
Thackeray Alliance : ठाकरे बंधूंनी अखेर युतीची घोषणा केली आहे. वरळीतील पंचतारांकित हॉटेलात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी युतीची घोषणा केली. मुंबईचा पुढील महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल, असं राज ठाकरे यांनी यावेळी अगदी ठासून सांगितलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आता मुंबईत ठाकरे विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल.
ठाकरे बंधू सोबत आल्यानं आता भाजपला त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे. ठाकरे बंधू सोबत आल्याचा सर्वाधिक फायदा एकनाथ शिंदेना होऊ शकतो. ठाकरे बंधू आल्यानं परिस्थिती बदलेल, समीकरणं बदलतील आणि त्यामुळे आम्हाला रणनीतीही बदलावी लागेल, ही बाब भाजपचे अनेक नेते खासगीत मान्य करतात.
|
|
'दुभंगलेली शिवसेना आणि भाजपची वाढलेली ताकद पाहता स्वबळावर लढून मुंबई महापाालिका निवडणूक जिंकता येईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं परिस्थिती बदलली आहे. '२०१७ मध्ये शिवसेना एकसंध असताना निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ५० हून अधिक नगरसेवक आता एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांना दूर ठेवणं भाजपला चालणार नाही,' असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले.
प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता. त्यावरुन ठाकरे बंधूंनी रान पेटवलं. अखेर महायुती सरकारला भाषा सक्तीचा जीआर मागे घ्यावा लागला. त्यावेळी ठाकरे बंधूंनी मराठी भाषेचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आणि हाच मुद्दा त्यांना एकत्र घेऊन आला. या मुद्द्याला मराठी जनांचा पाठिंबाही मिळाला होता. त्यामुळे मराठीचा मुद्दा ठाकरे बंधू खुबीनं वापरु शकतात, याची जाणीव भाजपला आहे. 'मराठी माणसा जागा हो, ही तुझ्या अस्तित्त्वाची शेवटची लढाई आहे,' असं भावनिक आवाहन करणारे बॅनर मुंबईभर लागले आहेत.
ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन बॅटिंग सुरु केल्यावर भाजपलाही मराठीच्या पीचवर उतरावं लागलं. भाजपची सत्ता आल्यास मराठी महापौर करु, अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांना जाहीर करावी लागली. शिवसेना उबाठाची सत्ता आल्यास खान आडनावाची व्यक्ती महापौर होईल, असं म्हणणाऱ्या भाजपला ठाकरे बंधूंची युती मराठी माणसाच्या मुद्द्यावर घेऊन आली.
मुंबईत मराठी मतांचं प्रमाण २६ टक्के, तर मुस्लिम आणि दलित मतांचं प्रमाण प्रत्येकी ११ टक्के आहे. मराठी, दलित आणि मुस्लिम हा MDM फॅक्टर ४८ टक्क्यांच्या घरात जातो. ठाकरेंनी भाजप विरोधात भूमिका घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार उद्धवसेनेकडे वळले. त्यामुळे मुंबईत ठाकरेंनी ४ जागा लढवत ३ वर बाजी मारली. त्यावेळी ठाकरे काँग्रेस सोबत होते. आता त्यांच्या सोबत काँग्रेस नसली तरी राज यांच्या रुपात मनसेचा मतदार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू अधिकाधिक मराठी मतदारांना आपल्याकडे आणू शकतात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं महत्त्व वाढलं आहे. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी मतांच्या जोडीला अधिकाधिक मराठी मतं मिळवण्यासाठी भाजपला शिंदेसेना महत्त्वाची वाटते.
भाजप विरुद्ध ठाकरे बंधूंच्या लढाईत खरी शिवसेना, बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आमच्या सोबत आहे, हा संदेश लोकांमध्ये जाणं महत्त्वाचं असल्याचं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ठाकरे बंधू मराठी मतांसाठी संपूर्ण ताकद पणाला लावतील. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकायची असल्यास मराठी मतांचं विभाजन भाजपसाठी महत्त्वाचं असेल. अशा परिस्थितीत शिंदेसेनेचं महत्त्व वाढेल. ते अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतील.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel




