सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विट्याजवळील रेणावी घाटामध्ये झालेल्या दोन एसटी बसच्या भीषण समोरासमोरच्या धडकेतील मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे. उपचारादरम्यान १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर अपघाताची दखल घेत राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे, तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार आहे.
घटनाक्रमाची सविस्तर माहिती अशी की, विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्या जवळच्या रेणावी घातात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. विटा आगाराची विटा ते भिवघाट जाणारी बस आणि मेढा आगाराची विजापूर ते मेढा जाणारी बस यांच्यात रेणावी घाटाच्या चढणीवर तीव्र स्वरूपाची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसेसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेच्या सुरुवातीच्या धक्क्यातच खानापूर येथील नंदाबाई हरिदास त्रंबके (वय ६०) आणि बांबवडे (ता. खानापूर/जि. सातारा) येथील धोंडिराम लक्ष्मण पाटील (वय ७८) हे दोघे प्रवासी जागीच ठार झाले होते.
या अपघातात बसमधील ३८ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले होते. अपघातानंतर घाटातील अंधार, मोबाइल नेटवर्कची अनुपलब्धता आणि तीव्र वळणे यामुळे सुरुवातीला मदतकार्यात काही प्रमाणात अडथळे आले होते. मात्र, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेऊन जखमी प्रवाशांना बस बाहेर काढले आणि उपचारासाठी विट्यातील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात गंभीर जखमी झालेली १७ वर्षीय तरुणी साक्षी चंद्रकांत पवार (रा. ऐनवाडी, ता. खानापूर) हिच्यावर विट्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. साक्षी ही बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली, ज्यामुळे या अपघातातील बळींची संख्या वाढून तीन झाली आहे. तिच्या अकाली जाण्याने ऐनवाडी गावावर आणि तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघाताची गंभीर दखल घेत स्थानिक आमदार सुहास बाबर यांनी रुग्णालयाला भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय जखमी प्रवाशांना योग्य उपचार मिळावेत यासाठी सर्व उपचाराचा खर्च राज्य शासनाकडून केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. घाटातील वाहतुकीचे नियम आणि एसटी बसच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याबाबत नागरिक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




