Rupali Patil : अजित दादांचे मूळ दोन्ही पायलट उशिरा का आले? अचानक पायलट बदलले गेले; अपघात की घात? रुपाली पाटलांचे गंभीर सवाल

Pune : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीकरांसह राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये शोकाचं वातावरण आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. दोन्ही पायलट अचानक बदलले, याची चौकशी होणे गरजेचे आहे, कारण घात की अपघात? असा प्रश्न रुपाली पाटील यांनी विचारला आहे.

रुपाली पाटली यांची फेसबुक पोस्ट काय?
"अजित दादांच्या अचानक जाण्याने बधिर झालो, कसे झाले, का झाले, काहीच कळत नाही. देवाने लाखोंचा पोशिंदा नव्हता न्यायचा, आमच्या सारखे न्यायचे होते, अत्यंत अघटीत घडले. आता जे घडले त्याचे सत्य संपूर्ण तपशील, पारदर्शक चौकशी जगासमोर येणे तितकेच महत्वपूर्ण आहे. राहून राहून मनात हे प्रश्न येतात त्याची उतरे मिळाली पाहिजेत." असं रुपाली पाटील यांनी लिहिलं आहे.

CSMT Railway Station : आजपासून सीएसएमटी स्थानकावर ब्लॉक; पुढील ३ महिने ‘हे’ प्लॅटफॉर्म बंद, अनेक गाड्या दादर–ठाण्यापर्यंतच धावणार

"फ्लाइट 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्राफिकमध्ये अडकल्याचा दावा, दोघांना एकाच वेळी उशीर, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरची सेफ्टी प्रक्रिया— या सर्व बाबींची सविस्तर व पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही? याची चौकशी होणे गरजेचे, कारण घात की अपघात?" असा प्रश्न रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार यांच्या निधनाला जेमते तीन दिवस झाले असताना इतक्या घाईने सुनेत्रा पवार यांचा शपथविधी का उरकण्यात आला, अशी चर्चा राज्यात दिवसभर सुरू होती. या चर्चेच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळातून हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतून यासाठीची सूत्रे फिरल्याचे कळते.

पेच टाळण्यासाठी खेळी
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत संबंधित पक्षांच्या प्रमुखांमध्ये चर्चा सुरू असली तरी शरद पवार यांनी मात्र आमच्या गटाची ‘एनडीए’मध्ये वेगळा घटक पक्ष म्हणून नोंदणी करावी असा आग्रह धरला होता. तो फेटाळताना, ‘तुम्हाला यायचे असेल तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होऊनच यावे लागेल,’ अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली होती. अजित पवार यांच्या निधनाने यदाकदाचित शरद पवार यांच्याकडे दोन्ही पक्षांची सूत्रे एकवटली, तर पुन्हा नवा पेचप्रसंग येऊ नये यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे सोपविण्याच्या निर्णयाला गती दिल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

राजकीय अपरिहार्यता
सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही कार्यकर्ते टीका करीत असले तरी हा शपथविधी तातडीने करणे गरजेचे असल्याचे ‘राष्ट्रवादी’तील नेते व सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. आमदारांमध्ये निर्माण झालेली प्रचंड अस्वस्थता आणि पक्षनेतृत्व कुणाच्या हातात जाणार याबाबत उठलेले अफवांचे पीक यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे या निकटवर्तीयांनी ‘मटा’ला सांगितले. त्यामुळेच इतक्या घाईघाईने सुनेत्रा पवार यांचा शपथविधी समारंभ पार पाडण्यात आला. या निर्णयावर टीकाही झाली. हा विषय दिवसभर चर्चेत होता.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Rupali Patil : अजित दादांचे मूळ दोन्ही पायलट उशिरा का आले? अचानक पायलट बदलले गेले; अपघात की घात? रुपाली पाटलांचे गंभीर सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *