केरळच्या अलीकडच्या दौऱ्यात मला काही विचित्रगोष्टी दिसल्या. अनेक शहरांतील चहाची दुकाने बंदहोती. तिथल्या एका स्थानिक मल्याळी चहावाल्यानेविचारले, ‘एलपीजी सिलेंडरशिवाय आम्ही कायकरणार? आम्हाला माहित आहे की पश्चिमआशियातील युद्धामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे,आम्ही कोणाला दोषही देत नाही; पण सरकार आमचीसमस्या किमान मान्यही करू शकत नाही का?’ गोंधळाच्या वातावरणात ही छोटीशी गोष्ट दुर्लक्षित राहूशकते. पण ती अशा आर्थिक अंडरकरंटकडे बोटदाखवते. तो राजकीय वर्ग स्वीकारण्यास कचरत आहे.अधिकृतपणे सर्व काही ठीक असल्याचे सांगितले जात असले, तरी जमिनीवरील वास्तव खूपच नाजूक आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा मार्गविस्कळीत झाले आहेत. विशेषतः होर्मुजच्यासामुद्रधुनीत. यामुळे मालाची वाहतूक आणि विम्याचाखर्च वाढला आहे. परंतु, इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे: जागतिक अडथळे संकट निर्माण करू शकतात. पणत्याचा परिणाम किती होईल हे देशांतर्गत धोरणे ठरवतात. आणि नेमक्या याच ठिकाणी सरकारचा ‘ऑल इजवेल’ हा दावा पोकळ वाटतो. एलपीजीचेच उदाहरणघ्या. लाखो कुटुंबांपर्यंत स्वच्छ इंधन पोहोचवणे ही गेल्यादशकांतील सर्वात मोठी बदल घडवून आणणारी आणिकल्याणकारी कामगिरी आहे. पण, ते इंधन परवडणारेनसेल, तर त्याचा काय फायदा? भारत आजही आपल्याकच्च्या तेलाच्या गरजेच्या सुमारे 85% आयात करतो.एलपीजीच्या बाबतीतही 60% पेक्षा जास्त अवलंबित्वआयातीवर आहे. मोदी सरकारही यात निष्क्रिय राहिलेलेनाही. सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आणि एलपीजी वापराला प्राधान्य दिले. असो, हीतर कथेची एक बाजू झाली. खरा प्रश्न हा आहेकी,कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या, तेव्हा त्याचाफायदा ग्राहकांना का दिला गेला नाही? उलट, करवाढवले गेले जेणेकरून ग्राहक वाढीव किंमत मोजतराहील आणि सरकारी तिजोरी सुरक्षित राहील. आजदिसणाऱ्या असंतोषाचे कारण हीच विषमता आहे.केरळचा चहावाला वाढत्या खर्चामुळे दुकान बंद करतो.चेन्नईतील डिलिव्हरी बॉय इंधनावर गरजेपेक्षा जास्तखर्च करत आहे. शेतकरी डिझेल आणि खतांच्यावाढत्या किमतींशी झुंजत आहे. रोजंदारी मजूर आपलीउपजीविका गमावत आहे. हे स्पष्ट करते की कशा प्रकारेदूरवरची युद्धे देशांतर्गत संकट बनतात. असे असूनही,प्रतिसादांमध्ये पुरवठा पुरेसा असल्याचे सांगून त्याचा दोषसाठेबाजी आणि नफेखोरीवर टाकला जातो.सकारात्मक बाजू पाहता, गेल्या दशकातील आपलाचांगला विकास दर आणि तुलनेने कमी महागाईनेआशावादी राहण्याचे कारण दिले आहे. पण व्यापकस्थिरतेचे महत्त्व तेव्हाच असते, जेव्हा जमिनीवरीलपरिस्थितीही सुधारलेली असते. दुसरे म्हणजे आयातकेलेल्या ऊर्जेवर आपले अवलंबित्व आहे हे भारतालामाहित असूनही, वास्तविक ऊर्जा सुरक्षेच्या दिशेनेआपली पावले विसंगत राहिली आहेत. चीननेदीर्घकालीन करार , अक्षय ऊर्जेतील विस्तार याद्वारेसुरक्षा मजबूत केली. याउलट, भारत आधीच तयारीकरण्याऐवजी परिस्थिती उद्भवल्यावर केवळ प्रतिसाददेणारा वाटतो. हे खरे आहे की ऊर्जा बदलांना वेळलागतो. भारताच्या विकासाच्या गरजाही मोठ्या आहेत.म्हणूनच तातडीची पावले उचलावीत. पहिले पाऊलआहे - प्रामाणिकपणा. सरकारे म्हणतात की परिणाममर्यादित आहेत, तेव्हा ते स्वतःचा फायदा करत नसतात.हे वास्तव स्वीकारणे म्हणजे कमजोरी नाही, तरविश्वासार्ह धोरणाचा तो पाया आहे. दुसरे पाऊल म्हणजे- तात्काळ दिलासा. इंधनाबाबत पारदर्शक आणिनियमांवर आधारित आराखडा असावा.जेणेकरूनतेलाच्या किमती कमी झाल्यावर त्याचा फायदाग्राहकांना मिळेल. एलपीजी सबसिडीवरही फेरविचार करणे आवश्यकआहे. आज महागाईचा दबाव निम्न मध्यमवर्गापर्यंतपोहोचला आहे. अशा स्थितीत अल्पकालीन दिलासापुरेसा ठरणार नाही. भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेच्यादिशेने अधिक गंभीर प्रयत्न करावे लागतील. अक्षयऊर्जा वेगाने स्वीकारावी लागेल. सर्वात महत्त्वाचेम्हणजे ऊर्जा धोरणाला आर्थिक रणनीतीशी जोडणेआवश्यक आहे. कारण ऊर्जा हाच कृषी, उद्योग आणिसेवा यांसारख्या प्रमुख आर्थिक क्षेत्रांचा पाया आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) सकारात्मक बाजू पाहिल्यास गेल्यादशकातील आपला चांगला विकास दरआणि तुलनेने कमी महागाईनेआपल्याला आशावादी राहण्याचे कारणदिले. परंतु प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा होते तेव्हा व्यापक स्थिरतेचे महत्त्व असते.
हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

पोलिस भरती झाल्याचा बनाव करून २६ वर्षीय तरुणाने कुटुंबासह संपूर्ण समाजालाच फसवलं. #pune
रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणारी संतापजनक घटना पुण्यात उघड…
आप्पा बळवंत चौकात भरधाव बसने थेट दुकानात घुसत मोठी खळबळ उडवली.
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




