यवतमाळ: खेळता खेळता चिमुकला कारमध्ये शिरला; दरवाजा उघडता न आल्याने गुदमरून मृत्यू,

यवतमाळ: जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे एका अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेत खेळता खेळता बंद कारमध्ये अडकलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा गुदमरून व उकाड्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे एरणीवर आला आहे. मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव अंश सुरज केळझरकर (वय ४ वर्षे) असे आहे.

मिळालेल्या सविस्तर अधिकृत माहितीनुसार, घटना घडलेल्यागंभीर झाली. उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १७)  दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंश हा आपल्या घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. खेळता खेळता तो घराशेजारी उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाजवळ (कार) गेला आणि नकळतपणे त्या कारच्या आतमध्ये शिरला. मात्र, दुर्दैवाने कारच्या आतमधून दरवाजा उघडता न आल्यामुळे तो गाडीतच अडकून पडला. बराच वेळ तो घरासमोर किंवा आजूबाजूला दिसत नसल्याने कुटुंबियांनी सुरुवातीला तो जवळच कुठेतरी खेळत असेल असा समज करून फारशी शोधाशोध केली नाही. मात्र, काही वेळानंतरही तो परत न आल्याने कुटुंबियांनी त्याची कसून शोधाशोध सुरू केली.

काही वेळाने जेव्हा शेजाऱ्यांच्या उभ्या असलेल्या कारजवळ जाऊन पाहिले, तेव्हा अंश कारच्या आतमध्ये अत्यंत बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बाहेरील कडक ऊन आणि कारचे दरवाजे बंद असल्यामुळे आतील हवेचे तापमान वाढले होते आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे व गुदमरल्यामुळे त्याची प्रकृती अतिशय खालावली होती. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला कारमधून बाहेर काढून उपचारासाठी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. परंतु, प्राथमिक उपचारादरम्यान तेथे ऑक्सिजन आणि पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचा व रुग्णवाहिका मिळण्यास उशीर झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्त्यांच्या रुग्णवाहिकेमार्फत अंशला तातडीने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील बालरोग तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, रुग्णालयात आणण्यापूर्वीच साधारण दीड ते दोन तास आधीच त्याचा गुदमरून मृत्यू झाला असावा, कारण मुलाचे हात-पाय कडक झाले होते आणि डोळ्यांच्या बाहुल्याही सुकल्या होत्या. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *