मुंबई: दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जचं समर्थन, आंदोलकांवर गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीस CJP आंदोलनावर काय-काय म्हणाले?

मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. पोलिसांनी मोठा संयम दाखवला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जेवढी कारवाई करणे गरजेचे होते, तेवढीच कारवाई पोलिसांनी केल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणे कधीही आवडत नाही, परंतु जर पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवले नस्ते तर अनेक अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या, असा दावा त्यांनी केला.

 

नवी दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. परंतु, संविधानाने दिलेले हक्क आणि सोबतच संविधानाने सोपवलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणीही परवानगी घेऊन शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असेल, तर त्याला नक्कीच परवानगी दिली जाईल. मात्र, जाणीवपूर्वक राजकीय अस्थिरता किंवा अशांतता निर्माण करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन करणे आणि हिंसाचार घडवणे योग्य नाही, आणि अशा लोकांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जेव्हा एखादे आंदोलन 'फेसलेस' (चेहरा नसलेले) असते, तेव्हा काही वेगळ्या प्रवृत्ती त्यामध्ये शिरतात. अशा प्रवृत्ती आंदोलनाचा फायदा घेऊन, आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. दिल्लीत झालेल्या आंदोलनातही अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. ज्या संघटनांचा या विषयाशी काहीही संबंध नाही, त्या अराजकता कशी निर्माण होईल याचे प्रयत्न करत असून पोलिसांनी गाड्या उलटवणे, तोडफोड करणे आणि दगडफेक यांसारख्या गोष्टी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *