
Nagpur : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आज रविवारी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून विरोधी पक्षांनादेखील या चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्यासह इतर नेत्यांनी आज महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून का बहिष्कार टाकत आहोत? याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.
|
Mumbai : भाजप vs शिवसेना आमने–सामने! एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांमुळे राजकीय वातावरण तापलं |
"आम्ही चहापानाच्या कार्यक्रमाला का जात नाही आहोत? याबाबत विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. आम्हाला राज्याचे प्रमुख म्हणून सभागृह नेते म्हणून तसेच राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला चहापानाला या म्हणून पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी भास्करराव जाधव आमदार असं लिहिलं आहे. त्यापुढे लिहिलं आहे की, आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात? तर ते राज्याचे प्रमुख म्हणून आम्हाला पत्र पाठवतात. तशाच पद्धतीने विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
"दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षांना चहापानाला बोलवलं आहे असं सांगायचं, पण विरोधी पक्षनेता पदाची दोन्ही पदं खाली ठेवायची. पर्यायाने ही पदं केवळ शासन निर्णयात किंवा पर्यायाने पुढे आलेली नाहीत. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, त्याच्या निवडीची पद्धत नियमात सुद्धा आहे. तथा परंपरेमध्ये सुद्धा आहे", असा दावा भास्कर जाधव यांनी केला.
"एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के सदस्यसंख्या असल्याशिवाय विरोधी पक्षनेता निवडता येत नाही, असं सांगितलं जायचं. पण हे साफ खोटं आहे. याचे सगळे पुरावे आम्ही विधीमंडळाला दिले. सचिव आणि अध्यक्षांना दिले. आम्ही त्यांच्याकडून विरोधी पक्षनेताचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे लिखीत स्वरुपात मागितली. त्यानंतर अखेर प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं", अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.
"अशा पद्धतीने कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेत्याच्या निवड प्रक्रियेत नाही. ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या पक्षाच्यावतीने जे विरोधी पक्षनेता करता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करावी, असं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं. विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहाच विरोधी पक्षनेता पद खाली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात विधी मंडळात आजतागायत हा पहिला प्रसंग निर्माण झाला आहे", अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
- "आम्हाला निधी देत नाहीत, अशांसोबत चहा कसा पिणार?", असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
- "लाडकी बहीण, लाडका भाऊ खड्ड्यात गेले, आता लाडका कंत्राटदार आला", अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही सरकारवर टीका केली.
- "सकाळ, संध्याकाळ लोकप्रतिनिधी विकत घेण्याचं काम सुरु आहे", असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी महायुतीवर केला.
- "शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन मत घेतलं, पण आता कर्जमाफीसाठी तरीख पे तारीख दिली जात आहे", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य




























Subscribe to my channel



