भारत आणि अमेरिकेत झालेल्या ट्रेड डीलवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक द्वंद सुरु आहे. यावरुन पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी विचारपूर्वक, बनावटी आणि खोटी कहाणी रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत असा आरोप पीयूष गोयल यांनी केला. शेतकरी सुरक्षित असेल, तर देशाचा विकास होईल असं सुद्धा गोयल म्हणाले. “राहुल गांधी हे काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसले आहेत, जे स्वत:ला शेतकरी नेते भासवतात. ते पूर्णपणे आधारहीन आणि चुकीचं बोलत आहेत. तुम्ही त्यांना मायक्रोफोन घेऊन फिरताना, चर्चा रेकॉर्ड करताना पाहू शकता. याची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार असावी. कारण त्यांनी जे काही दावे केलेत ते खोटे आहेत” असा आरोप केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला.
“भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांचं हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आलय” असं ठामपणे पीयूष गोयल यांनी सांगितलं. “या ट्रेड डीलमुळे शेतकरी, मच्छीमार, मेहनती युवावर्ग, MSMEs, स्टार्टअप्स, कारागिर यांना मदत होणार आहे. सोयाबीन आणि मक्यावर कुठलीही सवलत दिलेली नाही. राहुल गांधी हे खोटं बोलून शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतायत” असं पीयूष गोयल म्हणाले.
सफरचंद, अक्रोड आयातीवर काय म्हणाले?
गावच्या लोकांमध्ये विनाकारण भिती निर्माण करण्यासाठी तथ्यहीन आरोप होत असल्याबद्दल विरोधा पक्षावर टीका केली. सफरचंद आयातीच्या निर्णयावरुन सुरु असलेल्या वादावर पीयूष गोयल बोलले की, “भारत आधीपासूनच दरवर्षी 5.50 लाख टन सफरचंदांची आयात करत आला आहे. कारण देशांतर्गत उत्पादनातून 80 टक्के मागणी पूर्ण होते. आम्ही सफरचंदांच्या अमर्यादा आयातीला परवानगी दिलेली नाही. आम्ही फक्त एक कोटा दिलाय, जो सध्याच्या आयातीपेक्षा पण कमी आहे. त्यावर सुद्धा 25 रुपयाची ड्युटी लागेल”
“अक्रोड आयतीच्या बाबतीत सुद्धा असच आहे. भारत वर्षाला 60 हजार मेट्रिक टन अक्रोड आयात करतो. त्यातला 13,000 मेट्रिक टनचा फार कमी कोटा दिलाय. अशा सौद्यामुळे स्थानिक उत्पादकांचं नुकसान होण्याची शक्यता कमी आहे” असं गोयल म्हणाले.
जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल
काँग्रेसवर निशाणा साधताना पीयूष गोयल यांनी त्यांच्या जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल केला. “काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA राजवटीत भारताने जवळपास 20 अब्ज डॉलर्सचं शेती सामान आयात केलं होतं. यात डेअरी उत्पादनं सुद्धा होती” याची आठवण गोयल यांनी करुन दिली. US सोबतच्या ट्रेड डीलमध्ये भारताने डेअरी उत्पादनांना बाहेर ठेवलं आहे. “शेतकऱ्यांसोबत त्यांनी धोका केला, त्या बद्दल राहुल गांधी यांनी बोलावं. विरोधी पक्ष कधीपर्यंत अशा कपोलकल्पित गोष्टी पसवरणार? शेतकरी सुरक्षित तर देश विकसित होईल” असही गोयल बोलले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



