
मुंबईचा 'कांबळी' – हे नाव ऐकताक्षणी डोळ्यांसमोर येतो तो सचिन तेंडुलकरचा बालमित्र, शारदा आश्रम विद्यामंदिरचा तो डावखुरा फटकेबाज, ज्याने केवळ २१ वर्षांच्या लहान वयात कसोटी क्रिकेटमध्ये दोन डबल सेंच्युरी ठोकून भारताला वेड लावलं होता!
शालेय क्रिकेटमधला विश्वविक्रम
१९८८ मध्ये हरिस शील्ड स्पर्धेत सचिन तेंडुलकरसोबत ६६४ धावांची अविश्वसनीय भागीदारी! हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. त्या वेळी दोघेही केवळ १५-१६ वर्षांचे होते. मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात त्या जोडीला 'सचिन-कांबळी' म्हणूनच ओळखले जायचे. कांबळीने रणजी ट्रॉफीमध्येही पहिल्या चेंडूवर सिक्स मारून दमदार एंट्री केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला स्फोटक उदय
१९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध वानखेडेवर कसोटी डेब्यू त्याने केला. तिसऱ्या कसोटीतच २२४ धावा! लगेच पुढच्या कसोटीत झिम्बाब्वेविरुद्ध २२७! मग श्रीलंकेविरुद्ध १२५ आणि १२०. म्हणजे पहिल्या ६ कसोटी सामन्यांत ४ शतके, त्यात २ डबल शतके!
विशेष रेकॉर्ड्स:
भारतीय क्रिकेटरांमध्ये सर्वाधिक कसोटी सरासरी (५४.२०) – पण फक्त १७ कसोटी खेळून!
१४ इनिंग्जमध्ये १००० धावा – भारतीय क्रिकेटरांमध्ये सर्वात वेगवान.
तीन वेगवेगळ्या देशांविरुद्ध (इंग्लंड, झिम्बाब्वे, श्रीलंका) सलग तीन कसोटी शतके – जगात एकमेव खेळाडू!
वनडे क्रिकेटमध्येही १०४ सामन्यांत २४७७ धावा, २ शतके आणि १४ अर्धशतके. १९९५ च्या एशिया कप विजेते संघाचा भाग.
७ कसोटीनंतर कांबळीची सरासरी १००.४ होती – डॉन ब्रॅडमनपेक्षाही जास्त!
कुठे कमी पडली कांबळी ची प्रतिभा?
प्रचंड प्रतिभा होती, पण निवड मंडळही कुठेतरी त्याला डावलत होतं.त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर आणि खेळावर पडत होता.वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत शॉर्ट पीच बॉलिंग वर खेळताना त्याला अडचण येत होती, पण अशा अशा अडचणींचा सामना प्रत्येक खेळाडूला करावा लागत असतो.त्यामुळे कांबळी हा शॉर्ट पिच बॉलिंगसमोर कमकुवत होता असा म्हणता येणार नाही. ऑफ-फील्ड अनुशासनाचा अभाव, पार्ट्या, वाद आणि व्यक्तिगत समस्या यामुळे २३ वर्षांच्या वयातच कसोटी संघातून तो बाहेर पडला. वनडे २००० पर्यंत चालले, पण नियमित जागा मिळाली नाही.
मुंबईसाठी मात्र तो रणजी ट्रॉफीचा रणबाज होता – १२९ फर्स्ट क्लास सामन्यांत ९९६५ धावा, सरासरी ५९.९७, ३५ शतके!
जीवनातील उतार-चढाव
क्रिकेट सोडल्यानंतर आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, व्यसन आणि आरोग्याच्या तक्रारी. २०११ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती. १९९६ विश्वचषक सेमीफायनलबद्दल वादग्रस्त विधान करूनही चर्चेत राहिला.
सध्याची स्थिती (२०२६)
कांबळी (वय ५४) गंभीर आरोग्य समस्या भोगत आहेत – ब्रेन क्लॉट, युरिनरी इन्फेक्शन, बोलण्यात अडचण. भाऊ विरेंद्र यांनी प्रार्थना आणि मदतीची अपील केली आहे. सचिन तेंडुलकरसह अनेक मित्र (सुनील गावस्कर इ.) संपर्कात आहेत आणि मदत करत आहेत. कांबळी अजूनही घरी रिकव्हरीत आहे, पण पूर्ण बरा होण्यासाठी वेळ लागेल.
काय शिकवतो कांबळीचा जीवनप्रवास?
प्रतिभा पुरेशी नाही, यश हाताळण्याची तयारीही हवी. लहान वयात मिळालेले यश, प्रसिद्धी आणि पैसा यांचा समतोल साधता आला नाही तर... कांबळी हा त्याचा जिवंत उदाहरण आहे. तरीही त्याची नेत्रदीपक ड्राईव्ह आणि बॅटिंग स्टाइल आजही क्रिकेट रसिकांना आठवते.
“तो खेळाला ते दिवस सोनेरी होते... पण आयुष्य हे ११ खेळाडूंच्या टीमसारखे नाही, एकट्यानेही लढावे लागते!”
विनोद कांबळी – एक चमकता तारा, जो फार लवकर मावळला. पण त्याने सोडलेली आठवण आणि धडे मात्र कायम राहतील.
प्रतिभावान खेळाडूंसाठी तो इशारा आहे – शिस्त आणि मानसिक ताकद हीच खरी खेळी!
- विश्वजीत माने
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel





https://shorturl.fm/U64lp