
Shashi Tharoor On Delhi Pollution : देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. हिवाळा सुरू होताच शहरातील हवेची गुणवत्ता विक्रमी ढासळली आहे. प्रचंड वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांना शहरात राहणे जवळपास अशक्य बनत आहे. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी दिल्ली हे शहर भारताची राष्ट्रीय राजधानी राहावी का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
थरूर काय म्हणाले?
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शशी थरूर यांनी यासंबंधी पोस्ट केली आहे. त्यांनी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) डेटाचा हवाला देत दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित (प्रदूषित) शहर असल्याचे म्हटले आहे. तसेच याबद्दल काहीच न केल्याचा ठपका त्यांनी सरकारवर ठेवला आहे.
शशी थरूर यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “दिल्ली अधिकृतपणे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे, चौपट धोकादायक पातळी आणि दुसर्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर, ढाकापेक्षा परिस्थिती जवळजवळ पाचपट वाईट आहे. आपले सरकार वर्षानुवर्षे ही भीषण परिस्थिती पाहत आहे आणि त्याबद्दल काहीही करत नाही, हे समजण्याच्या पलीकडचे आहे”.
याबरोबरच प्रदूषण नियंत्रणाबद्दल आपण केलेल्या प्रयत्नांची माहिती देखील शशी थरूर यांनी दिली आहे. थरूर म्हणाले, “मी २०१५ पासून अनेक तज्ज्ञ, भागधारक यासह खासदारांसाठी एअर क्वालिटी राऊंड टेबल चर्चा घेतल्या, परंतु गेल्या वर्षापासून ते सोडून दिले कारण काहीही बदललेले दिसत नव्हते आणि कोणालाही काही फरक पडताना दिसला नाही. या शहरात नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत वास्तव्य करणे शक्य नसते आणि उरलेल्या वर्षभरात जेमतेम राहता येऊ शकते. खरंच ही देशाची राजधानी राहावी का?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सोबत शशी थरूर यांनी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि एनसीआर या भागांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचली आहे. या भागात राहाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न तयार झाला आहे.
दिल्लीत हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांना मंगळवारी सकाळी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा ५०० अंकांपर्यंत गेल्याचे दिसून आले. शहरात गेल्या सात दिवसांपासून धुक्याचा दाट थर पाहायला मिळतो आहे. शहराचा एक्यूआय सोमवारी ४९४, रविवारी ४१४ आणि शनिवारी ४१७ इतका होता.
दरम्यान दिल्ली सरकारने हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेला ‘मेडिकल एमर्जन्सी’ म्हटले आहे आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर खराब हवेमुळे दिल्ली-एनसीआरमधील शाळा आणि महाविद्यालये ही ऑनलाइन भरवली जात आहेत.
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




