केरळ: तृसूर जिल्ह्यात एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. तामिळनाडूच्या दिंडीगुल येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात (Engineering College) शिक्षण घेणारे आठ तरुण विद्यार्थी एका रस्ता अपघातात जागीच व उपचारादरम्यान मृत पावल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री ११:४० वाजण्याच्या सुमारास केरळमधील तृसूर जिल्ह्यातील कैपामंगलम येथील पानामबिक्कुन्नू केंद्रानजीक राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH-66) वर घडला. हे सर्व तरुण एका कारमधून गुरुवायूर येथून कोडुंगल्लूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असलेल्या एका पट्ट्याभोवती बॅरिकेट्स लावून वाहतूक वळवण्यात आली होती. या बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यार सुसाट वेगात धावणारी त्यांची कार चालकाचा अंदाज चुकल्यामुळे रस्त्याच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या एका वस्तूंनी भरलेल्या मालवाहू लॉरीच्या (ट्रक) मागच्या भागाला अत्यंत वेगाने धडकली. ही लॉरी महाराष्ट्रात नोंदणीकृत (Maharashtra-registered) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
धडक इतकी भयानक होती की, कारचा चुराडा झाला आणि आतील प्रवासी गंभीरपणे अडकले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशामक दल (Fire and Rescue personnel) आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रचंड मेहनत घेत कारचा भाग गॅस कटरने कापून आतील तरुणांना बाहेर काढले. या दुर्घटनेत ६ विद्यार्थ्यांनी घटनास्थळावरच प्राण सोडले, तर गंभीर जखमी झालेल्या इतर २ जणांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांची ओळख पटवली असून त्यांच्याजवळील ओळखपत्रांच्या (ID Cards) आधारे मृतांचे नातेवाईक व कुटुंबीयाेशी संपर्क साधण्यात आला आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने सूर्या, युवसंजीव, विश्वा, जोशुा (दिंडीगुल येथील) तसेच संतोष आणि प्रसन्ना (मदुराई येथील) यांचा समावेश असून इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी कैपामंगलम पोलिसांनी पसार झालेल्या लॉरी चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ नुसार सदोष मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
शहर
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
- मुंबई: ठाण्यातील स्टेजवर मोठा प्रसंग एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट, आमदार प्रताप सरनाईकांनी तातडीने आग केली विझवली!
- नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांचे १३ दिवसांचे उपोषण मागे; ३ अधिकारी निलंबित, ५ लाखांची मदत, पण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी लढा सुरूच राहणार!
- नागपूर: आठ रुपयांत मुलांना खाऊ कसा घालणार? महिला बचत गटांची ८ महिन्यांची बिले रखडल्यामुळे नागपूरसह राज्यभरात आर्थिक संकट!
महाराष्ट्र
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
- मुंबई: ठाण्यातील स्टेजवर मोठा प्रसंग एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट, आमदार प्रताप सरनाईकांनी तातडीने आग केली विझवली!
- नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांचे १३ दिवसांचे उपोषण मागे; ३ अधिकारी निलंबित, ५ लाखांची मदत, पण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी लढा सुरूच राहणार!
- नागपूर: आठ रुपयांत मुलांना खाऊ कसा घालणार? महिला बचत गटांची ८ महिन्यांची बिले रखडल्यामुळे नागपूरसह राज्यभरात आर्थिक संकट!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड

























Subscribe to my channel



