नवी दिल्ली : भारताने शांततेच्या काळात प्रथमच १२ अण्वस्त्रे सक्रिय पद्धतीने तैनात केली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या शून्य होती. या घडामोडींमुळे भारताच्या अण्वस्त्र धोरणात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे संकेत मिळाले आहेत, असा निष्कर्ष स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिप्री) पाहणीतून काढण्यात आला आहे.
शांततेच्या काळात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या प्रक्षेपण यंत्रणांपासून अण्वस्त्रे वेगळे ठेवण्याची भारताची दीर्घकालीन पद्धत आता बदलली असल्याचे त्यातून दिसून येते.
कोणाकडे किती अण्वस्त्रे? (जानेवारी २०२६ ची आकडेवारी):
| देश | तैनात अण्वस्त्रे (२०२६) | एकूण अण्वस्त्रे (२०२६) | एकूण अण्वस्त्रे (२०२५) |
| अमेरिका | १,७७० | ५,१७७ | ५,०४२ |
| रशिया | १,७९६ | ५,४५९ | ५,४२० |
| चीन | ३४ | ६०० | ६२० |
| फ्रान्स | २८० | २९० | ३७० |
| ब्रिटन | १२० | २२५ | २२५ |
| भारत | १२ | १९० | १८० |
| पाकिस्तान | – | १७० | १७० |
| इस्रायल | – | ९० | ९० |
| उत्तर कोरिया | – | ५० | ६० |
| एकूण | ४,०१२ | १२,२४१ | १२,१८७ |
चीन सर्वाधिक वेगाने वाढवतोय अण्वस्त्र साठा:
सिप्रीने म्हटले आहे की, चीनपर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यावर सध्या भारताने प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. भारताने इतिहासात पहिल्यांदाच १२ अण्वस्त्रे पूर्णपणे तैनात केली आहेत, तर दुसरीकडे चीनकडे सध्या ६२० अण्वस्त्रे असून त्यापैकी ३४ तैनात आहेत. चीनच्या तैनात अण्वस्त्रांची संख्या २०२५ मध्ये २४ होती. चीन जगात इतर कोणत्याही देशापेक्षा वेगाने आपला अण्वस्त्र साठा वाढवत आहे.
शेजाऱ्यांना धडकी भरेल अशी अस्त्रे:
भारताकडे आता एकूण १९० अण्वस्त्रे आहेत. वर्षभरापूर्वी (२०२५ मध्ये) ही संख्या १८० इतकी होती. म्हणजेच भारताच्या ताफ्यात १० नव्या अण्वस्त्रांची भर पडली आहे. त्यापैकी १२ अण्वस्त्रे थेट तैनात करण्यात आली आहेत. भारताच्या अण्वस्त्र साठ्याचा काही भाग अशा प्रकारे 'सक्रिय पद्धतीने तैनात' असल्याचे निरीक्षण या जागतिक संस्थेने प्रथमच नोंदविले आहे. ताज्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२६ पर्यंत भारताकडे १२ तैनात आणि १७८ साठवून ठेवलेली अशी एकूण १९० अण्वस्त्रे आहेत.
भारताने ऑगस्ट २०२४ पासून अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या—'आयएनएस अरिघात' (INS Arighat) आणि 'आयएनएस अरिदमन' (INS Aridaman)—कार्यान्वित केल्या आहेत. या दोन्ही पाणबुड्या अण्वस्त्रसज्ज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास आणि समुद्रातून मारा करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, ज्यामुळे भारताची ताकद प्रचंड वाढली आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




