
Pune : पुण्याहून मुंबईला अवघ्या ९० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणे-मुंबईदरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग बांधणार आहे. त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) नुकतीच मंजुरी मिळाली असून, सहा महिन्यांत हा 'डीपीआर' पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नवीन द्रुतगती मार्गासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, दिवसाला किमान अडीच ते तीन लाख वाहने या मार्गावरून सहजरित्या धावू शकतील, अशी याची क्षमता असणार आहे. हा मार्ग मुंबईतील अटल सेतूला आणि पुण्याच्या वर्तुळाकार रस्त्याला (रिंगरोड) जोडला जाणार आहे. परिणामी केवळ मुंबई-पुणेच नव्हे, तर मुंबई-बंगळूर हा प्रवासदेखील गतिमान होणार आहे.
|
|
पुणे-मुंबईदरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी किमान अडीच ते तीन तासांचा वेळ लागतो.
अपघात अथवा दरडी कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहनधारक तासनतास अडकून पडतात. परिणामी पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठीच आता 'एनएचएआय' नवीन द्रुतगती मार्ग बांधणार आहे.
अटल सेतू ते पुणे 'रिंगरोड' असा हा मार्ग असणार आहे. याची सुरुवात मुंबईतील अटल सेतू जवळून सुरू होईल. तिथून तो नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदराला जोडला जाईल. पुढे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून बोगदे आणि पुलांच्या साह्याने हा मार्ग पुण्यातील शिवरे (ता. भोर) येथे संपेल, जिथे तो प्रस्तावित पुणे 'रिंगरोड'ला जोडला जाईल. परिणामी सातारा, कोल्हापूर, बंगळूरला जाणाऱ्या वाहनासाठी पुण्यात येण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पुण्यात दाखल होणाऱ्या विशेषतः जड वाहनांची संख्या कमी होणार आहे.
नवीन द्रुतगती मार्ग ८ मार्गिकांचा असणार
चार मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या, चार पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर असणार
आठ मार्गिकवरून तासाला १२ हजार वाहने धावू शकतील
दिवसाला किमान पावणे तीन लाख वाहने सहजरित्या धावतील
सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
पुणे-मुंबईदरम्यान आणखी एक द्रुतगती मार्ग होणार आहे. पुणे-बंगळूर 'ग्रीनफिल्ड कॉरिडॉर'चा हा भाग असणार आहे. या मार्गाच्या 'डीपीआर'ला मंजुरी मिळाली असून, लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल. काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षात मार्ग तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



