
Shashi Tharoor On Delhi Pollution : देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. हिवाळा सुरू होताच शहरातील हवेची गुणवत्ता विक्रमी ढासळली आहे. प्रचंड वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांना शहरात राहणे जवळपास अशक्य बनत आहे. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी दिल्ली हे शहर भारताची राष्ट्रीय राजधानी राहावी का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
थरूर काय म्हणाले?
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शशी थरूर यांनी यासंबंधी पोस्ट केली आहे. त्यांनी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) डेटाचा हवाला देत दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित (प्रदूषित) शहर असल्याचे म्हटले आहे. तसेच याबद्दल काहीच न केल्याचा ठपका त्यांनी सरकारवर ठेवला आहे.
शशी थरूर यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “दिल्ली अधिकृतपणे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे, चौपट धोकादायक पातळी आणि दुसर्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर, ढाकापेक्षा परिस्थिती जवळजवळ पाचपट वाईट आहे. आपले सरकार वर्षानुवर्षे ही भीषण परिस्थिती पाहत आहे आणि त्याबद्दल काहीही करत नाही, हे समजण्याच्या पलीकडचे आहे”.
याबरोबरच प्रदूषण नियंत्रणाबद्दल आपण केलेल्या प्रयत्नांची माहिती देखील शशी थरूर यांनी दिली आहे. थरूर म्हणाले, “मी २०१५ पासून अनेक तज्ज्ञ, भागधारक यासह खासदारांसाठी एअर क्वालिटी राऊंड टेबल चर्चा घेतल्या, परंतु गेल्या वर्षापासून ते सोडून दिले कारण काहीही बदललेले दिसत नव्हते आणि कोणालाही काही फरक पडताना दिसला नाही. या शहरात नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत वास्तव्य करणे शक्य नसते आणि उरलेल्या वर्षभरात जेमतेम राहता येऊ शकते. खरंच ही देशाची राजधानी राहावी का?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सोबत शशी थरूर यांनी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि एनसीआर या भागांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचली आहे. या भागात राहाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न तयार झाला आहे.
दिल्लीत हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांना मंगळवारी सकाळी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा ५०० अंकांपर्यंत गेल्याचे दिसून आले. शहरात गेल्या सात दिवसांपासून धुक्याचा दाट थर पाहायला मिळतो आहे. शहराचा एक्यूआय सोमवारी ४९४, रविवारी ४१४ आणि शनिवारी ४१७ इतका होता.
दरम्यान दिल्ली सरकारने हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेला ‘मेडिकल एमर्जन्सी’ म्हटले आहे आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर खराब हवेमुळे दिल्ली-एनसीआरमधील शाळा आणि महाविद्यालये ही ऑनलाइन भरवली जात आहेत.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




