
Nagpur : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आज रविवारी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून विरोधी पक्षांनादेखील या चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्यासह इतर नेत्यांनी आज महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून का बहिष्कार टाकत आहोत? याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.
|
Mumbai : भाजप vs शिवसेना आमने–सामने! एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांमुळे राजकीय वातावरण तापलं |
"आम्ही चहापानाच्या कार्यक्रमाला का जात नाही आहोत? याबाबत विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. आम्हाला राज्याचे प्रमुख म्हणून सभागृह नेते म्हणून तसेच राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला चहापानाला या म्हणून पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी भास्करराव जाधव आमदार असं लिहिलं आहे. त्यापुढे लिहिलं आहे की, आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात? तर ते राज्याचे प्रमुख म्हणून आम्हाला पत्र पाठवतात. तशाच पद्धतीने विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
"दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षांना चहापानाला बोलवलं आहे असं सांगायचं, पण विरोधी पक्षनेता पदाची दोन्ही पदं खाली ठेवायची. पर्यायाने ही पदं केवळ शासन निर्णयात किंवा पर्यायाने पुढे आलेली नाहीत. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, त्याच्या निवडीची पद्धत नियमात सुद्धा आहे. तथा परंपरेमध्ये सुद्धा आहे", असा दावा भास्कर जाधव यांनी केला.
"एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के सदस्यसंख्या असल्याशिवाय विरोधी पक्षनेता निवडता येत नाही, असं सांगितलं जायचं. पण हे साफ खोटं आहे. याचे सगळे पुरावे आम्ही विधीमंडळाला दिले. सचिव आणि अध्यक्षांना दिले. आम्ही त्यांच्याकडून विरोधी पक्षनेताचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे लिखीत स्वरुपात मागितली. त्यानंतर अखेर प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं", अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.
"अशा पद्धतीने कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेत्याच्या निवड प्रक्रियेत नाही. ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या पक्षाच्यावतीने जे विरोधी पक्षनेता करता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करावी, असं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं. विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहाच विरोधी पक्षनेता पद खाली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात विधी मंडळात आजतागायत हा पहिला प्रसंग निर्माण झाला आहे", अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
- "आम्हाला निधी देत नाहीत, अशांसोबत चहा कसा पिणार?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
- "लाडकी बहीण, लाडका भाऊ खड्ड्यात गेले, आता लाडका कंत्राटदार आला", अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही सरकारवर टीका केली.
- "सकाळ, संध्याकाळ लोकप्रतिनिधी विकत घेण्याचं काम सुरु आहे", असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी महायुतीवर केला.
- "शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन मत घेतलं, पण आता कर्जमाफीसाठी तरीख पे तारीख दिली जात आहे", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!



























Subscribe to my channel

