
Pune : राज्य सरकार पुण्यात आणखी एक आयटी पार्क उभारण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत आहे. पुरंदर तालुक्यात तयार होणाऱ्या नव्या विमानतळाजवळ पुरंदर आयटी पार्क तयार करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. पुरंदरमध्ये भव्य आयटी पार्क उभारण्यासाठी सरकारने कामे सुरू केली आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
हिंजवडीमधील चुका सुधारणार
पुण्यात हिंजवडीमध्ये असलेल्या आयटी पार्कमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी काम करतात. पण या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांमुळे अनेक बड्या कंपन्यांनी त्यांचे कार्यालय स्थलांतरित करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे पुण्यातच नवं आयटी पार्क उभारल्याने या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच, हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधा उभारताना केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.
प्रक्रिया सुरू
गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदर तालुक्यात आयटी पार्क उभारण्याचा विषय चर्चेत होता. शुक्रवारी आमदार विजय शिवतारेंनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्या नंतर मंत्री उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिली. या प्रश्नाचे उत्तर देताना सरकार पुरंदरमध्ये आयटी पार्क विकसित करण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत असून महसूल विभागाकडून सध्या यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) सोपवण्याच येणार असून या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
पुरंदर आयटी पार्कसाठी पहिली बैठक 24 जुलै 2024मध्ये पार पडली होती. त्यानंतर ओक्टोबर 3 2025 मध्ये झालेल्या बैठकीत महसूल विभागाच्या जमीनीवर आयटी पार्क उभारण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी महसूल विभागाला याबद्दल औपचारिक विनंती पत्र पाठवण्यात आलं आहे. हा प्रस्ताव मान्य होताच जमीन हस्तांतरित करून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
कुठे असेल नवं आयटी पार्क?
पुरंदरमध्ये तयार होणाऱ्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून प्रस्तावित जमीन केवळ 3-4 किमी अंतरावर आहे. पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत आणि चांबळी परिसरातील 572 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी महसूल विभागाकडून हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच आयटी पार्कला चांगली कनेकटीव्हीटी मिळणार असून हिंजवडीसाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे हिंजवडीमधील ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच, पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




