भारतीय शहरांसमोरील प्रमुख सार्वजनिक आरोग्य संकटांपैकी वायू प्रदूषण हे एक गंभीर आव्हान बनले आहे. लोकसंख्येची प्रचंड घनता आणि वाहनांचे उत्सर्जन, बांधकामातून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे यांसारख्या प्रदूषण स्रोतांशी असलेली जवळीक यामुळे अनेक शहरी भाग कायमस्वरूपी प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत, ज्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. भारतामध्ये वायू गुणवत्तेबाबतची चर्चा आणि धोरणे प्रामुख्याने Continuous Ambient Air Quality Monitoring Stations (CAAQMS) कडून मिळणाऱ्या डेटावर आधारित आहेत. मात्र, ही मॉनिटरिंग केंद्रे बहुतेक वेळा लोकांच्या वास्तव्यात, कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासाच्या मार्गांपासून दूर असतात. विविध अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, दाट लोकवस्तीच्या भागांतील नागरिकांना तुलनेने अधिक प्रदूषणाचा सामना करावा लागतो. विशेषतः मुले, गर्भवती महिला, श्वसन विकार असलेले लोक आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबे यांच्यावर याचा परिणाम अधिक तीव्र असतो. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शहरी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल आवश्यक आहे. यासाठी एक आशादायक उपाय म्हणजे ‘हेल्दी एअर झोन्स’ (Healthy Air Zones – HAZs) स्वीकारणे.’ या संकल्पनेत संपूर्ण शहराच्या सरासरी प्रदूषण मापनाऐवजी विशिष्ट भागांमध्ये लक्ष केंद्रीत करून वायू प्रदुषणाच्या स्रोतांवर भर दिला जातो. जागतिक स्तरावर ही संकल्पना ‘क्लीन एअर झोन्स’ किंवा ‘लो एमिशन झोन्स’ म्हणूनही राबवली जाते. मात्र, तिथे ही पद्धत प्रामुख्याने वाहतूक क्षेत्रापुरती मर्यादित असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर निर्बंध आणि वाहतूक नियंत्रण यावर भर असतो. भारतीय शहरे मात्र या चौकटीपलीकडे जाऊन वाहनेच नव्हे, तर बांधकाम, रस्त्यावरील धूळ, कचरा जाळणे आणि उद्योग यांसारख्या इतर प्रदूषण स्रोतांवरही लक्ष केंद्रित करू शकतात. हेल्दी एअर झोन्स शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये किंवा जिथे लोकसंख्या आणि वावर अधिक आहे अशा ठिकाणी राबवता येऊ शकतात. यामध्ये वाहतूक केंद्रे, मध्यवर्ती व्यापारी भाग, बाजारपेठा, पर्यटनस्थळे आणि मोठी सार्वजनिक स्थळे यांचा समावेश होतो. शहर प्रशासन उच्च लोकघनता असलेले भाग, प्रदूषण स्रोत आणि जास्त प्रमाणात प्रदूषणाच्या संपर्कात असलेले नागरिक यांची ओळख करून घेऊ शकते. यामुळे स्थानिक पातळीवर विशिष्ट गरजांनुसार उपाययोजना करता येतील, ज्याचा उपयोग पुढे शहरव्यापी वायू प्रदूषण नियंत्रण योजनेत होऊ शकतो. वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी, HAZ अंतर्गत स्वच्छ वाहतुकीकडे संक्रमणाला प्राधान्य देता येईल. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन व अनुदान, सार्वजनिक वाहतुकीची वारंवारता आणि विश्वासार्हता वाढवणे, तसेच कमी अंतरासाठी चालणे आणि सायकलिंगला प्राधान्य देण्यासाठी रस्त्यांची पुनर्रचना करणे यांचा समावेश होतो. या झोन्समध्ये अतिप्रदूषणकारी मालवाहनांवर आणि जुन्या व्यावसायिक वाहनांवर कठोर निर्बंध घातले जाऊ शकतात. तसेच त्यांच्या प्रवेशावर मर्यादा घालता येतील. एज-टू-एज पेव्हिंग आणि नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्टसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे यांसारख्या पायाभूत सुविधा उपायांमुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होतो; टेलपाइप उत्सर्जन कमी होते. यामुळे रस्त्यावरील धूळ पुन्हा हवेत उडण्याचे प्रमाणही कमी होते. कारण ही धूळ सूक्ष्म कणांच्या (Particulate Matter) प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. या प्रकारच्या पायाभूत आणि नियामक उपायांमुळे प्रदूषण कमी होण्याचे फायदे थेट त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ मिळू शकतात. या झोन्समध्ये बांधकाम स्थळांवर कडक निरीक्षण आणि स्वच्छ बांधकाम पद्धतींची सक्ती करता येईल. पाडकामाच्या वेळी पाण्याची फवारणी, वाहनांच्या चाकांची स्वच्छता (wheel-washing), बांधकाम साहित्य आणि कचरा झाकून ठेवणे हे उपाय आजूबाजूच्या निवासी भागांना धूळ आणि प्रदूषणापासून वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. दाट औद्योगिक वसाहती किंवा लहान उद्योगांचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये स्वच्छ इंधनाकडे वळल्यास प्रदूषण नियंत्रण अधिक मजबूत होऊ शकते. महापालिकेने कचरा खुले जाळणे हे स्थानिक पातळीवरील वायू प्रदूषणाचे एक महत्त्वाचे कारण आहे. HAZ पद्धतीद्वारे स्थानिक व्यवस्थापन योजना तयार करता येईल. समुदाय सहभागातून जनजागृती वाढवता येईल आणि विकेंद्रीत कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा उभारता येतील. विद्यमान CCTV नेटवर्कचा वापर करून कचरा जाळण्याचे हॉटस्पॉट ओळखता येतील आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी निर्माण करता येईल. औद्योगिक क्षेत्रे किंवा मुख्य रस्ते आणि निवासी इमारती यांच्या दरम्यान शहरी जंगलांची लागवड आणि हिरवे बफर झोन्स तयार केल्यास हे नैसर्गिक फिल्टरप्रमाणे काम करून समुदायावर प्रदूषणाचा परिणाम कमी करतात. आजपर्यंत वायू गुणवत्ता व्यवस्थापनाकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रशासकीय प्रक्रियेचा आहे. HAZ पद्धतीमुळे स्थानिक नागरिकांना, समुदायांना, नगरसेवकांना आणि स्थानिक अधिकाऱ्यांना थेट सहभागी होण्याची संधी मिळते. यामुळे स्थानिक पातळीवर टिकाऊ आणि प्रभावी उपाय विकसित होऊ शकतात. हेल्दी एअर झोन्स हे ‘लिव्हिंग लॅबोरेटरी’ म्हणूनही काम करू शकतात, जिथे नवकल्पना तपासून पाहता येतात. लहान भौगोलिक क्षेत्रात उपायांची परिणामकारकता सिद्ध झाल्यानंतर ते संपूर्ण शहरात राबवता येतात. फेब्रुवारीत पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन करण्यात आले आहे. या मंचावर शहर प्रशासन, पर्यावरण तज्ज्ञ आणि नागरिकांना अनुभव शेअर करण्याची आणि प्रयोगाअंती सिद्ध झालेल्या उपायांसाठी अंमलबजावणीचा आराखडा आखण्याची संधी मिळणार आहे. ‘हेल्थी एअर झोन्स’सारखे प्रयोग ग्लोबल साउथमध्ये यशस्वी उदाहरणे आधीच पाहायला मिळतात. आग्रा येथे ताजमहाल परिसरात खासगी वाहनांवर निर्बंध घालण्यात आल्याने ऐतिहासिक वारसा आणि आरोग्य दोन्हींचे संरक्षण कसे करता येते हे स्पष्ट झाले आहे. तसेच कोलंबियातील बोगोटा शहरातील क्लीन एअर झोन्समध्ये स्वच्छ वाहतूक आणि समुदायिक आरोग्य यांचा प्रभावी समन्वय साधण्यात आला आहे. सर्वाधिक प्रदूषित मार्गांवर लक्ष केंद्रित करून उत्सर्जनात लक्षणीय घट करण्यात यश आले आहे. आरोग्य विशेषतः कमकुवत समाज घटकांचा प्रदूषण संपर्क कमी करण्यावर भर देऊन HAZ संकल्पना आपल्या शहरांचे रूपांतर करण्याचा मार्ग दाखवते. त्यामुळे स्वच्छ हवा हे केवळ धोरणात्मक उद्दिष्ट नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: "आमच्या लेकीला न्याय द्या!" पिंपळवंडीतील घटनेमुळे संतप्त नागरिकांचा पुणे-नाशिक महामार्गावर तब्बल २ तास रास्ता रोको
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
- नागपुर: मनीषनगरातील हॉटेलच्या रूममध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या, तरुण गंभीर जखमी!
- पुणे: राहूजवळ हृदयद्रावक घटना! विजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा मृत्यू, परिसरात शोककळा
महाराष्ट्र
- कोल्हापूर: धावत्या ई-बाईकचा थरार! अवघ्या तीन महिन्यांपूर्वी घेतलेली इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यातच जळून खाक; महिलेचा टळला अनर्थ
- पुणे: "आमच्या लेकीला न्याय द्या!" पिंपळवंडीतील घटनेमुळे संतप्त नागरिकांचा पुणे-नाशिक महामार्गावर तब्बल २ तास रास्ता रोको
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
- नागपुर: मनीषनगरातील हॉटेलच्या रूममध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या, तरुण गंभीर जखमी!
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट


























Subscribe to my channel




