
Pune : देशातील कोट्यवधी नागरिकांना बँका आर्थिक सेवा देतात. ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी बँकांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे. परंतु, गेल्या दशकभरात बँकांमध्ये आवश्यक प्रमाणात कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. बँकांच्या शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांना समाधानकारक सेवा देता येत नसल्याचे चित्र आहे. सरकारच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच सरकारी बँकांवर असते. याच बँकांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होत आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ही एक संयुक्त समन्वय समिती आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील ८ लाखांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरकारी बँकांतील रिक्त पदांचा आकडा खूप मोठा आहे. एवढेच नव्हे, तर मनुष्यबळ वाढण्याऐवजी घटत असल्याचेही दिसत आहे. देशातील सरकारी बँकांमध्ये २०१३ मध्ये एकूण मनुष्यबळ ८ लाख ८६ हजार ४९० होते. ही संख्या २०२४ मध्ये कमी होऊन ७ लाख ४६ हजार ६७९ वर आली. त्यात ११ वर्षांत १ लाख ३९ हजार ८११ एवढी घट झाली. याउलट चित्र खासगी बँकांमध्ये दिसते. देशातील खासगी बँकांतील मनुष्यबळ २०१३ मध्ये २ लाख २९ हजार १२४ होते. ते २०२४ मध्ये ८ लाख ४६ हजार ५३० वर पोहोचले. त्यात तब्बल ६ लाख १७ हजार ४०६ एवढी वाढ झाली आहे.
नुकतेच महाबँकेच्या मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स समितीने २३ मार्चपासून दोन दिवसांचा संपाचा इशारा दिला आहे. यामुळे बँकांचे कामकाज या महिन्याच्या अखेरीस ठप्प होण्याची शक्यता आहे. समितीने अनेक मागण्या केल्या आहेत. त्यात बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करणे ही मागणी आहे. बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून, सुरक्षिततेची हमीही कर्मचारी मागत आहेत. समितीच्या आंदोलनाच्या हाकेमुळे सरकारी बँकांतील अनेक प्रलंबित प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्यावर बँकांच्या व्यवस्थापनाकडून लवकरात लवकर तोडगा निघेल, अशी आशा आहे.
बँक मित्रांचेही आंदोलन
बँकांनी मध्यस्थ कंपन्यांना दूर सारून थेट बँक मित्रांशी नेमणुकीचे करार करावेत आणि त्यांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनने केली आहे. तसेच, १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यभरातून मागणी दिन पाळण्याची घोषणा संघटनेने केली आहे. असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधींची सभा नुकतीच पुण्यात झाली. या सभेस राज्यभरातून २३ जिल्ह्यांतील १०२ प्रतिनिधी उपस्थित होते. बँक मित्रांना अल्पशा कमिशनवर काम करावे लागते. त्यांच्या सेवेत सुरक्षितता नाही. वैद्यकीयसह इतर रजा आणि कोणत्याही सेवा, सवलती त्यांना मिळत नाहीत. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



