केरळच्या अलीकडच्या दौऱ्यात मला काही विचित्रगोष्टी दिसल्या. अनेक शहरांतील चहाची दुकाने बंदहोती. तिथल्या एका स्थानिक मल्याळी चहावाल्यानेविचारले, ‘एलपीजी सिलेंडरशिवाय आम्ही कायकरणार? आम्हाला माहित आहे की पश्चिमआशियातील युद्धामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे,आम्ही कोणाला दोषही देत नाही; पण सरकार आमचीसमस्या किमान मान्यही करू शकत नाही का?’ गोंधळाच्या वातावरणात ही छोटीशी गोष्ट दुर्लक्षित राहूशकते. पण ती अशा आर्थिक अंडरकरंटकडे बोटदाखवते. तो राजकीय वर्ग स्वीकारण्यास कचरत आहे.अधिकृतपणे सर्व काही ठीक असल्याचे सांगितले जात असले, तरी जमिनीवरील वास्तव खूपच नाजूक आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा मार्गविस्कळीत झाले आहेत. विशेषतः होर्मुजच्यासामुद्रधुनीत. यामुळे मालाची वाहतूक आणि विम्याचाखर्च वाढला आहे. परंतु, इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे: जागतिक अडथळे संकट निर्माण करू शकतात. पणत्याचा परिणाम किती होईल हे देशांतर्गत धोरणे ठरवतात. आणि नेमक्या याच ठिकाणी सरकारचा ‘ऑल इजवेल’ हा दावा पोकळ वाटतो. एलपीजीचेच उदाहरणघ्या. लाखो कुटुंबांपर्यंत स्वच्छ इंधन पोहोचवणे ही गेल्यादशकांतील सर्वात मोठी बदल घडवून आणणारी आणिकल्याणकारी कामगिरी आहे. पण, ते इंधन परवडणारेनसेल, तर त्याचा काय फायदा? भारत आजही आपल्याकच्च्या तेलाच्या गरजेच्या सुमारे 85% आयात करतो.एलपीजीच्या बाबतीतही 60% पेक्षा जास्त अवलंबित्वआयातीवर आहे. मोदी सरकारही यात निष्क्रिय राहिलेलेनाही. सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आणि एलपीजी वापराला प्राधान्य दिले. असो, हीतर कथेची एक बाजू झाली. खरा प्रश्न हा आहेकी,कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या, तेव्हा त्याचाफायदा ग्राहकांना का दिला गेला नाही? उलट, करवाढवले गेले जेणेकरून ग्राहक वाढीव किंमत मोजतराहील आणि सरकारी तिजोरी सुरक्षित राहील. आजदिसणाऱ्या असंतोषाचे कारण हीच विषमता आहे.केरळचा चहावाला वाढत्या खर्चामुळे दुकान बंद करतो.चेन्नईतील डिलिव्हरी बॉय इंधनावर गरजेपेक्षा जास्तखर्च करत आहे. शेतकरी डिझेल आणि खतांच्यावाढत्या किमतींशी झुंजत आहे. रोजंदारी मजूर आपलीउपजीविका गमावत आहे. हे स्पष्ट करते की कशा प्रकारेदूरवरची युद्धे देशांतर्गत संकट बनतात. असे असूनही,प्रतिसादांमध्ये पुरवठा पुरेसा असल्याचे सांगून त्याचा दोषसाठेबाजी आणि नफेखोरीवर टाकला जातो.सकारात्मक बाजू पाहता, गेल्या दशकातील आपलाचांगला विकास दर आणि तुलनेने कमी महागाईनेआशावादी राहण्याचे कारण दिले आहे. पण व्यापकस्थिरतेचे महत्त्व तेव्हाच असते, जेव्हा जमिनीवरीलपरिस्थितीही सुधारलेली असते. दुसरे म्हणजे आयातकेलेल्या ऊर्जेवर आपले अवलंबित्व आहे हे भारतालामाहित असूनही, वास्तविक ऊर्जा सुरक्षेच्या दिशेनेआपली पावले विसंगत राहिली आहेत. चीननेदीर्घकालीन करार , अक्षय ऊर्जेतील विस्तार याद्वारेसुरक्षा मजबूत केली. याउलट, भारत आधीच तयारीकरण्याऐवजी परिस्थिती उद्भवल्यावर केवळ प्रतिसाददेणारा वाटतो. हे खरे आहे की ऊर्जा बदलांना वेळलागतो. भारताच्या विकासाच्या गरजाही मोठ्या आहेत.म्हणूनच तातडीची पावले उचलावीत. पहिले पाऊलआहे - प्रामाणिकपणा. सरकारे म्हणतात की परिणाममर्यादित आहेत, तेव्हा ते स्वतःचा फायदा करत नसतात.हे वास्तव स्वीकारणे म्हणजे कमजोरी नाही, तरविश्वासार्ह धोरणाचा तो पाया आहे. दुसरे पाऊल म्हणजे- तात्काळ दिलासा. इंधनाबाबत पारदर्शक आणिनियमांवर आधारित आराखडा असावा.जेणेकरूनतेलाच्या किमती कमी झाल्यावर त्याचा फायदाग्राहकांना मिळेल. एलपीजी सबसिडीवरही फेरविचार करणे आवश्यकआहे. आज महागाईचा दबाव निम्न मध्यमवर्गापर्यंतपोहोचला आहे. अशा स्थितीत अल्पकालीन दिलासापुरेसा ठरणार नाही. भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेच्यादिशेने अधिक गंभीर प्रयत्न करावे लागतील. अक्षयऊर्जा वेगाने स्वीकारावी लागेल. सर्वात महत्त्वाचेम्हणजे ऊर्जा धोरणाला आर्थिक रणनीतीशी जोडणेआवश्यक आहे. कारण ऊर्जा हाच कृषी, उद्योग आणिसेवा यांसारख्या प्रमुख आर्थिक क्षेत्रांचा पाया आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) सकारात्मक बाजू पाहिल्यास गेल्यादशकातील आपला चांगला विकास दरआणि तुलनेने कमी महागाईनेआपल्याला आशावादी राहण्याचे कारणदिले. परंतु प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा होते तेव्हा व्यापक स्थिरतेचे महत्त्व असते.
हे पण वाचा-
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




