
Pune : पुण्यामध्ये पावसाने गुरुवारी हाहा:कार माजवला होता. फक्त यंदाच्या हंगामातीलच नव्हे, तर गेल्या काही वर्षांतील सर्व पावसाळ्यांचे उच्चांक मोडीत काढून बुधवार रात्र आणि गुरुवारी दिवसभर पुणे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यातच खडकवासला धरणातून सकाळ आणि संध्याकाळी ४० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचा फटका सिंहगड रोड आणि इतर सखल भागांना बसला. त्यामुळे अनेक कुटुंबं रस्त्यावर आली होती. अनेकांचे संसार उघड्यावर आले. मुसळधार पावसामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
काल दिवसभर रेस्क्यू करत जवळपास १६० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या सर्वांच्या जेवणाची सोय महापालिकेकडून करण्यात आली होती. १६ ठिकाणी या पूरग्रस्तांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र अचानक नागरिक वाढल्याने अन्न पुरवठा करण्यासाठी माणसं कमी पडली. यावेळी हिंदू, मुस्लिम आणि शीख धर्मियांकडून संयुक्तिकरित्या जेवण बनवण्यात आले.
|
Pune Rain : पुण्यात पावसाचा रुद्रावतार, सर्व उच्चांक मोडले, आजही दक्षतेचा इशारा
|
शीख धर्मियांनी जेवण बनवले, मुस्लिम धर्मीयांनी त्याचे पॅकिंग केले आणि हिंदू धर्मीयांनी त्याचे वाटप केले. या एकत्र जुळून आलेल्या योगायोगामुळे सर्वधर्म एकत्र असल्याचे पाहायला मिळाले.गुरुवारी पुण्यामध्ये खडकवासला धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले होते. पहाटेपासूनच घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक नागरिक अडकून पडले होते. प्रशासनाकडून हालचाली देखील सुरू होत्या. मात्र या पूरग्रस्तांसाठी खाण्या पिण्याची सोय करणे गरजेचे होते. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या शेल्टर होम्समधील नागरिकांना रात्रीचे जेवण देण्यासाठी हिंदू-मुस्लिम-शीख धर्मियांकडून संयुक्त श्रमदान करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शीख धर्मियांकडून १००० जणांसाठी जेवण बनवण्यात आले. मुस्लिम धर्मीय तरुणांनी या जेवणाचे पॅकेट्स तयार केले. तर हिंदू धर्मीय व गणेश मंडळाचे कार्यकर्ते या अन्नाच्या पॅकेटचे शेल्टर होममध्ये जाऊन वितरित केले. अशा संकट काळात सर्वधर्मीय एकत्रितपणे कसे काम करतात, याचे विधायक रूप बघायला मिळाले.
एखादं संकट आलं तर महाराष्ट्रामध्ये, त्यातही पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात सर्वधर्मीय एकच असल्याची भावना यावेळी पाहायला मिळाली. हिंदू मुस्लिम शीख यांनी एकत्र येऊन कोसळलेल्या नागरिकांना जेवण देऊन संपूर्ण देशात आदर्शवत असे काम केले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



