यवतमाळ: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने ३५ वर्षीय दबंग तरुणाची सहा लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोलीतील एका व्यक्तीने सुपारी दिली, तर मानोरा, दिग्रस आणि दारव्हा परिसरातील आठ जणांनी संगनमत करून ही हत्या केली. दारू पाजून दुचाकीवरून पुसद परिसरातील सत्तरमाळ जंगलात नेल्यानंतर तरुणाचा गळा चिरून त्याला ठार करण्यात आले. हे प्रकरण ४ ऑगस्ट रोजी उघड झाले. खंडाळा पोलिसांना अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. नंतर परिस्थितीजन्य पुराव्यावरून एलसीबी पथकाने हत्याकांडाचा उलगडा केला.
मंगेश उर्फ काल्या अर्जुन मनवर (३५, रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) असे मृताचे नाव आहे. याच परिसरात राहणाऱ्या अजय भालेराव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, यात काल्या अडसर ठरत होता. सोबत त्याच्या दादागिरीच्या प्रवृत्तीने परिसरातील नागरिक दहशतीत होते. हीच संधी साधून अजय भालेराव व त्याची बहीण राधा यांनी बाबू शेख (सर्व रा. हिंगोली) याच्या माध्यमातून ज्ञानेश्वर राठोड याच्यासोबत संपर्क केला. ज्ञानेश्वरने ६ लाख रुपयांत काल्याची हत्या करण्याचा कट रचला.
यात राहुल उर्फ महाराज मुकुंदा लोखंडे, श्रावण तुकाराम भवाळ, अशोक अर्जुन शेळके (तिघेही रा. वसंतनगर, उमरी, ता. मानोरा), सोमनाथ संगीत हजारे, विशाल अर्जुन राठोड (दोघेही रा. शेंदोना, ता. मानोरा), दीपक लक्ष्मण जाधव (रा. मांगकिन्ही, ता. दारव्हा), शुक्रधन उर्फ सिद्धार्थ संतोष जाधव (रा. गंगानगर, दिग्रस) यांना सहभागी करून घेतले. सुरुवातीला काल्यासोबत ओळख वाढवून त्याची कमजोरी हेरली. काल्याला दारूचे व्यसन असल्याने लक्षात येताच त्याला दारू पाजली. दारूची नशा अधिक झाल्यानंतर झिंगलेल्या अवस्थेत काल्याला दुचाकीवरून घटनेच्या दिवशी २ ऑगस्ट रोजी खंडाळा परिसरातील सत्तरमाळ जंगलात नेले गेले. तेथे त्याची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला.
गुराखी ४ ऑगस्ट रोजी सत्तरमाळ जंगल परिसरात गेला असता, त्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. नंतर संपूर्ण घटनाक्रमच हाती लागला. सर्वप्रथम सुपारी घेणाऱ्या ज्ञानेश्वर राठोड याला अटक केली. त्याने कबुली दिल्यानंतर सर्व आरोपींना अटक केली.
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त अधीक्षक अशोक थोरात, एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धीरज बांडे, विनित घागे, उपनिरीक्षक अमोल राठोड, मुन्ना आडे, संतोष भोरगे, राहुल गोरे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडेकार, रमेश राठोड, दिगांबर पिलावन, महेश वाकोडे, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव यांनी केला.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



