
Unseasonal Rain : राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढचे काही दिवस अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट होत आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात आला आहे. आपल्या डोळ्यादेखत उभं पिक आडवं झाल्याचे पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
अहिल्यानगर -
सोमवारी सायंकाळी अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे कोपरगाव, राहाता, राहुरी या तालुक्यांना चांगलाच तडाखा दिला. काही ठिकाणी गारांचा सडा पडल्याचे बघायला मिळाले. गारपिटीसह पावसाने झोडपल्याने फळ बागांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
परभणी -
परभणी शहरासह जिल्ह्यात सोमवारी सायंकाळच्या अचानक जोरदार वादळी वारे सुटले. हे वारे इतके जोरदार होते की या वाऱ्याने सगळीकडे दानादान उडवून दिली. वर्षभर जोमात आलेले पिके मात्र अर्ध्या तासाच्या वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झालं. शेतकऱ्यांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला दिसत आहे. मोठ्या केळीच्या बागा, आंब्याच्या बागांचे मोठं नुकसान झाले आहेत. तर या फळबागा अक्षरशा भुईसपाट झालेल्या दिसत आहेत. या पिकाची तात्काळ प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे
|
|
नांदेड -
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. या वादळी वाऱ्यामुळे नांदेडच्या अर्धापूर मुदखेड या तालुक्यातील केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले. केळीच्या बागा अक्षरशः आडव्या झाल्या आहेत. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी काढणीला आली होती. परंतू सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेला मोठा फटका बसला. केळीसह आंबा आणि उन्हाळी पिकांचे देखील या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे.
अमरावती -
अमरावतीत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परतवाडा, चिखलदरा भागात गारपीट झाली. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. पुढील ३ दिवस पश्चिम विदर्भात गारांच्या पावसाची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे भुईमूग, तीळ, कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
बुलडाणा -
बुलडाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. लोणार तालुक्यातील बिबीसह परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्याने अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाले. या पावसामुळे शेतातील कांदा , ज्वारी, भाजीपाला, फळपीकसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील शेतकरी बाजीराव ताऊबा आंधळे यांच्या शेतात वीज पडून तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये त्यांचे मोठं नुकसान झाले.
जळगाव -
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाने पिलखोड शिवाराला झोडपून काढले. अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मका, ज्वारी, बाजरी, तसेच शेतात काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



