Truck Carrying Tires Catches Fire on Kolhapur-Ratnagiri Highway; Loss of Rs 20 Lakhs.

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर भीषण आग: टायर घेऊन जाणाऱ्या ट्रकची दुभाजकाला धडक, २० लाखांचे नुकसान.

Truck Carrying Tires Catches Fire on Kolhapur-Ratnagiri Highway; Loss of Rs 20 Lakhs.रत्नागिरी: बेळगावहून रत्नागिरीच्या दिशेने नवीन टायर घेऊन येणाऱ्या एका ट्रकने पेट घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात तब्बल २० लाख रुपयांचे नवीन टायर जळून खाक झाले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आवळी फाटा (ता. पन्हाळा) येथे बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

 

नेमकी घटना कशी घडली? 'केए २२ एबी १६४३' या क्रमांकाचा आयशर ट्रक बेळगावहून सुमारे वीस लाख रुपये किमतीचे नवीन टायर घेऊन रत्नागिरीकडे निघाला होता. वाहनचालक येलगुंड यल्लाप्पा धनोरधर हे ट्रक चालवत असताना, आवळी फाट्यानजीक ट्रकवरील ताबा सुटल्याने तो रस्त्यावरील दुभाजकाला (डिवायडर) जाऊन धडकला.

शॉर्ट सर्किटमुळे आगीने घेतले रौद्ररूप: धडकेनंतर ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. केबिनमध्ये लागलेली आग काही क्षणांतच ट्रकमध्ये असलेल्या टायरपर्यंत पोहोचली. टायर अतिशय ज्वलनशील असल्याने आगीने पाहता-पाहता रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण वाहन आगीच्या विळख्यात सापडले.

अग्निशमन दलाची कामगिरी: घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस अंमलदार अतुल निकम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी कोल्हापूर व मलकापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत आगीने ट्रकमधील सर्व मालाचे मोठे नुकसान केले होते.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *