पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:साधूचा पैशांशी संबंध येत असल्यास खूप सजगता हवी

भक्तीसाठी काही गोष्टी आवश्यक मानल्या गेल्या आहेत. त्यात नियमित, सजगता व एकाग्रता यांचा समावेश होतो. गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमान चालिसामध्ये लिहिले आहे – ‘नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा.’ म्हणजेच भक्ती करत असल्यास त्यात सातत्य राखा. भक्तीतून हे नाहीसे झाले की श्रीराम मंदिरासंबंधित घडामोडींसारखी प्रकरणे समोर येतात. दोषी कोण हे हे काळच ठरवेल. मात्र साधू वृत्ती असलेलेदेखील या वादात अडकले. बातम्यांच्या वादळात सदाचार अनेकदा काडीप्रमाणे उडून जातो. काहींची तपश्चर्या अशी कलंकित होणे चिंतेची बाब आहे. तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये म्हटले – ‘सब नर कल्पित करहिं अचारा, जाइ न बरनि अनीति अपारा.’ म्हणजे सगळी माणसे मनमानी आचरण करतात. अन्याय,अनीतीचे वर्णनहीही अशक्य होते. साधूचा धनाशी संबंध येतो. तेव्हा अत्यंत सजग व्हावे. मंत्री सुमंत यांच्या किरकोळ निष्काळजीपणामुळेच कैकेयी, मंथरेला रामराज्य दूर करण्याची संधी मिळाली होती.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *