देश सध्या भीषण उष्णतेच्या तडाख्यात आहे. तापमानसातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. जेव्हा मीलोकांना विचारतो की पुढच्या वर्षी उष्णता कमी होईल कीजास्त, तेव्हा बहुतांश लोक काही क्षण विचार करूनम्हणतात- कदाचित आणखी जास्त. हे उत्तर केवळ अंदाजनाही, तर एक कठोर सत्य आहे. पृथ्वी पूर्वीपेक्षा अधिकवेगाने तापत असल्याने पुढच्या वर्षी परिस्थिती आपोआपसुधारेल असे गृहीत धरून चालणे म्हणजे स्वतःला भ्रमातठेवणे आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की येणाराकाळ अधिक भयावह होऊ नये म्हणून आज आपण कायकेले पाहिजे. जगभरात पर्यावरण संरक्षण, तांत्रिक विकास,नवीन धोरणे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांवर सातत्याने कामसुरू आहे. असे असूनही हवामान संकट आपल्याडोळ्यांसमोर वेगाने वाढत आहे. याचा अर्थ ही समस्या खूपखोलवर आहे. मला वाटते की मानवी समाज या संदर्भाततीन मूलभूत चुका करत आहे. पहिली चूक ही कीआपण निसर्गाची संसाधने- कोळसा, पेट्रोल, डिझेल आणिनैसर्गिक वायूला आपले भांडवल समजून बसलोत.कोणत्याही व्यवसायात जर तुम्ही तुमचे भांडवलच खर्चकरू लागलात, तर तो व्यवसाय फार काळ टिकू शकतनाही. ‘स्मॉल इज ब्युटीफुल'' या प्रसिद्ध पुस्तकात ई. एफ.शुमाकर यांनी 1973 मध्येच चेतावणी दिली होती की,मानवी समाज पृथ्वीचे नैसर्गिक भांडवल आपल्याउत्पन्नासारखे खर्च करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि यंत्रेआपण बनवली आहेत, त्यांचा वापर करणे योग्य आहे. पणकोट्यवधी वर्षांत तयार झालेले जीवाश्म इंधन आपणबनवलेले नाही. ते निसर्गाचे भांडवल आहे. जर आपण तेचभांडवल सातत्याने जाळत राहिलो, तर दिवाळखोरीनिश्चित आहे. दुसरी चूक अशी, आपले उत्पादन व उपभोग यातीलवाढ अनंतकाळापर्यंत चालेल, असे आपण गृहीत धरूनचाललोत. विज्ञान वाढत आहे, तंत्रज्ञान वाढत आहे,अर्थव्यवस्था वाढत आहे, पण पृथ्वी वाढत नाहीये. तिचीसंसाधने मर्यादित आहेत. मर्यादित पृथ्वीवर अमर्याद उपभोगकधीही शक्य होऊ शकत नाही. पण आपण विकासाचीसंपूर्ण व्याख्याच अधिक उत्पादन आणि अधिक उपभोगावरआधारित केली आहे. तिसरी आणि कदाचित सर्वातमोठी चूक ही आहे की, पर्यावरण आणि हवामान बदलाचीसमस्या सरकार सोडवेल असे आपण मानतो. वास्तव कीही समस्या कोणत्याही एका सरकारने किंवा उद्योगाने निर्माणकेलेली नाही. ही समस्या आपण सर्वांनी मिळून निर्माणकेली आहे. आपण जे कपडे घालतो, जे खातो, जे खरेदीकरतो, जितकी वीज वापरतो, जितका प्रवास करतो- यासर्वांचा थेट संबंध कार्बन उत्सर्जनाशी आहे. त्यामुळे याचेसमाधानही केवळ सरकारांकडून येणार नाही. जोपर्यंतप्रत्येक व्यक्ती स्वतःची जबाबदारी समजून घेत नाही,तोपर्यंत कोणतेही धोरण पुरेसे ठरणार नाही. म्हणूनच मलावाटते की आज जगाला सर्वात जास्त गरज क्लायमेटसत्याग्रहाची आहे. सत्याग्रहाचा अर्थ केवळ विरोध नाही,तर सत्याचा आग्रह धरणे हा आहे. आजचे सर्वात मोठे सत्यहे आहे की पृथ्वी मर्यादित असल्याने आपले जीवन आणिउपभोगही मर्यादित असायला हवा. क्लायमेट सत्याग्रहाचाअर्थ आहे स्वेच्छेने मर्यादित आणि जबाबदार जीवनशैलीस्वीकारणे; आपली गरज आणि हाव यातील फरक समजूनघेणे; आणि निसर्गाच्या संसाधनांचा वापर अधिकार म्हणूननाही तर जबाबदारी म्हणून करणे. जर आपण क्लायमेटसत्याग्रह स्वीकारला, तर तो आपल्या तिन्ही चुकांवर उपायठरू शकतो. हे आपल्याला अमर्याद उपभोगाच्या शर्यतीतूनबाहेर काढून संतुलित जीवनाकडे घेऊन जाईल. आणिसर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे लोकांना केवळ प्रेक्षक न ठेवतासमाधानाचा भागीदार बनवेल. आता वेळ केवळ चर्चेचीनाही, तर वैयक्तिक जबाबदारीची आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



