
Nagpur : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आज रविवारी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून विरोधी पक्षांनादेखील या चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्यासह इतर नेत्यांनी आज महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून का बहिष्कार टाकत आहोत? याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.
|
Mumbai : भाजप vs शिवसेना आमने–सामने! एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांमुळे राजकीय वातावरण तापलं |
"आम्ही चहापानाच्या कार्यक्रमाला का जात नाही आहोत? याबाबत विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. आम्हाला राज्याचे प्रमुख म्हणून सभागृह नेते म्हणून तसेच राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला चहापानाला या म्हणून पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी भास्करराव जाधव आमदार असं लिहिलं आहे. त्यापुढे लिहिलं आहे की, आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात? तर ते राज्याचे प्रमुख म्हणून आम्हाला पत्र पाठवतात. तशाच पद्धतीने विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
"दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षांना चहापानाला बोलवलं आहे असं सांगायचं, पण विरोधी पक्षनेता पदाची दोन्ही पदं खाली ठेवायची. पर्यायाने ही पदं केवळ शासन निर्णयात किंवा पर्यायाने पुढे आलेली नाहीत. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, त्याच्या निवडीची पद्धत नियमात सुद्धा आहे. तथा परंपरेमध्ये सुद्धा आहे", असा दावा भास्कर जाधव यांनी केला.
"एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के सदस्यसंख्या असल्याशिवाय विरोधी पक्षनेता निवडता येत नाही, असं सांगितलं जायचं. पण हे साफ खोटं आहे. याचे सगळे पुरावे आम्ही विधीमंडळाला दिले. सचिव आणि अध्यक्षांना दिले. आम्ही त्यांच्याकडून विरोधी पक्षनेताचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे लिखीत स्वरुपात मागितली. त्यानंतर अखेर प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं", अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.
"अशा पद्धतीने कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेत्याच्या निवड प्रक्रियेत नाही. ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या पक्षाच्यावतीने जे विरोधी पक्षनेता करता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करावी, असं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं. विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहाच विरोधी पक्षनेता पद खाली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात विधी मंडळात आजतागायत हा पहिला प्रसंग निर्माण झाला आहे", अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
- "आम्हाला निधी देत नाहीत, अशांसोबत चहा कसा पिणार?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
- "लाडकी बहीण, लाडका भाऊ खड्ड्यात गेले, आता लाडका कंत्राटदार आला", अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही सरकारवर टीका केली.
- "सकाळ, संध्याकाळ लोकप्रतिनिधी विकत घेण्याचं काम सुरु आहे", असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी महायुतीवर केला.
- "शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन मत घेतलं, पण आता कर्जमाफीसाठी तरीख पे तारीख दिली जात आहे", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
शहर
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
महाराष्ट्र
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला




























Subscribe to my channel




