
सालेम (तमिळनाडू) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाषणात वापरलेल्या ‘शक्ती’ या शब्दावरून आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. ‘‘आम्ही माता-भगिनींना शक्ती मानतो, त्या शक्तीला इंडिया आघाडी नष्ट करू पाहात आहे. मात्र या प्रयत्नात ते स्वत:च नष्ट होतील,’’ असे मोदी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूमध्ये होते. सालेम येथे सभा घेत मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी द्रमुक पक्षावरही टीका केली. काँग्रेस आणि द्रमुक हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे राजकारण हीच या पक्षांची धोरणे आहेत, अशी टीका मोदींनी केली.
|
|
यानंतर मोदी यांनी राहुल यांच्या ‘शक्ती’बाबतच्या विधानावरून काँग्रेससह इंडिया आघाडीला धारेवर धरले. मोदी म्हणाले, ‘‘इंडिया आघाडीचे नेते इतर कोणत्याही धर्माबद्दल अवाक्षरही बोलणार नाहीत. त्याचबरोबर, हिंदू धर्माचा अवमान करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. इंडिया आघाडीच्या पहिल्याच सभेत त्यांचे धोरण स्पष्ट झाले आहे.
त्यांना ‘शक्ती’ला नष्ट करायचे आहे. तमिळ संस्कृतीत शक्तीपीठांना मोठे महत्त्व असून हिंदू धर्मातही ‘शक्ती’ म्हणजे स्रीशक्ती मानली गेली आहे. याच शक्तीला काँग्रेस आणि द्रमुकला नष्ट करायचे आहे. मात्र, आमच्या महाकाव्यांमध्ये आणि प्राचीन कथांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की शक्तीला नष्ट करू पाहणारा स्वत:च नष्ट होतो.’’
‘५-जी म्हणजे पाचवी पिढी’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुक पक्षावरही टीका केली. जयललिता जिवंत असताना त्यांना द्रमुक पक्षाने कशी वागणूक दिली, हे सर्वांना माहिती आहे, असे म्हणत मोदींनी अण्णा द्रमुकच्या समर्थकांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाले,‘‘द्रमुकचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यांनी महिला आरक्षण विधेयकालाही विरोध केला होता.
याचमुळे तमिळनाडूमध्ये महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढत आहे. या महिलाविरोधी दृष्टिकोनाला जनतेने पराभूत करावे. ५-जी हे उच्च तंत्रज्ञानाचे प्रतीक असले तरी द्रमुकसाठी ५-जी म्हणजे ‘फिफ्थ जनरेशन’ (पाचवी पिढी) आहे. याच घराणेशाहीच्या राजकारणामुळे जी. के. मूपनार यांची पंतप्रधान बनण्याची क्षमता असतानाही काँग्रेसने त्यांना पुढे येऊ दिले नाही.’’
शहर
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये हादरवणारी घटना! संपत्तीच्या वादातून मित्रानेच केली शिक्षिकेची निर्घृण हत्या; एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले, दोन आरोपी जेरबंद!
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- बिहार: पाटण्यात विद्यार्थ्यांवर खाकीचा उर्मटपणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून-पळवून मारले, फरफटत नेले!
- "जंतर-मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'! नीट आंदोलनासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही येत आहेत पिझ्झा, बर्गरच्या ऑनलाइन ऑर्डर"
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"



























Subscribe to my channel


