अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे अचानक सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. मागच्या महिन्यात 28 जानेवारीला अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या, अजूनही घडतायत. अजितदादांच्या निधनानंतर तीनच दिवसात सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्ममंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या त्या गटनेत्या आहेत. भविष्यात पक्षाला एकसंध ठेऊन तो पुढे घेऊन जाण्याचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे. अजित पवारांच्या त्या संदर्भात शरद पवार पक्षाच्या नेत्यांसोबत बैठका पार पडल्या होत्या, असे दावे केले जात आहेत.
याच सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार त्यांची दोन मुलं पार्थ आणि जय पवार यांच्यासह राजकीय रणनितीकार नरेश अरोरा यांना भेटल्या. नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स नावाची कंपनी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा उंचावण्याची या डिझाईन बॉक्सवर जबाबदारी आहे. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीत या डिझाईन बॉक्सनेच राष्ट्रवादीच्या प्रचार रणनितीची आखणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादीला विधानसभेला जे यश मिळालं, त्यानंतर अजित पवार यांचा डिझाईन बॉक्सवरील विश्वास जास्त वाढला. नरेश अरोरा हे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार आहेत.
काय चर्चा झाली?
काल पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यात अजितदादांच्या पुण्यातील जिजाई बंगल्यात एकतास चर्चा झाली. त्यानंतर हे तिघे लगेच पुण्यातील सर्किट हाऊसवर जाऊन सुनेत्रा पवार यांना भेटले. तिथे चौघांमध्ये तासभर चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यासह, राज्यात ज्या घडामोडी घडतायत त्यावर चर्चा झाली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची सूत्र आली आहेत. राष्ट्रवादीची पुढील वाटचाल कशी असेल, यावर चर्चा झाली. नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीसोबतचा करार रद्द करण्याची अजित पवार चर्चा करत होते, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



