
Thackeray Alliance : ठाकरे बंधूंनी अखेर युतीची घोषणा केली आहे. वरळीतील पंचतारांकित हॉटेलात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी युतीची घोषणा केली. मुंबईचा पुढील महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल, असं राज ठाकरे यांनी यावेळी अगदी ठासून सांगितलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आता मुंबईत ठाकरे विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल.
ठाकरे बंधू सोबत आल्यानं आता भाजपला त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे. ठाकरे बंधू सोबत आल्याचा सर्वाधिक फायदा एकनाथ शिंदेना होऊ शकतो. ठाकरे बंधू आल्यानं परिस्थिती बदलेल, समीकरणं बदलतील आणि त्यामुळे आम्हाला रणनीतीही बदलावी लागेल, ही बाब भाजपचे अनेक नेते खासगीत मान्य करतात.
|
|
'दुभंगलेली शिवसेना आणि भाजपची वाढलेली ताकद पाहता स्वबळावर लढून मुंबई महापाालिका निवडणूक जिंकता येईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं परिस्थिती बदलली आहे. '२०१७ मध्ये शिवसेना एकसंध असताना निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ५० हून अधिक नगरसेवक आता एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांना दूर ठेवणं भाजपला चालणार नाही,' असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले.
प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता. त्यावरुन ठाकरे बंधूंनी रान पेटवलं. अखेर महायुती सरकारला भाषा सक्तीचा जीआर मागे घ्यावा लागला. त्यावेळी ठाकरे बंधूंनी मराठी भाषेचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आणि हाच मुद्दा त्यांना एकत्र घेऊन आला. या मुद्द्याला मराठी जनांचा पाठिंबाही मिळाला होता. त्यामुळे मराठीचा मुद्दा ठाकरे बंधू खुबीनं वापरु शकतात, याची जाणीव भाजपला आहे. 'मराठी माणसा जागा हो, ही तुझ्या अस्तित्त्वाची शेवटची लढाई आहे,' असं भावनिक आवाहन करणारे बॅनर मुंबईभर लागले आहेत.
ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन बॅटिंग सुरु केल्यावर भाजपलाही मराठीच्या पीचवर उतरावं लागलं. भाजपची सत्ता आल्यास मराठी महापौर करु, अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांना जाहीर करावी लागली. शिवसेना उबाठाची सत्ता आल्यास खान आडनावाची व्यक्ती महापौर होईल, असं म्हणणाऱ्या भाजपला ठाकरे बंधूंची युती मराठी माणसाच्या मुद्द्यावर घेऊन आली.
मुंबईत मराठी मतांचं प्रमाण २६ टक्के, तर मुस्लिम आणि दलित मतांचं प्रमाण प्रत्येकी ११ टक्के आहे. मराठी, दलित आणि मुस्लिम हा MDM फॅक्टर ४८ टक्क्यांच्या घरात जातो. ठाकरेंनी भाजप विरोधात भूमिका घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार उद्धवसेनेकडे वळले. त्यामुळे मुंबईत ठाकरेंनी ४ जागा लढवत ३ वर बाजी मारली. त्यावेळी ठाकरे काँग्रेस सोबत होते. आता त्यांच्या सोबत काँग्रेस नसली तरी राज यांच्या रुपात मनसेचा मतदार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू अधिकाधिक मराठी मतदारांना आपल्याकडे आणू शकतात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं महत्त्व वाढलं आहे. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी मतांच्या जोडीला अधिकाधिक मराठी मतं मिळवण्यासाठी भाजपला शिंदेसेना महत्त्वाची वाटते.
भाजप विरुद्ध ठाकरे बंधूंच्या लढाईत खरी शिवसेना, बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आमच्या सोबत आहे, हा संदेश लोकांमध्ये जाणं महत्त्वाचं असल्याचं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ठाकरे बंधू मराठी मतांसाठी संपूर्ण ताकद पणाला लावतील. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकायची असल्यास मराठी मतांचं विभाजन भाजपसाठी महत्त्वाचं असेल. अशा परिस्थितीत शिंदेसेनेचं महत्त्व वाढेल. ते अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतील.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य




























Subscribe to my channel



