भारतात स्वयंपाकघराला अनेकदा घराचे ‘हृदय’ म्हटलेजाते. परंतु, यामागे एक अस्वस्थ करणारे सत्यही दडलेलेआहे-आपले स्वयंपाकघर हे सहसा घरातील सर्वात प्रदूषितठिकाणांपैकी एक असते. आज जेव्हा पश्चिम आशियातीलसंघर्ष व तेल-गॅसच्या अनिश्चित पुरवठ्याने जागतिकऊर्जा बाजार अस्थिर आहे तेव्हा भारताला आपण कशाप्रकारे अन्न शिजवतो यावर पुनर्विचार करावा लागेल.भारतीय स्वयंपाकघरे टप्प्याटप्प्याने वीज आधारितबनवण्याच्या दिशेने दीर्घकालीन योजनेचा आता गांभीर्यानेविचार करणे आवश्यक आहे. दशकांपासून स्वयंपाकामुळे होणारे घरातील हवेचे प्रदूषणकोट्यवधी लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे.अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जैवइंधनावरचालणाऱ्या स्वयंपाकघरांमध्ये प्रदूषणाची पातळी सुरक्षितमर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. शहरी मध्यमवर्गीयघरांमध्येही परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित नाही. तिथे घरातीलहवेची गुणवत्ता अनेकदा बाहेरच्या हवेपेक्षा पाच ते दहा पटीनेखराब असल्याचे आढळले आहे. भारतीय घरांमध्ये खराबहवेची दुहेरी समस्या आहे. इंधनाचा प्रकार व स्वयंपाकाचीपद्धत. मोठ्या ज्वाळा, तेल आणि मसाल्यांतून निघणारा धूरयामुळे हे ठिकाण प्रदूषणाचे केंद्र बनते. संशोधनानुसार, स्वयंपाकातून निर्माण होणाऱ्याप्रदूषणाचा संबंध दमा, फुप्फुसांचे जुनाट आजार,हृदयविकार, मोतीबिंदू, त्वचा आणि डोळ्यांच्या समस्यातसेच अकाली मृत्यूशी आहे. महिला, ज्या स्वयंपाकघरातजास्त वेळ घालवतात आणि लहान मुले, जी अनेकदामातांच्या जवळ असतात, त्यांना याचा सर्वाधिक फटकाबसतो. भारताने या दिशेने काही महत्त्वाची पावलेउचलली आहेत. गॅसच्या विस्तारामुळे अनेक घरांमध्येलाकूड-कोळशावरील अवलंबित्व कमी झाले आहे. यामुळेमहिलांना दिलासा मिळाला आणि धूरही कमी झाला. परंतु,गॅस हा अंतिम उपाय नाही. हे अजूनही जीवाश्म इंधनचआहे, ज्याची किंमत आणि उपलब्धता जागतिकपरिस्थितीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत वीज आधारित स्वयंपाकघर हा एकअधिक टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येतो.हे खरे आहे की, सध्या भारत सरकार आणि बहुतांश कुटुंबेमोठ्या प्रमाणावर विजेवर आधारित स्वयंपाकासाठी पूर्णपणेतयार नाहीत, परंतु या विचाराला धोरण आणि सार्वजनिकचर्चेत स्थान देणे गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या बदलालाप्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागतो. विजेवरील स्वयंपाक हा गॅसच्या तुलनेत अधिकऊर्जा-कार्यक्षम असतो आणि यामध्ये ऊर्जेचा मोठा भागथेट भांड्यापर्यंत पोहोचतो. जसा भारत सौर आणि पवनऊर्जेचा विस्तार करत आहे तसा विजेचा खर्च अधिक स्थिरआणि स्पर्धात्मक होऊ शकतो. हे ऊर्जा सुरक्षा आणिपर्यावरण संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांशी सुसंगत आहे. तथापि,यामध्ये अनेक आव्हानेही आहेत. देशाच्या अनेक भागांतविजेचा पुरवठा अद्याप पूर्णपणे विश्वासार्ह नाही. फक्तकनेक्शन असणे पुरेसे नाही, तर निरंतर आणि पुरेशी वीजहीआवश्यक आहे. याशिवाय इंडक्शन शेगड्या आणि इतरउपकरणांचा सुरुवातीचा खर्च गरीब कुटुंबांसाठी अडथळाठरू शकतो. भारतीय जेवणामध्ये मोठ्या ज्वाळा, दीर्घकाळ शिजवणेआणि मोठ्या भांड्यांचा वापर यांचा समावेश असतो.अनेकांना वाटते की इलेक्ट्रिक शेगडीवर तीच चव मिळणारनाही. या धारणा बदलण्यासाठी जागरूकता आणि विश्वासनिर्माण करणे आवश्यक आहे. या दिशेने पुढे जाण्यासाठीस्पष्ट धोरणात्मक आराखड्याची गरज असेल. लक्ष्यितसवलती आणि सोप्या आर्थिक पर्यायांद्वारे गरीब कुटुंबांनामदत केली जाऊ शकते. घराच्या छतावरील सौरऊर्जायंत्रणेसारखी व्यवस्थादेखील विजेवरील स्वयंपाकाला बळदेऊ शकते . (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: सिंहस्थ २०२७ साठी नाशिक सज्ज: शहरात उभारले जाणार २८ नवे रस्ते
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
महाराष्ट्र
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- महाराष्ट्र: रेशनधारकांसाठी मोठा दिलासा, आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!


























Subscribe to my channel


Sign up for our affiliate program and watch your earnings grow!