
Thackeray Alliance : ठाकरे बंधूंनी अखेर युतीची घोषणा केली आहे. वरळीतील पंचतारांकित हॉटेलात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी युतीची घोषणा केली. मुंबईचा पुढील महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल, असं राज ठाकरे यांनी यावेळी अगदी ठासून सांगितलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आता मुंबईत ठाकरे विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल.
ठाकरे बंधू सोबत आल्यानं आता भाजपला त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे. ठाकरे बंधू सोबत आल्याचा सर्वाधिक फायदा एकनाथ शिंदेना होऊ शकतो. ठाकरे बंधू आल्यानं परिस्थिती बदलेल, समीकरणं बदलतील आणि त्यामुळे आम्हाला रणनीतीही बदलावी लागेल, ही बाब भाजपचे अनेक नेते खासगीत मान्य करतात.
|
|
'दुभंगलेली शिवसेना आणि भाजपची वाढलेली ताकद पाहता स्वबळावर लढून मुंबई महापाालिका निवडणूक जिंकता येईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं परिस्थिती बदलली आहे. '२०१७ मध्ये शिवसेना एकसंध असताना निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ५० हून अधिक नगरसेवक आता एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांना दूर ठेवणं भाजपला चालणार नाही,' असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले.
प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता. त्यावरुन ठाकरे बंधूंनी रान पेटवलं. अखेर महायुती सरकारला भाषा सक्तीचा जीआर मागे घ्यावा लागला. त्यावेळी ठाकरे बंधूंनी मराठी भाषेचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आणि हाच मुद्दा त्यांना एकत्र घेऊन आला. या मुद्द्याला मराठी जनांचा पाठिंबाही मिळाला होता. त्यामुळे मराठीचा मुद्दा ठाकरे बंधू खुबीनं वापरु शकतात, याची जाणीव भाजपला आहे. 'मराठी माणसा जागा हो, ही तुझ्या अस्तित्त्वाची शेवटची लढाई आहे,' असं भावनिक आवाहन करणारे बॅनर मुंबईभर लागले आहेत.
ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन बॅटिंग सुरु केल्यावर भाजपलाही मराठीच्या पीचवर उतरावं लागलं. भाजपची सत्ता आल्यास मराठी महापौर करु, अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांना जाहीर करावी लागली. शिवसेना उबाठाची सत्ता आल्यास खान आडनावाची व्यक्ती महापौर होईल, असं म्हणणाऱ्या भाजपला ठाकरे बंधूंची युती मराठी माणसाच्या मुद्द्यावर घेऊन आली.
मुंबईत मराठी मतांचं प्रमाण २६ टक्के, तर मुस्लिम आणि दलित मतांचं प्रमाण प्रत्येकी ११ टक्के आहे. मराठी, दलित आणि मुस्लिम हा MDM फॅक्टर ४८ टक्क्यांच्या घरात जातो. ठाकरेंनी भाजप विरोधात भूमिका घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार उद्धवसेनेकडे वळले. त्यामुळे मुंबईत ठाकरेंनी ४ जागा लढवत ३ वर बाजी मारली. त्यावेळी ठाकरे काँग्रेस सोबत होते. आता त्यांच्या सोबत काँग्रेस नसली तरी राज यांच्या रुपात मनसेचा मतदार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू अधिकाधिक मराठी मतदारांना आपल्याकडे आणू शकतात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं महत्त्व वाढलं आहे. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी मतांच्या जोडीला अधिकाधिक मराठी मतं मिळवण्यासाठी भाजपला शिंदेसेना महत्त्वाची वाटते.
भाजप विरुद्ध ठाकरे बंधूंच्या लढाईत खरी शिवसेना, बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आमच्या सोबत आहे, हा संदेश लोकांमध्ये जाणं महत्त्वाचं असल्याचं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ठाकरे बंधू मराठी मतांसाठी संपूर्ण ताकद पणाला लावतील. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकायची असल्यास मराठी मतांचं विभाजन भाजपसाठी महत्त्वाचं असेल. अशा परिस्थितीत शिंदेसेनेचं महत्त्व वाढेल. ते अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतील.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




