डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎आपली स्वयंपाकघरं आता विजेवर चालवण्याची वेळ आली आहे का?‎

भारतात स्वयंपाकघराला अनेकदा घराचे ‘हृदय’ म्हटले‎जाते. परंतु, यामागे एक अस्वस्थ करणारे सत्यही दडलेले‎आहे-आपले स्वयंपाकघर हे सहसा घरातील सर्वात प्रदूषित‎ठिकाणांपैकी एक असते. आज जेव्हा पश्चिम आशियातील‎संघर्ष व तेल-गॅसच्या अनिश्चित पुरवठ्याने ‎जागतिक‎ऊर्जा बाजार अस्थिर आहे तेव्हा भारताला आपण ‎कशा‎प्रकारे अन्न शिजवतो यावर पुनर्विचार करावा लागेल.‎‎भारतीय स्वयंपाकघरे टप्प्याटप्प्याने वीज आधारित‎‎बनवण्याच्या दिशेने दीर्घकालीन योजनेचा आता गांभीर्याने‎‎विचार करणे आवश्यक आहे.‎ दशकांपासून स्वयंपाकामुळे होणारे घरातील हवेचे प्रदूषण‎कोट्यवधी लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे.‎अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जैवइंधनावर‎चालणाऱ्या स्वयंपाकघरांमध्ये प्रदूषणाची पातळी सुरक्षित‎मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. शहरी मध्यमवर्गीय‎घरांमध्येही परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित नाही. तिथे घरातील‎हवेची गुणवत्ता अनेकदा बाहेरच्या हवेपेक्षा पाच ते दहा पटीने‎खराब असल्याचे आढळले आहे. भारतीय घरांमध्ये खराब‎हवेची दुहेरी समस्या आहे. इंधनाचा प्रकार व स्वयंपाकाची‎पद्धत. मोठ्या ज्वाळा, तेल आणि मसाल्यांतून निघणारा धूर‎यामुळे हे ठिकाण प्रदूषणाचे केंद्र बनते.‎ संशोधनानुसार, स्वयंपाकातून निर्माण होणाऱ्या‎प्रदूषणाचा संबंध दमा, फुप्फुसांचे जुनाट आजार,‎हृदयविकार, मोतीबिंदू, त्वचा आणि डोळ्यांच्या समस्या‎तसेच अकाली मृत्यूशी आहे. महिला, ज्या स्वयंपाकघरात‎जास्त वेळ घालवतात आणि लहान मुले, जी अनेकदा‎मातांच्या जवळ असतात, त्यांना याचा सर्वाधिक फटका‎बसतो. भारताने या दिशेने काही महत्त्वाची पावले‎उचलली आहेत. गॅसच्या विस्तारामुळे अनेक घरांमध्ये‎लाकूड-कोळशावरील अवलंबित्व कमी झाले आहे. यामुळे‎महिलांना दिलासा मिळाला आणि धूरही कमी झाला. परंतु,‎गॅस हा अंतिम उपाय नाही. हे अजूनही जीवाश्म इंधनच‎आहे, ज्याची किंमत आणि उपलब्धता जागतिक‎परिस्थितीवर अवलंबून असते.‎ अशा परिस्थितीत वीज आधारित स्वयंपाकघर हा एक‎अधिक टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येतो.‎हे खरे आहे की, सध्या भारत सरकार आणि बहुतांश कुटुंबे‎मोठ्या प्रमाणावर विजेवर आधारित स्वयंपाकासाठी पूर्णपणे‎तयार नाहीत, परंतु या विचाराला धोरण आणि सार्वजनिक‎चर्चेत स्थान देणे गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या बदलाला‎प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागतो.‎ विजेवरील स्वयंपाक हा गॅसच्या तुलनेत अधिक‎ऊर्जा-कार्यक्षम असतो आणि यामध्ये ऊर्जेचा मोठा भाग‎थेट भांड्यापर्यंत पोहोचतो. जसा भारत सौर आणि पवन‎ऊर्जेचा विस्तार करत आहे तसा विजेचा खर्च अधिक स्थिर‎आणि स्पर्धात्मक होऊ शकतो. हे ऊर्जा सुरक्षा आणि‎पर्यावरण संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांशी सुसंगत आहे. तथापि,‎यामध्ये अनेक आव्हानेही आहेत. देशाच्या अनेक भागांत‎विजेचा पुरवठा अद्याप पूर्णपणे विश्वासार्ह नाही. फक्त‎कनेक्शन असणे पुरेसे नाही, तर निरंतर आणि पुरेशी वीजही‎आवश्यक आहे. याशिवाय इंडक्शन शेगड्या आणि इतर‎उपकरणांचा सुरुवातीचा खर्च गरीब कुटुंबांसाठी अडथळा‎ठरू शकतो.‎ भारतीय जेवणामध्ये मोठ्या ज्वाळा, दीर्घकाळ शिजवणे‎आणि मोठ्या भांड्यांचा वापर यांचा समावेश असतो.‎अनेकांना वाटते की इलेक्ट्रिक शेगडीवर तीच चव मिळणार‎नाही. या धारणा बदलण्यासाठी जागरूकता आणि विश्वास‎निर्माण करणे आवश्यक आहे. या दिशेने पुढे जाण्यासाठी‎स्पष्ट धोरणात्मक आराखड्याची गरज असेल. लक्ष्यित‎सवलती आणि सोप्या आर्थिक पर्यायांद्वारे गरीब कुटुंबांना‎मदत केली जाऊ शकते. घराच्या छतावरील सौरऊर्जा‎यंत्रणेसारखी व्यवस्थादेखील विजेवरील स्वयंपाकाला बळ‎देऊ शकते . (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎आपली स्वयंपाकघरं आता विजेवर चालवण्याची वेळ आली आहे का?‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *