
मुंबईचा 'कांबळी' – हे नाव ऐकताक्षणी डोळ्यांसमोर येतो तो सचिन तेंडुलकरचा बालमित्र, शारदा आश्रम विद्यामंदिरचा तो डावखुरा फटकेबाज, ज्याने केवळ २१ वर्षांच्या लहान वयात कसोटी क्रिकेटमध्ये दोन डबल सेंच्युरी ठोकून भारताला वेड लावलं होता!
शालेय क्रिकेटमधला विश्वविक्रम
१९८८ मध्ये हरिस शील्ड स्पर्धेत सचिन तेंडुलकरसोबत ६६४ धावांची अविश्वसनीय भागीदारी! हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. त्या वेळी दोघेही केवळ १५-१६ वर्षांचे होते. मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात त्या जोडीला 'सचिन-कांबळी' म्हणूनच ओळखले जायचे. कांबळीने रणजी ट्रॉफीमध्येही पहिल्या चेंडूवर सिक्स मारून दमदार एंट्री केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला स्फोटक उदय
१९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध वानखेडेवर कसोटी डेब्यू त्याने केला. तिसऱ्या कसोटीतच २२४ धावा! लगेच पुढच्या कसोटीत झिम्बाब्वेविरुद्ध २२७! मग श्रीलंकेविरुद्ध १२५ आणि १२०. म्हणजे पहिल्या ६ कसोटी सामन्यांत ४ शतके, त्यात २ डबल शतके!
विशेष रेकॉर्ड्स:
भारतीय क्रिकेटरांमध्ये सर्वाधिक कसोटी सरासरी (५४.२०) – पण फक्त १७ कसोटी खेळून!
१४ इनिंग्जमध्ये १००० धावा – भारतीय क्रिकेटरांमध्ये सर्वात वेगवान.
तीन वेगवेगळ्या देशांविरुद्ध (इंग्लंड, झिम्बाब्वे, श्रीलंका) सलग तीन कसोटी शतके – जगात एकमेव खेळाडू!
वनडे क्रिकेटमध्येही १०४ सामन्यांत २४७७ धावा, २ शतके आणि १४ अर्धशतके. १९९५ च्या एशिया कप विजेते संघाचा भाग.
७ कसोटीनंतर कांबळीची सरासरी १००.४ होती – डॉन ब्रॅडमनपेक्षाही जास्त!
कुठे कमी पडली कांबळी ची प्रतिभा?
प्रचंड प्रतिभा होती, पण निवड मंडळही कुठेतरी त्याला डावलत होतं.त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर आणि खेळावर पडत होता.वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत शॉर्ट पीच बॉलिंग वर खेळताना त्याला अडचण येत होती, पण अशा अशा अडचणींचा सामना प्रत्येक खेळाडूला करावा लागत असतो.त्यामुळे कांबळी हा शॉर्ट पिच बॉलिंगसमोर कमकुवत होता असा म्हणता येणार नाही. ऑफ-फील्ड अनुशासनाचा अभाव, पार्ट्या, वाद आणि व्यक्तिगत समस्या यामुळे २३ वर्षांच्या वयातच कसोटी संघातून तो बाहेर पडला. वनडे २००० पर्यंत चालले, पण नियमित जागा मिळाली नाही.
मुंबईसाठी मात्र तो रणजी ट्रॉफीचा रणबाज होता – १२९ फर्स्ट क्लास सामन्यांत ९९६५ धावा, सरासरी ५९.९७, ३५ शतके!
जीवनातील उतार-चढाव
क्रिकेट सोडल्यानंतर आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, व्यसन आणि आरोग्याच्या तक्रारी. २०११ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती. १९९६ विश्वचषक सेमीफायनलबद्दल वादग्रस्त विधान करूनही चर्चेत राहिला.
सध्याची स्थिती (२०२६)
कांबळी (वय ५४) गंभीर आरोग्य समस्या भोगत आहेत – ब्रेन क्लॉट, युरिनरी इन्फेक्शन, बोलण्यात अडचण. भाऊ विरेंद्र यांनी प्रार्थना आणि मदतीची अपील केली आहे. सचिन तेंडुलकरसह अनेक मित्र (सुनील गावस्कर इ.) संपर्कात आहेत आणि मदत करत आहेत. कांबळी अजूनही घरी रिकव्हरीत आहे, पण पूर्ण बरा होण्यासाठी वेळ लागेल.
काय शिकवतो कांबळीचा जीवनप्रवास?
प्रतिभा पुरेशी नाही, यश हाताळण्याची तयारीही हवी. लहान वयात मिळालेले यश, प्रसिद्धी आणि पैसा यांचा समतोल साधता आला नाही तर... कांबळी हा त्याचा जिवंत उदाहरण आहे. तरीही त्याची नेत्रदीपक ड्राईव्ह आणि बॅटिंग स्टाइल आजही क्रिकेट रसिकांना आठवते.
“तो खेळाला ते दिवस सोनेरी होते... पण आयुष्य हे ११ खेळाडूंच्या टीमसारखे नाही, एकट्यानेही लढावे लागते!”
विनोद कांबळी – एक चमकता तारा, जो फार लवकर मावळला. पण त्याने सोडलेली आठवण आणि धडे मात्र कायम राहतील.
प्रतिभावान खेळाडूंसाठी तो इशारा आहे – शिस्त आणि मानसिक ताकद हीच खरी खेळी!
- विश्वजीत माने
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel




https://shorturl.fm/U64lp