पुणे: दस्तनोंदणीतील गैरव्यवहारावर अंकुश आणण्यासाठी आता पक्षकारांचा आधार क्रमांक जोडण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास दस्तनोंदणीत अधिक पारदर्शकता येईल, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नोंदणी कायद्यामध्ये बदल करावा लागेल.
राज्यात दरवर्षी लाखो दस्तांची नोंदणी होते. राज्य सरकारला गेल्या वर्षी ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र, या व्यवहारांमध्ये अनेक गैरव्यवहार होत असल्याने त्यावर अंकुश आणण्याचे राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते.
आतापर्यंत दस्तनोंदणी करताना आधार कार्ड बंधनकारक नव्हते. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेता यांची ओळख पटविण्यासाठी कोणताही ठोस पर्याय नव्हता. त्यातून बनावट आधारकार्ड जोडून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असल्याचे काही प्रकार राज्यात उघडकीस आले आहेत.
दस्त नोंदणी करताना आधार कार्ड जोडले जात असले तरी ते बंधनकारक नाही. परंतु ते बंधनकारक करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. गैरव्यवहारावर नियंत्रण मिळविता येणार आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.
— रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक
दस्तनोंदणीसाठीच्या प्रणालीत आधारकार्ड बंधनकारक नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. आधारकार्ड जोडणे ऐच्छिक असल्यामुळे दुय्यम निबंधकांनाही दस्त नोंदवून घेताना 'स्किप' चा पर्याय वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता.
मात्र,मध्यंतरी सरकारी जमिनींच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांमध्ये आधारकार्डासाठी वापरण्यात येणाऱ्या 'स्किप' पर्यायाचा वापर करून दस्तनोंदणीमध्ये गैरव्यवहार करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.
तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र नोंदणी कायद्यामध्ये बदल करावा लागणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यास दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक होणार आहे.
आधारकार्ड बंधनकारक झाल्यानंतर दस्तनोंदणी करताना आधारकार्डची पडताळणी करून खरेदीदार आणि विक्रेता या दोघांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. तसेच दस्त नोंदणीच्या प्रणालीमध्ये देण्यात आलेला 'स्किप' चा पर्यायही बंद करण्यात येणार आहे. जेणेकरून दस्तनोंदणी करताना होणारे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



