
Mumbai : राज्यात मागील काही महिन्यांपासून ज्या निवडणुकांची प्रतीक्षा होती त्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या अंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने आजपासून सदर जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागली आहे. या निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तसंच मजमोजणी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी (ZP & Panchayat Samiti Election) १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छानणी २२ जानेवारी रोजी होईल आणि उमेदवारी माघारीची अंतिम तारीख २७ जानेवारी असणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप- २७ जानेवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर होईल.
|
Pune Crime : मैत्रिणीच्या घरी मेजवानी, बोलता बोलता विषय भरकटला; कोंढव्यात थरारक घटना! |
दरम्यान, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या इतर २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका नंतर घेण्यात येणार आहेत.
राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या पुणेजिल्हा परिषदेसह १२ जिल्हा परिषदा आणि त्या जिल्ह्यांतील पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीची तयारी करा, अशा शब्दांत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठवून आदेश दिला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
- दुबार मतदार आम्ही निश्चित केले असून त्याबाबतची कार्यवाही अधिकारी करतील.
- मताधिकार मोबाईलअॅपद्वारे मतदाराला त्याला त्याचा निवडणूक विभाग, मतदान केंद्र शोधता येईल
- मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवरही त्याचं नाव टाकून त्याचे मतदान केंद्र शोधता येईल
- ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर आणि तान्ह्या बाळासह असणाऱ्या स्त्रियांना मतदानावेळी प्राधान्य देण्यात येईल
- १२ जिल्हा परिषदांमधून ७३१ सदस्य निवडून दिले जातील
- १२५ पंचायत समित्यांमधून १ हजार ४६२ सदस्य निवडून दिले जातील
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकाअंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांना होती. दरम्यान, निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान, राज्यातील २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर येत्या २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाने मुदतवाढ मागितली होती. त्यावर येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले. त्यानंतर आज ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असणारे १२ जिल्हे असून त्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या अंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसिलदारांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियु्क्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका या निर्भय, मुक्त तसेच पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची सर्व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच पर्यवेक्षक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel





https://shorturl.fm/y8m3D