SIPRI Global Report: Major Shift in India's Nuclear Strategy and Stockpile Triggers Alerts

"भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"

SIPRI Global Report: Major Shift in India's Nuclear Strategy and Stockpile Triggers Alertsनवी दिल्ली : भारताने शांततेच्या काळात प्रथमच १२ अण्वस्त्रे सक्रिय पद्धतीने तैनात केली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या शून्य होती. या घडामोडींमुळे भारताच्या अण्वस्त्र धोरणात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे संकेत मिळाले आहेत, असा निष्कर्ष स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिप्री) पाहणीतून काढण्यात आला आहे.

शांततेच्या काळात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या प्रक्षेपण यंत्रणांपासून अण्वस्त्रे वेगळे ठेवण्याची भारताची दीर्घकालीन पद्धत आता बदलली असल्याचे त्यातून दिसून येते.

कोणाकडे किती अण्वस्त्रे? (जानेवारी २०२६ ची आकडेवारी):

देश तैनात अण्वस्त्रे (२०२६) एकूण अण्वस्त्रे (२०२६) एकूण अण्वस्त्रे (२०२५)
अमेरिका १,७७० ५,१७७ ५,०४२
रशिया १,७९६ ५,४५९ ५,४२०
चीन ३४ ६०० ६२०
फ्रान्स २८० २९० ३७०
ब्रिटन १२० २२५ २२५
भारत १२ १९० १८०
पाकिस्तान १७० १७०
इस्रायल ९० ९०
उत्तर कोरिया ५० ६०
एकूण ४,०१२ १२,२४१ १२,१८७

चीन सर्वाधिक वेगाने वाढवतोय अण्वस्त्र साठा:

सिप्रीने म्हटले आहे की, चीनपर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यावर सध्या भारताने प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. भारताने इतिहासात पहिल्यांदाच १२ अण्वस्त्रे पूर्णपणे तैनात केली आहेत, तर दुसरीकडे चीनकडे सध्या ६२० अण्वस्त्रे असून त्यापैकी ३४ तैनात आहेत. चीनच्या तैनात अण्वस्त्रांची संख्या २०२५ मध्ये २४ होती. चीन जगात इतर कोणत्याही देशापेक्षा वेगाने आपला अण्वस्त्र साठा वाढवत आहे.

शेजाऱ्यांना धडकी भरेल अशी अस्त्रे:

भारताकडे आता एकूण १९० अण्वस्त्रे आहेत. वर्षभरापूर्वी (२०२५ मध्ये) ही संख्या १८० इतकी होती. म्हणजेच भारताच्या ताफ्यात १० नव्या अण्वस्त्रांची भर पडली आहे. त्यापैकी १२ अण्वस्त्रे थेट तैनात करण्यात आली आहेत. भारताच्या अण्वस्त्र साठ्याचा काही भाग अशा प्रकारे 'सक्रिय पद्धतीने तैनात' असल्याचे निरीक्षण या जागतिक संस्थेने प्रथमच नोंदविले आहे. ताज्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२६ पर्यंत भारताकडे १२ तैनात आणि १७८ साठवून ठेवलेली अशी एकूण १९० अण्वस्त्रे आहेत.

भारताने ऑगस्ट २०२४ पासून अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या—'आयएनएस अरिघात' (INS Arighat) आणि 'आयएनएस अरिदमन' (INS Aridaman)—कार्यान्वित केल्या आहेत. या दोन्ही पाणबुड्या अण्वस्त्रसज्ज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास आणि समुद्रातून मारा करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, ज्यामुळे भारताची ताकद प्रचंड वाढली आहे.



शहर

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *