
खडकवासला - पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे अंशत: खरे आहे. परंतु काही ठिकाणी अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे, ही बाब खरी नाही.
अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली. तर नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणी पुरवठा करण्यासाठी सविस्तर तपशीलवार प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) करण्याची कार्यवाही महापालिकेमार्फत सुरू आहे. असे ही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. समाविष्ट गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे.
नांदेड, किरकीटवाडी, नांदोशी या समाविष्ट गावांना विहिरीवरून पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच अनेक भागात चढ्या दराने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
|
Bacchu Kadu On Ministership : बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला, त्यामागचं कारणही केलं स्पष्ट |
महानगरपालिका प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली नाही. पाणी प्रश्न लवकर सोडविणे, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, समान पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण करणे, टँकर माफियांवर नियंत्रण आणणे,
पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच या संपुर्ण प्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, तसेच अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली याबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी लक्ष वेधण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे अंशत: खरे आहे. तथापि, काही ठिकाणी अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे, ही बाब खरी नाही. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांपैकी नांदेड,
किरकीटवाडी व नांदोशी या गावांना ३००० मी.मी. व्यासाच्या लाईनमधून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी (raw water) घेण्यात येऊन, या पाण्यामध्ये ब्लिचींग पावडरचे द्रावण तयार करून टाकण्यात येऊन, या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. असे पुणे महानगरपालिकेने कळविलेले आहे.
नांदेड, किरकिटवाडी व नांदोशी या गांवाकरीता प्रक्रिया न केलेले पाणी (raw water) अस्तित्वातील ग्रामपंचायतींच्या विहिरीमध्ये घेण्यात येते. या गावांतील नागरिकांना साथीचे रोग होऊ नयेत म्हणून पाणी पुरवठा विभागामार्फत अस्तित्वातील विहिरीमध्ये आवश्यक त्या प्रमाणात ब्लिचींग पावडरने निर्जंतुकीकरण करून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
तसेच, पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर डी.पी.आर. करण्याचे कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू असल्याचे पुणे महानगरपालिकेने कळविलेले आहे.
शहर
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ठेकेदाराचा पाठलाग करून मारहाण, ३००० रुपये घेतले काढून; ५० हजारांची मागितली खंडणी
- पुणे: रस्त्यावर कुजलेले दूध ओतणे पडले महागात; भोर नगरपालिकेची १० हजार रुपयांची दंड कारवाई
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- बीड: माजी सैनिकाचे घर फोडणारा गल्लीतीलच निघाला; बीडच्या केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश, ३.५५ लाखांचा ऐवज जप्त
गुन्हा
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई



























Subscribe to my channel




