पौराणिक कथांनुसार, जेव्हा देव आणि असुर यांनी अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले होते, तेव्हा अमृतापूर्वी ‘हलाहल’ नावाचे भयंकर विष बाहेर आले होते.त्या विषामुळे संपूर्ण सृष्टीच्या विनाशाचे संकट उभे राहिले होते. तेव्हा भगवान शिव यांनी करुणे पोटी ते विष आपल्या कंठात धारण केले आणि ते नीलकंठ म्हणवले गेले. आजच्या युगात आपण पुन्हा एकदा मंथन करत आहोत. हे मंथन आहे निसर्गाच्या संसाधनांचे. आपण आपल्यासुख-सुविधा आणि अंतहीन इच्छांच्या पूर्तीसाठी पृथ्वीच्या गर्भापासून आकाशापर्यंत, प्रत्येक नैसर्गिक संसाधन घुसळून काढत आहोत. यातून आपल्याला आर्थिक समृद्धी आणि तंत्रज्ञानाचे अमृत तर मिळत आहे, पण त्यासोबतच प्रदूषणाचे विषही बाहेर पडत आहे. विकासाच्या आपल्याया आंधळ्या शर्यतीने केवळ हवा विषारी आणि पाणीप्रदूषित केले नाही, तर मातीलाही मोठ्या प्रमाणावर नापीक बनवले आहे. पृथ्वीचे वाढते तापमान आणि अनियंत्रित हवामान बदल आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका बनले आहेत. विडंबना अशी आहे की, आपण नैसर्गिक संसाधनांचे इतक्या निर्दयीपणे आणि वेगाने मंथन करत आहोत की निसर्गाला स्वतःला सावरण्याची आणि पुनरुज्जीवित करण्याची संधीच मिळत नाही. आज मानवता पृथ्वीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक उपभोग घेत आहे. हा अतिरिक्त उपभोग म्हणजेच तेविष आहे, जे पर्यावरणात कार्बन उत्सर्जन आणि कचऱ्याच्या रूपात विरघळत आहे. आता सर्वात मोठा प्रश्नहा आहे की, आजच्या काळातील हे विष पिणार कोण? आपण एखाद्या चमत्काराची प्रतीक्षा करायची का, की कोणीतरी येईल आणि आपण पसरवलेले हे प्रदूषण शोषून घेईल? विज्ञान आणि तंत्रज्ञानाला स्वतःच्या मर्यादा आहेत.जोपर्यंत आपण पृथ्वीच्या मर्यादेत राहून जगणार नाही आणि विष निर्माण करणे बंद करणार नाही, तोपर्यंत कोणतेही तंत्रज्ञान किंवा धोरण यशस्वी होऊ शकत नाही. आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या वाट्याचे थोडे थोडे हलाहल प्यावे लागेल. हे विष कोणत्याही पेल्यात नसून आपल्या जीवनशैलीत आहे. आपल्याला अधिक मिळवण्याची आपली लालसा आपल्या कंठातच रोखून धरावी लागेल, जेणेकरून ती पृथ्वीच्या खोलवर पोहोचणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या जबाबदारीचे हे विष पेईल,तेव्हाच येणाऱ्या पिढ्यांसाठी अमृत सुरक्षित राहील. आपल्याला हे मान्य करावे लागेल की, पृथ्वी मर्यादित आहे आणि ती नेहमीच मर्यादित राहील, मग आपले विज्ञान आणि आपली अर्थव्यवस्था कितीही प्रगती करो. वास्तवात,संसाधनांची कमतरता समजून घेणे मानवासाठी अत्यंतसहज आणि स्वाभाविक आहे. जेव्हा आपले उत्पन्न मर्यादित असते, तेव्हा आपण आपले खर्च आपोआपच मर्यादित करतो. जर आपल्याकडे ५ आसनी कार असेल, तर आपण त्यात दहा लोकांना बसण्यासाठी आमंत्रित करत नाही. आपण दररोज क्षमतेच्या आधारावर निर्णय घेतो, मग पृथ्वीच्या संदर्भात आपण हे मूलभूत सत्य का विसरतो? पृथ्वीचा आकार निश्चित आहे आणि तो काळानुसार किंवा तंत्रज्ञानानुसार वाढत नाही. तिची संसाधनेही मर्यादित आहेत. आपला उपभोग आणि मागणी सातत्याने वाढत चालली आहे आपण एका मर्यादित पृथ्वीवर राहत आहोत ही जाणीव होणे, हा समाधानाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. जेव्हा आपण आपल्या मर्यादा ओळखू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने निवारणाकडे वाटचाल करू शकू. येथे हे समजून घेणे देखील अनिवार्य आहे की, ही समस्या आपल्या सर्वांच्या उपभोग घेण्यामुळेच निर्माण झाली आहे, म्हणूनच समाधानाचा भागही आपल्या सर्वांनाच व्हावे लागेल. आपण आपल्या सवयी सुधारल्या आणि एखादी गोष्ट ‘परवडण्याची’ क्षमता असूनही निसर्गासाठी ती ‘टाळणे’ शिकलो, तर आपण या विषाचा प्रसार रोखू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
महाराष्ट्र
- सांगली: १० लाखांच्या रोकडसह थेट संपूर्ण 'एटीएम' मशीनच लांबवले, चोरांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान!
- पुणे: लाडक्या बाप्पा आणि दुर्गादेवीच्या सन्मानपूर्वक पुनर्विसर्जनासाठी महापालिका घेणार खाण भाडेतत्त्वावर!
- महाराष्ट्र: मी मनोज जरांगेंवर बोलणे का टाळतोय? छगन भुजबळांनी स्वतःच सांगितलं कारण, सरकारलाही खडा सवाल
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान





























Subscribe to my channel




