
Unseasonal Rain : राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढचे काही दिवस अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट होत आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात आला आहे. आपल्या डोळ्यादेखत उभं पिक आडवं झाल्याचे पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
अहिल्यानगर -
सोमवारी सायंकाळी अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे कोपरगाव, राहाता, राहुरी या तालुक्यांना चांगलाच तडाखा दिला. काही ठिकाणी गारांचा सडा पडल्याचे बघायला मिळाले. गारपिटीसह पावसाने झोडपल्याने फळ बागांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
परभणी -
परभणी शहरासह जिल्ह्यात सोमवारी सायंकाळच्या अचानक जोरदार वादळी वारे सुटले. हे वारे इतके जोरदार होते की या वाऱ्याने सगळीकडे दानादान उडवून दिली. वर्षभर जोमात आलेले पिके मात्र अर्ध्या तासाच्या वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झालं. शेतकऱ्यांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला दिसत आहे. मोठ्या केळीच्या बागा, आंब्याच्या बागांचे मोठं नुकसान झाले आहेत. तर या फळबागा अक्षरशा भुईसपाट झालेल्या दिसत आहेत. या पिकाची तात्काळ प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे
|
|
नांदेड -
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. या वादळी वाऱ्यामुळे नांदेडच्या अर्धापूर मुदखेड या तालुक्यातील केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले. केळीच्या बागा अक्षरशः आडव्या झाल्या आहेत. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी काढणीला आली होती. परंतू सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेला मोठा फटका बसला. केळीसह आंबा आणि उन्हाळी पिकांचे देखील या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे.
अमरावती -
अमरावतीत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परतवाडा, चिखलदरा भागात गारपीट झाली. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. पुढील ३ दिवस पश्चिम विदर्भात गारांच्या पावसाची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे भुईमूग, तीळ, कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
बुलडाणा -
बुलडाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. लोणार तालुक्यातील बिबीसह परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्याने अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाले. या पावसामुळे शेतातील कांदा , ज्वारी, भाजीपाला, फळपीकसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील शेतकरी बाजीराव ताऊबा आंधळे यांच्या शेतात वीज पडून तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये त्यांचे मोठं नुकसान झाले.
जळगाव -
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाने पिलखोड शिवाराला झोडपून काढले. अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मका, ज्वारी, बाजरी, तसेच शेतात काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
शहर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
- पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख
- शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर
- पुणे: पिंपरीतील कुटुंब मृत्यू प्रकरण, घरातून ऑनलाईन मागवलेले 'सोडियम नायट्रेट' आणि सुसाईड नोट हस्तगत!
महाराष्ट्र
- ठाणे: भिवंडीत इमारत दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, तर डोंबिवलीतील गुन्हेगारी आणि नवी मुंबईतील ड्रग्स कारवाईमुळे खळबळ
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
- पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख
- शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली



























Subscribe to my channel




