पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:लोभावर एकच उपाय,‎समाधानी वृत्ती वाढवावी‎

मनुष्याच्या सहा शत्रूंमध्ये ‘लोभ'' हा एक महत्त्वाचा शत्रू आहे. लोभ‎म्हणजे अतिरिक्त लालसा किंवा अवाजवी मागणी. हा लोभ पैसा,‎पद, वस्तू किंवा शरीर यांपैकी कशावरही असू शकतो. ढोबळमानाने‎लोभ आणि लालचीपणा या एकाच गोष्टी आहेत. पण त्यात एक‎सूक्ष्म फरक आहे; लोभ म्हणजे आहे ते अजून वाढवणे व लालचीपणा‎म्हणजे दुसऱ्याकडे आहे, ते मिळवण्याची तीव्र इच्छा असणे. यावर‎एकच उपाय म्हणजे समाधानाची वृत्ती वाढवणे. तुलसीदासजींनी एक‎प्रसंग लिहिला आहे, त्यात काकभुशुंडीजी पक्षीराज गरुडाला‎म्हणतात की, "केवळ तुम्हालाच मोह झाला आहे असे नाही. मोठेमोठे‎लोकही मोह आणि लोभात बुडाले आहेत.’‎ ‘ग्यानी तापस सूर कबि कोबिद गुन आगार, केहि कै लोभ बिडंबना‎कीन्हि न एहिं संसार’ याचा अर्थ असा की, लोभाने मातीमोल केले‎नाही असा या जगात माणूस नाही. लोभाला समाधानाची जोड द्या‎अन्यथा कष्टांचे रूपांतर अशांतीत होईल. मनुष्य सतत अस्वस्थच‎राहतो.‎


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:लोभावर एकच उपाय,‎समाधानी वृत्ती वाढवावी‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *