
Pune : यंदाच्या पावसाळी हंगामातीलच नव्हे, तर गेल्या काही वर्षांतील सर्व उच्चांक मोडीत काढून बुधवारी रात्री आणि गुरुवारी दिवसभर शहर आणि परिसरात ‘आषाढ’मेघ बरसले. त्यामुळे खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळी आणि पुन्हा सायंकाळी ४० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्याचा फटका नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड) आणि इतर सखल भागांना बसला. पुणे महापालिकेने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि लष्कराच्या मदतीने गुरुवारी दिवसभरात चार हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.
पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी, चऱ्होली, थेरगाव, चिंचवड, पुणे-मुंबई रस्ता या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पुणे शहरासह जिल्ह्यातील पश्चिम घाटात बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात; तसेच लवासा येथे दरड कोसळली. घाट परिसरात पावसाचा जोर लक्षात घेऊन जिल्ह्यातील पर्यटनस्थळे दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. पूरस्थितीचे बचावकार्य करण्यासाठी लष्कर; तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी गुरुवारी माध्यमांना दिली.
|
Maval : मावळमधील कुंडमळ्यात पर्यटकांना बंदी; पाणी पातळीत वाढ, कुंडदेवी मंदिर पाण्याखाली |
शहर आणि परिसरात आज, शुक्रवारी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून, घाटांच्या परिसरात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी गुरुवारपाठोपाठ आज, शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी गरजेनुसार बाहेर पडावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.
विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे गुरुवारी पहाटे मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यावर अंडा भुर्जीचा गाडा सुरक्षित ठिकाणी नेताना विजेचा धक्का बसून तिघांचा मृत्यू झाला. या गाड्यासाठी बेकायदा वायर टाकून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
ताम्हिणीमध्ये २४ तासांत ५५६ मिमी
ताम्हिणीमध्ये गुरुवारी अतिवृष्टी झाली. अवघ्या चोवीस तासांत ताम्हिणीच्या घाटमाथ्यावर ५५६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या घाटात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या रविवारपासून ताम्हिणीमध्ये एकूण १२५४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. लोणावळ्यातही गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ३२९ मिमी, तर सायंकाळी साडेपाचपर्यंत ११७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



