकारे व समुदाय त्यांना बोलावू लागले. भारताचे ‘ब्रिज मॅन’ म्हणून प्रसिद्ध भारद्वाज यांचे या मंगळवारी 76 व्या वर्षी निधन झाले. परंतु ग्रामीण भारतात त्यांनी बांधलेले 140 हून अधिक सस्पेन्शन पूल आजही इंजिनिअरिंगपेक्षाही मोठी कहाणी सांगतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यापक समस्येवर तोडगा काढता, तेव्हा ओळख आपोआप तुमच्या मागे येते, याची ते आठवण करून देतात. भारताचा इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे. ई. श्रीधरन यांचेच उदाहरण घ्या, ज्यांनी लाखो लोकांना ती गोष्ट दिली, जी सर्वात ताकदवान लोकही देऊ शकत नाहीत- वेळ. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या शहरांना भव्य इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा अधिक कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे, हे त्यांनी ओळखले. कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो यांसारखे प्रकल्प असामान्य वेगाने व प्रामाणिकपणे पूर्ण करून त्यांनी शहरी वाहतुकीचे चित्रच बदलून टाकले. आज लाखो लोक ट्रॅफिकमध्ये कमी अडकतात, सुरक्षित प्रवास करतात आणि उत्तम जीवनाचा अनुभव घेतात, कारण एका इंजिनिअरने वाहतुकीच्या समस्येच्या निराकरणावर लक्ष केंद्रित केले. अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. डॉ. वर्गीस कुरियन यांनी धवल क्रांतीचे जनक होण्याचे ध्येय ठेवले नव्हते. त्यांनी केवळ ग्रामीण भारताच्या एका मोठ्या समस्येवर तोडगा काढला की, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा. लाखो लोकांना याचा लाभ मिळाला आणि सन्मान आपोआप मिळाला. डॉ. बिंदेश्वर पाठक पुरस्कारांच्या मागे धावले नाहीत. त्यांनी सुलभ शौचालयांच्या माध्यमातून स्वच्छतेच्या संकटावर मात केली. लाखो लोकांना सन्मानजनक जीवन दिले आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत देशाचा दृष्टिकोन बदलला. अरुणाचलम मुरुगनाथम यांनीही आपल्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळेल, असा विचार कधीच केला नव्हता. त्यांनी एका दुर्लक्षित समस्येकडे लक्ष दिले- ग्रामीण महिलांना स्वस्त सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देणे. त्यांच्या या नवनिर्मितीने असंख्य कुटुंबांचे आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका बदलून टाकली. आणि या यादीत राजेंद्र सिंहदेखील आहेत, ज्यांना भारताचे वॉटरमॅन म्हटले जाते. पाण्याची टंचाई गावे आणि लोकांची उपजीविका उद्ध्वस्त करत आहे, हे त्यांनी समजून घेतले. केवळ मोठ्या धरणांवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी पारंपरिक जलसंधारण तंत्रांचे पुनरुज्जीवन केले आणि नद्या तसेच भूजलपातळी पूर्ववत करण्यासाठी समुदायांना एकत्र केले. त्यांच्या प्रयत्नांनी राजस्थानच्या हजारो गावांमध्ये नवसंजीवनी दिली. जेव्हा स्थानिक लोक पर्यावरणीय आव्हाने सोडवण्यात भागीदार बनतात, तेव्हाच शाश्वत विकास यशस्वी होतो, हे त्यांनी सिद्ध केले. या सर्व उदाहरणांमध्ये एक तत्त्व समान दिसते- लाखो लोकांना प्रभावित करणारी समस्या ओळखा, तिच्या निराकरणासाठी स्वतःला समर्पित करा. जेव्हा एखादा शिक्षक मुलांना शिक्षणाशी, एखादा डॉक्टर गावाला आरोग्यसेवेशी, एखादा उद्योजक शेतकऱ्यांना बाजाराशी, एखादा इंजिनिअर तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांशी, किंवा एखादी व्यक्ती आशेला संधीशी जोडते, तेव्हा सर्वात जास्त लोकांचे जीवन कुणी सुधारले, हे जग नेहमी लक्षात ठेवते. फंडा हा आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गरजेचा असा पूल बांधते, तेव्हा लोक त्याचा व्यवसाय विसरून जातीलही, परंतु त्याला खूप दीर्घकाळ लक्षात ठेवतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ठेकेदाराचा पाठलाग करून मारहाण, ३००० रुपये घेतले काढून; ५० हजारांची मागितली खंडणी
- पुणे: रस्त्यावर कुजलेले दूध ओतणे पडले महागात; भोर नगरपालिकेची १० हजार रुपयांची दंड कारवाई
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- बीड: माजी सैनिकाचे घर फोडणारा गल्लीतीलच निघाला; बीडच्या केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश, ३.५५ लाखांचा ऐवज जप्त
गुन्हा
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

परभणीत एसटी बस पलटली; १५ ते २० प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर
लोअर परेलमधील प्ले झोनमध्ये मुलाच्या पास्तामध्ये झुरळ? पालकांचा गंभीर आरोप
वसमतजवळ १९ जनावरे पोलिसांच्या ताब्यात; कत्तलीच्या संशयावरून कारवाई
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




