महाराष्ट्रातील कऱ्हाड, जुन्नर आणि संगमनेरमधील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रगत शेतकरी आणि तज्ज्ञ संस्थांच्या सहभागातून सोडवला जाऊ शकतो. राजस्थानच्या समुदाय-आधारित मॉडेलच्या धर्तीवर अधिवास व्यवस्थापन, पूर्वसूचना प्रणाली आणि संवेदनशील शेती पद्धती राबवल्यास सहअस्तित्वाचा शाश्वत मार्ग निर्माण होऊ शकतो. दरवर्षी 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा होतो. तो साजरा करताना आपण नेहमी संरक्षण, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल याबद्दल बोलतो. मात्र, आजच्या घडीला सर्वात ज्वलंत प्रश्न आहे तो मानव-वन्यजीव संघर्षाचा. हा संघर्ष केवळ वन्यजीवांचा नाही आणि तो फक्त ग्रामीण भागापुरताही मर्यादित नाही; तर तो विकास, शेती, उपजीविका आणि पर्यावरण यांच्यातील समतोल बिघडल्याचे संकेत देतो. वन्यजीवांना पकडणे किंवा स्थलांतरित करणे हा तात्पुरता मार्ग ठरतो; मात्र तो दीर्घकालीन तोडगा नाही. म्हणूनच राजस्थानमध्ये राबवण्यात आलेल्या समुदाय-आधारित सहअस्तित्वाच्या मॉडेलकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी, वन विभाग आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधून संघर्षाचे व्यवस्थापन करण्यात यश आले आहे. या पद्धतीमध्ये वन्यजीवांना बाहेर ढकलण्याऐवजी त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी जीवन अधिक सुरक्षित कसे करता येईल यावर भर देण्यात आला. मानव-वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाचा मार्ग महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. गीर फॉरेस्ट, राजस्थानच्या उदयपूरमधील झालाना आणि आम्रगड या ठिकाणी घनदाट जंगल नसून शेती आणि गवताळ प्रदेश आहेत. त्या ठिकाणी बिबट्यांचे दर्शन घडवण्यासाठी 30 ते 40 मोठी रिसॉर्ट्स असून, त्यातून दरवर्षी 150 कोटींचे उत्पन्न मिळते. तसेच एक हजारापेक्षा जास्त लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे वेतन मिळते. बिबट्यांना पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणे आणि फोटोग्राफीसाठी त्यांना प्रोत्साहित करणे, याद्वारे रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. ऊस पिकापेक्षा जास्त उत्पन्न त्या भागातील शेतकऱ्यांना बिबट सफारीद्वारे मिळाले असून, परदेशी पर्यटकही तेथे मोठ्या संख्येने येतात. मानव-बिबट सहजीवनाद्वारे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणारा हा प्रकल्प पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कऱ्हाड (सातारा), संगमनेर (अहिल्यानगर) आणि जुन्नर (पुणे) येथील पथक लवकरच तेथे अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. त्या निमित्ताने आपल्या राज्यात निर्माण झालेला मानव-बिबट संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे राज्यात निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आहे. माळरान ही केवळ पडीक जमीन आहे, असा लोकांचा दृष्टिकोन असतो. रस्ते, गोदामे किंवा बेघरांसाठी घरे बांधणे यांसह इतर कामांसाठी जमिनीचा वापर होतो. वनांचे संवर्धन महत्त्वाचे असून, जंगलाचे महत्त्व आणि त्याबाबतची जागरूकता लोकांमध्ये बऱ्यापैकी निर्माण झाली आहे. पण, त्या तुलनेत गवताळ माळरानाबाबत नकारात्मकता आहे. प्रत्यक्षात ज्या परिसरात पाऊस कमी असल्याने जंगल निर्माण होऊ शकत नाही, अशा ठिकाणी माळराने तयार झाली आहेत; ही निसर्गाची किमया आहे. या जमिनी निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. राज्यात लवकरच 300 कोटी झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये गवताळ माळराणाचे पर्यावरणीय स्थान कायम राखण्यासाठी त्या विशिष्ट भागांत वृक्षारोपण केले जाणार नाही, असे कृती धोरण निश्चित केले आहे. बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि साताऱ्याच्या काही भागांतील गवताळ माळराणांचे नैसर्गिक अधिवास कायम राखले जातील. गवताळ माळरानाचा राजा अशी उपाधी असणारा माळढोक पक्षी संकटग्रस्त प्रजातीमध्ये आहे. या पक्षांचे पुनर्वसन करण्यासाठी माळराने समृद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. अधिवास जपल्याशिवाय या पक्षांचे पुनर्वसन किंवा कृत्रिम प्रजनन करूनही फायदा होणार नाही. त्यासोबतच तणमोर (लेसर फ्लोरिकन) यांचेही संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



