भारतात स्वयंपाकघराला अनेकदा घराचे ‘हृदय’ म्हटलेजाते. परंतु, यामागे एक अस्वस्थ करणारे सत्यही दडलेलेआहे-आपले स्वयंपाकघर हे सहसा घरातील सर्वात प्रदूषितठिकाणांपैकी एक असते. आज जेव्हा पश्चिम आशियातीलसंघर्ष व तेल-गॅसच्या अनिश्चित पुरवठ्याने जागतिकऊर्जा बाजार अस्थिर आहे तेव्हा भारताला आपण कशाप्रकारे अन्न शिजवतो यावर पुनर्विचार करावा लागेल.भारतीय स्वयंपाकघरे टप्प्याटप्प्याने वीज आधारितबनवण्याच्या दिशेने दीर्घकालीन योजनेचा आता गांभीर्यानेविचार करणे आवश्यक आहे. दशकांपासून स्वयंपाकामुळे होणारे घरातील हवेचे प्रदूषणकोट्यवधी लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे.अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जैवइंधनावरचालणाऱ्या स्वयंपाकघरांमध्ये प्रदूषणाची पातळी सुरक्षितमर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. शहरी मध्यमवर्गीयघरांमध्येही परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित नाही. तिथे घरातीलहवेची गुणवत्ता अनेकदा बाहेरच्या हवेपेक्षा पाच ते दहा पटीनेखराब असल्याचे आढळले आहे. भारतीय घरांमध्ये खराबहवेची दुहेरी समस्या आहे. इंधनाचा प्रकार व स्वयंपाकाचीपद्धत. मोठ्या ज्वाळा, तेल आणि मसाल्यांतून निघणारा धूरयामुळे हे ठिकाण प्रदूषणाचे केंद्र बनते. संशोधनानुसार, स्वयंपाकातून निर्माण होणाऱ्याप्रदूषणाचा संबंध दमा, फुप्फुसांचे जुनाट आजार,हृदयविकार, मोतीबिंदू, त्वचा आणि डोळ्यांच्या समस्यातसेच अकाली मृत्यूशी आहे. महिला, ज्या स्वयंपाकघरातजास्त वेळ घालवतात आणि लहान मुले, जी अनेकदामातांच्या जवळ असतात, त्यांना याचा सर्वाधिक फटकाबसतो. भारताने या दिशेने काही महत्त्वाची पावलेउचलली आहेत. गॅसच्या विस्तारामुळे अनेक घरांमध्येलाकूड-कोळशावरील अवलंबित्व कमी झाले आहे. यामुळेमहिलांना दिलासा मिळाला आणि धूरही कमी झाला. परंतु,गॅस हा अंतिम उपाय नाही. हे अजूनही जीवाश्म इंधनचआहे, ज्याची किंमत आणि उपलब्धता जागतिकपरिस्थितीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत वीज आधारित स्वयंपाकघर हा एकअधिक टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येतो.हे खरे आहे की, सध्या भारत सरकार आणि बहुतांश कुटुंबेमोठ्या प्रमाणावर विजेवर आधारित स्वयंपाकासाठी पूर्णपणेतयार नाहीत, परंतु या विचाराला धोरण आणि सार्वजनिकचर्चेत स्थान देणे गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या बदलालाप्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागतो. विजेवरील स्वयंपाक हा गॅसच्या तुलनेत अधिकऊर्जा-कार्यक्षम असतो आणि यामध्ये ऊर्जेचा मोठा भागथेट भांड्यापर्यंत पोहोचतो. जसा भारत सौर आणि पवनऊर्जेचा विस्तार करत आहे तसा विजेचा खर्च अधिक स्थिरआणि स्पर्धात्मक होऊ शकतो. हे ऊर्जा सुरक्षा आणिपर्यावरण संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांशी सुसंगत आहे. तथापि,यामध्ये अनेक आव्हानेही आहेत. देशाच्या अनेक भागांतविजेचा पुरवठा अद्याप पूर्णपणे विश्वासार्ह नाही. फक्तकनेक्शन असणे पुरेसे नाही, तर निरंतर आणि पुरेशी वीजहीआवश्यक आहे. याशिवाय इंडक्शन शेगड्या आणि इतरउपकरणांचा सुरुवातीचा खर्च गरीब कुटुंबांसाठी अडथळाठरू शकतो. भारतीय जेवणामध्ये मोठ्या ज्वाळा, दीर्घकाळ शिजवणेआणि मोठ्या भांड्यांचा वापर यांचा समावेश असतो.अनेकांना वाटते की इलेक्ट्रिक शेगडीवर तीच चव मिळणारनाही. या धारणा बदलण्यासाठी जागरूकता आणि विश्वासनिर्माण करणे आवश्यक आहे. या दिशेने पुढे जाण्यासाठीस्पष्ट धोरणात्मक आराखड्याची गरज असेल. लक्ष्यितसवलती आणि सोप्या आर्थिक पर्यायांद्वारे गरीब कुटुंबांनामदत केली जाऊ शकते. घराच्या छतावरील सौरऊर्जायंत्रणेसारखी व्यवस्थादेखील विजेवरील स्वयंपाकाला बळदेऊ शकते . (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel




Sign up for our affiliate program and watch your earnings grow!