पौराणिक कथांनुसार, जेव्हा देव आणि असुर यांनी अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले होते, तेव्हा अमृतापूर्वी ‘हलाहल’ नावाचे भयंकर विष बाहेर आले होते.त्या विषामुळे संपूर्ण सृष्टीच्या विनाशाचे संकट उभे राहिले होते. तेव्हा भगवान शिव यांनी करुणे पोटी ते विष आपल्या कंठात धारण केले आणि ते नीलकंठ म्हणवले गेले. आजच्या युगात आपण पुन्हा एकदा मंथन करत आहोत. हे मंथन आहे निसर्गाच्या संसाधनांचे. आपण आपल्यासुख-सुविधा आणि अंतहीन इच्छांच्या पूर्तीसाठी पृथ्वीच्या गर्भापासून आकाशापर्यंत, प्रत्येक नैसर्गिक संसाधन घुसळून काढत आहोत. यातून आपल्याला आर्थिक समृद्धी आणि तंत्रज्ञानाचे अमृत तर मिळत आहे, पण त्यासोबतच प्रदूषणाचे विषही बाहेर पडत आहे. विकासाच्या आपल्याया आंधळ्या शर्यतीने केवळ हवा विषारी आणि पाणीप्रदूषित केले नाही, तर मातीलाही मोठ्या प्रमाणावर नापीक बनवले आहे. पृथ्वीचे वाढते तापमान आणि अनियंत्रित हवामान बदल आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका बनले आहेत. विडंबना अशी आहे की, आपण नैसर्गिक संसाधनांचे इतक्या निर्दयीपणे आणि वेगाने मंथन करत आहोत की निसर्गाला स्वतःला सावरण्याची आणि पुनरुज्जीवित करण्याची संधीच मिळत नाही. आज मानवता पृथ्वीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक उपभोग घेत आहे. हा अतिरिक्त उपभोग म्हणजेच तेविष आहे, जे पर्यावरणात कार्बन उत्सर्जन आणि कचऱ्याच्या रूपात विरघळत आहे. आता सर्वात मोठा प्रश्नहा आहे की, आजच्या काळातील हे विष पिणार कोण? आपण एखाद्या चमत्काराची प्रतीक्षा करायची का, की कोणीतरी येईल आणि आपण पसरवलेले हे प्रदूषण शोषून घेईल? विज्ञान आणि तंत्रज्ञानाला स्वतःच्या मर्यादा आहेत.जोपर्यंत आपण पृथ्वीच्या मर्यादेत राहून जगणार नाही आणि विष निर्माण करणे बंद करणार नाही, तोपर्यंत कोणतेही तंत्रज्ञान किंवा धोरण यशस्वी होऊ शकत नाही. आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या वाट्याचे थोडे थोडे हलाहल प्यावे लागेल. हे विष कोणत्याही पेल्यात नसून आपल्या जीवनशैलीत आहे. आपल्याला अधिक मिळवण्याची आपली लालसा आपल्या कंठातच रोखून धरावी लागेल, जेणेकरून ती पृथ्वीच्या खोलवर पोहोचणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या जबाबदारीचे हे विष पेईल,तेव्हाच येणाऱ्या पिढ्यांसाठी अमृत सुरक्षित राहील. आपल्याला हे मान्य करावे लागेल की, पृथ्वी मर्यादित आहे आणि ती नेहमीच मर्यादित राहील, मग आपले विज्ञान आणि आपली अर्थव्यवस्था कितीही प्रगती करो. वास्तवात,संसाधनांची कमतरता समजून घेणे मानवासाठी अत्यंतसहज आणि स्वाभाविक आहे. जेव्हा आपले उत्पन्न मर्यादित असते, तेव्हा आपण आपले खर्च आपोआपच मर्यादित करतो. जर आपल्याकडे ५ आसनी कार असेल, तर आपण त्यात दहा लोकांना बसण्यासाठी आमंत्रित करत नाही. आपण दररोज क्षमतेच्या आधारावर निर्णय घेतो, मग पृथ्वीच्या संदर्भात आपण हे मूलभूत सत्य का विसरतो? पृथ्वीचा आकार निश्चित आहे आणि तो काळानुसार किंवा तंत्रज्ञानानुसार वाढत नाही. तिची संसाधनेही मर्यादित आहेत. आपला उपभोग आणि मागणी सातत्याने वाढत चालली आहे आपण एका मर्यादित पृथ्वीवर राहत आहोत ही जाणीव होणे, हा समाधानाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. जेव्हा आपण आपल्या मर्यादा ओळखू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने निवारणाकडे वाटचाल करू शकू. येथे हे समजून घेणे देखील अनिवार्य आहे की, ही समस्या आपल्या सर्वांच्या उपभोग घेण्यामुळेच निर्माण झाली आहे, म्हणूनच समाधानाचा भागही आपल्या सर्वांनाच व्हावे लागेल. आपण आपल्या सवयी सुधारल्या आणि एखादी गोष्ट ‘परवडण्याची’ क्षमता असूनही निसर्गासाठी ती ‘टाळणे’ शिकलो, तर आपण या विषाचा प्रसार रोखू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



