भारतात स्वयंपाकघराला अनेकदा घराचे ‘हृदय’ म्हटलेजाते. परंतु, यामागे एक अस्वस्थ करणारे सत्यही दडलेलेआहे-आपले स्वयंपाकघर हे सहसा घरातील सर्वात प्रदूषितठिकाणांपैकी एक असते. आज जेव्हा पश्चिम आशियातीलसंघर्ष व तेल-गॅसच्या अनिश्चित पुरवठ्याने जागतिकऊर्जा बाजार अस्थिर आहे तेव्हा भारताला आपण कशाप्रकारे अन्न शिजवतो यावर पुनर्विचार करावा लागेल.भारतीय स्वयंपाकघरे टप्प्याटप्प्याने वीज आधारितबनवण्याच्या दिशेने दीर्घकालीन योजनेचा आता गांभीर्यानेविचार करणे आवश्यक आहे. दशकांपासून स्वयंपाकामुळे होणारे घरातील हवेचे प्रदूषणकोट्यवधी लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे.अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जैवइंधनावरचालणाऱ्या स्वयंपाकघरांमध्ये प्रदूषणाची पातळी सुरक्षितमर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. शहरी मध्यमवर्गीयघरांमध्येही परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित नाही. तिथे घरातीलहवेची गुणवत्ता अनेकदा बाहेरच्या हवेपेक्षा पाच ते दहा पटीनेखराब असल्याचे आढळले आहे. भारतीय घरांमध्ये खराबहवेची दुहेरी समस्या आहे. इंधनाचा प्रकार व स्वयंपाकाचीपद्धत. मोठ्या ज्वाळा, तेल आणि मसाल्यांतून निघणारा धूरयामुळे हे ठिकाण प्रदूषणाचे केंद्र बनते. संशोधनानुसार, स्वयंपाकातून निर्माण होणाऱ्याप्रदूषणाचा संबंध दमा, फुप्फुसांचे जुनाट आजार,हृदयविकार, मोतीबिंदू, त्वचा आणि डोळ्यांच्या समस्यातसेच अकाली मृत्यूशी आहे. महिला, ज्या स्वयंपाकघरातजास्त वेळ घालवतात आणि लहान मुले, जी अनेकदामातांच्या जवळ असतात, त्यांना याचा सर्वाधिक फटकाबसतो. भारताने या दिशेने काही महत्त्वाची पावलेउचलली आहेत. गॅसच्या विस्तारामुळे अनेक घरांमध्येलाकूड-कोळशावरील अवलंबित्व कमी झाले आहे. यामुळेमहिलांना दिलासा मिळाला आणि धूरही कमी झाला. परंतु,गॅस हा अंतिम उपाय नाही. हे अजूनही जीवाश्म इंधनचआहे, ज्याची किंमत आणि उपलब्धता जागतिकपरिस्थितीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत वीज आधारित स्वयंपाकघर हा एकअधिक टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येतो.हे खरे आहे की, सध्या भारत सरकार आणि बहुतांश कुटुंबेमोठ्या प्रमाणावर विजेवर आधारित स्वयंपाकासाठी पूर्णपणेतयार नाहीत, परंतु या विचाराला धोरण आणि सार्वजनिकचर्चेत स्थान देणे गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या बदलालाप्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागतो. विजेवरील स्वयंपाक हा गॅसच्या तुलनेत अधिकऊर्जा-कार्यक्षम असतो आणि यामध्ये ऊर्जेचा मोठा भागथेट भांड्यापर्यंत पोहोचतो. जसा भारत सौर आणि पवनऊर्जेचा विस्तार करत आहे तसा विजेचा खर्च अधिक स्थिरआणि स्पर्धात्मक होऊ शकतो. हे ऊर्जा सुरक्षा आणिपर्यावरण संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांशी सुसंगत आहे. तथापि,यामध्ये अनेक आव्हानेही आहेत. देशाच्या अनेक भागांतविजेचा पुरवठा अद्याप पूर्णपणे विश्वासार्ह नाही. फक्तकनेक्शन असणे पुरेसे नाही, तर निरंतर आणि पुरेशी वीजहीआवश्यक आहे. याशिवाय इंडक्शन शेगड्या आणि इतरउपकरणांचा सुरुवातीचा खर्च गरीब कुटुंबांसाठी अडथळाठरू शकतो. भारतीय जेवणामध्ये मोठ्या ज्वाळा, दीर्घकाळ शिजवणेआणि मोठ्या भांड्यांचा वापर यांचा समावेश असतो.अनेकांना वाटते की इलेक्ट्रिक शेगडीवर तीच चव मिळणारनाही. या धारणा बदलण्यासाठी जागरूकता आणि विश्वासनिर्माण करणे आवश्यक आहे. या दिशेने पुढे जाण्यासाठीस्पष्ट धोरणात्मक आराखड्याची गरज असेल. लक्ष्यितसवलती आणि सोप्या आर्थिक पर्यायांद्वारे गरीब कुटुंबांनामदत केली जाऊ शकते. घराच्या छतावरील सौरऊर्जायंत्रणेसारखी व्यवस्थादेखील विजेवरील स्वयंपाकाला बळदेऊ शकते . (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel




Sign up for our affiliate program and watch your earnings grow!