
Pune : देशातील कोट्यवधी नागरिकांना बँका आर्थिक सेवा देतात. ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी बँकांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे. परंतु, गेल्या दशकभरात बँकांमध्ये आवश्यक प्रमाणात कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. बँकांच्या शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांना समाधानकारक सेवा देता येत नसल्याचे चित्र आहे. सरकारच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच सरकारी बँकांवर असते. याच बँकांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होत आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ही एक संयुक्त समन्वय समिती आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील ८ लाखांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरकारी बँकांतील रिक्त पदांचा आकडा खूप मोठा आहे. एवढेच नव्हे, तर मनुष्यबळ वाढण्याऐवजी घटत असल्याचेही दिसत आहे. देशातील सरकारी बँकांमध्ये २०१३ मध्ये एकूण मनुष्यबळ ८ लाख ८६ हजार ४९० होते. ही संख्या २०२४ मध्ये कमी होऊन ७ लाख ४६ हजार ६७९ वर आली. त्यात ११ वर्षांत १ लाख ३९ हजार ८११ एवढी घट झाली. याउलट चित्र खासगी बँकांमध्ये दिसते. देशातील खासगी बँकांतील मनुष्यबळ २०१३ मध्ये २ लाख २९ हजार १२४ होते. ते २०२४ मध्ये ८ लाख ४६ हजार ५३० वर पोहोचले. त्यात तब्बल ६ लाख १७ हजार ४०६ एवढी वाढ झाली आहे.
नुकतेच महाबँकेच्या मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स समितीने २३ मार्चपासून दोन दिवसांचा संपाचा इशारा दिला आहे. यामुळे बँकांचे कामकाज या महिन्याच्या अखेरीस ठप्प होण्याची शक्यता आहे. समितीने अनेक मागण्या केल्या आहेत. त्यात बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करणे ही मागणी आहे. बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून, सुरक्षिततेची हमीही कर्मचारी मागत आहेत. समितीच्या आंदोलनाच्या हाकेमुळे सरकारी बँकांतील अनेक प्रलंबित प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्यावर बँकांच्या व्यवस्थापनाकडून लवकरात लवकर तोडगा निघेल, अशी आशा आहे.
बँक मित्रांचेही आंदोलन
बँकांनी मध्यस्थ कंपन्यांना दूर सारून थेट बँक मित्रांशी नेमणुकीचे करार करावेत आणि त्यांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनने केली आहे. तसेच, १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यभरातून मागणी दिन पाळण्याची घोषणा संघटनेने केली आहे. असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधींची सभा नुकतीच पुण्यात झाली. या सभेस राज्यभरातून २३ जिल्ह्यांतील १०२ प्रतिनिधी उपस्थित होते. बँक मित्रांना अल्पशा कमिशनवर काम करावे लागते. त्यांच्या सेवेत सुरक्षितता नाही. वैद्यकीयसह इतर रजा आणि कोणत्याही सेवा, सवलती त्यांना मिळत नाहीत. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




