Tragedy Strikes Dharashiv: Farmer Killed by Lightning Strike Just 8 Days Before Daughter’s Wedding

धाराशिव: लेकीच्या लग्नाला उरले अवघे ८ दिवस; अक्षता पडण्यापूर्वीच वीज कोसळून बापाचा दुर्दैवी अंत

Tragedy Strikes Dharashiv: Farmer Killed by Lightning Strike Just 8 Days Before Daughter’s Weddingधाराशिव: नियतीचा खेळ अत्यंत क्रूर असतो, याचा प्रत्यय धाराशिव जिल्ह्यामध्ये आला आहे. ज्या हातांनी आपल्या एकुलत्या एक लेकीचे कन्यादान करायचे होते, त्याच पित्याचा लेकीच्या लग्नापूर्वी अवघ्या ८ दिवस आधी अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. बबन गोविंद लांडगे (५०, रा. विठ्ठलवाडी) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण विठ्ठलवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?
मंगळवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास विठ्ठलवाडी परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाचे ढग दाटून आले होते. बबन लांडगे हे आपल्या शेतात जनावरांचा चारा (कडबा) पावसापासून वाचवण्यासाठी त्यावर ताडपत्री टाकत होते. यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईलवर गाणी सुरू होती. अचानक वीज त्यांच्या अंगावर कोसळली. विजेचा धक्का इतका भीषण होता की, त्यांच्या खिशातील मोबाईलचे तुकडे झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

लग्नाघरात पसरली शांतता:
बबन लांडगे यांच्या मुलीचे लग्न अवघ्या ८ दिवसांवर आले होते. घरात लग्नाची लगबग सुरू होती, निमंत्रण पत्रिका वाटण्याचे काम सुरू होते. मात्र, एका क्षणात आनंदाचे रूपांतर दुःखात झाले. बबन लांडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. ज्या बापाने लेकीच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, त्यांच्याच जाण्याने लांडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *