
Pune : देशातील कोट्यवधी नागरिकांना बँका आर्थिक सेवा देतात. ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी बँकांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे. परंतु, गेल्या दशकभरात बँकांमध्ये आवश्यक प्रमाणात कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. बँकांच्या शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांना समाधानकारक सेवा देता येत नसल्याचे चित्र आहे. सरकारच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच सरकारी बँकांवर असते. याच बँकांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होत आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ही एक संयुक्त समन्वय समिती आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील ८ लाखांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरकारी बँकांतील रिक्त पदांचा आकडा खूप मोठा आहे. एवढेच नव्हे, तर मनुष्यबळ वाढण्याऐवजी घटत असल्याचेही दिसत आहे. देशातील सरकारी बँकांमध्ये २०१३ मध्ये एकूण मनुष्यबळ ८ लाख ८६ हजार ४९० होते. ही संख्या २०२४ मध्ये कमी होऊन ७ लाख ४६ हजार ६७९ वर आली. त्यात ११ वर्षांत १ लाख ३९ हजार ८११ एवढी घट झाली. याउलट चित्र खासगी बँकांमध्ये दिसते. देशातील खासगी बँकांतील मनुष्यबळ २०१३ मध्ये २ लाख २९ हजार १२४ होते. ते २०२४ मध्ये ८ लाख ४६ हजार ५३० वर पोहोचले. त्यात तब्बल ६ लाख १७ हजार ४०६ एवढी वाढ झाली आहे.
नुकतेच महाबँकेच्या मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स समितीने २३ मार्चपासून दोन दिवसांचा संपाचा इशारा दिला आहे. यामुळे बँकांचे कामकाज या महिन्याच्या अखेरीस ठप्प होण्याची शक्यता आहे. समितीने अनेक मागण्या केल्या आहेत. त्यात बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करणे ही मागणी आहे. बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून, सुरक्षिततेची हमीही कर्मचारी मागत आहेत. समितीच्या आंदोलनाच्या हाकेमुळे सरकारी बँकांतील अनेक प्रलंबित प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्यावर बँकांच्या व्यवस्थापनाकडून लवकरात लवकर तोडगा निघेल, अशी आशा आहे.
बँक मित्रांचेही आंदोलन
बँकांनी मध्यस्थ कंपन्यांना दूर सारून थेट बँक मित्रांशी नेमणुकीचे करार करावेत आणि त्यांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनने केली आहे. तसेच, १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यभरातून मागणी दिन पाळण्याची घोषणा संघटनेने केली आहे. असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधींची सभा नुकतीच पुण्यात झाली. या सभेस राज्यभरातून २३ जिल्ह्यांतील १०२ प्रतिनिधी उपस्थित होते. बँक मित्रांना अल्पशा कमिशनवर काम करावे लागते. त्यांच्या सेवेत सुरक्षितता नाही. वैद्यकीयसह इतर रजा आणि कोणत्याही सेवा, सवलती त्यांना मिळत नाहीत. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले.
शहर
- पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड! घटनास्थळ पंचाची साक्ष पूर्ण; आरोपीच्या बाइक प्रवासाचा उलगडा
- नाशिकमध्ये पर्यटकांवर गुंडांचा हल्ला! भावली धबधब्यावर महिलेची छेड काढली, १५-२० किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: ठाणे महापालिका रुग्णालयाची ऐतिहासिक कामगिरी! नवजात बाळाच्या दुर्मिळ दातावर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक
महाराष्ट्र
- पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड! घटनास्थळ पंचाची साक्ष पूर्ण; आरोपीच्या बाइक प्रवासाचा उलगडा
- नाशिकमध्ये पर्यटकांवर गुंडांचा हल्ला! भावली धबधब्यावर महिलेची छेड काढली, १५-२० किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: ठाणे महापालिका रुग्णालयाची ऐतिहासिक कामगिरी! नवजात बाळाच्या दुर्मिळ दातावर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड























Subscribe to my channel




