
New Delhi : केवळ तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या महिलेलाच मातृत्व रजा घेण्याचा अधिकार आहे का, अशी विचारणा करीत अधिनियमातील तरतुदीबाबत तीन आठवड्यांत योग्य ते कारण स्पष्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयात मातृत्व लाभ अधिनियम १९६१ च्या तरतुदीला आव्हान देणारी जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार केवळ तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या महिलेलाच १२ आठवड्यांची मातृत्व रजा प्राप्त करण्याचा अधिकार आहे. या प्रकरणावर न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या. पंकज मिथल यांच्या खंडपीठात सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान संबंधित तरतूद सामाजिक कल्याण कायदा असून यात मुलाचे वय तीन महिन्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याबाबत कोणतेही वर्गीकरण केले नसल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.
यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात जर एखादी महिला तीन महिन्यांपेक्षा अधिक वयाचे मूल दत्तक घेत असेल तर ते दुरुस्ती अधिनियमाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही मातृत्व रजेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाही, असे स्पष्ट केले होते.
याचिकाकर्त्यांना उत्तराची प्रत देण्याचे निर्देश
दरम्यान, केंद्र सरकारकडून देण्यात येणारी उत्तराची एक प्रत याचिकाकर्त्याच्या वकिलांनाही देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या प्रकरणावर आता १७ डिसेंबर रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मातृत्व लाभ अधिनियम १९६१मधील कलम ५ (४) हा भेदभाव करणारा व मनमानी असल्याच्या आरोपावरून केंद्राकडे उत्तर मागितले होते.
|
|
केंद्र सरकारने तीन महिने वयाचे वर्गीकरण योग्य ठरवीत उत्तर सादर केले आहे. तथापि, सुनावणीदरम्यान अनेक मुद्दे समोर आले असून त्यावर विचार करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून योग्य उत्तराची अपेक्षा आहे. तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या महिलेलाच मातृत्व रजेचा अधिकार आहे की नाही, हा मुद्दा स्पष्ट व्हायला हवा.
याचिकेत काय…
‘कलम ५(४) हे मूल दत्तक घेणाऱ्या मातांविरुद्ध भेदभावपूर्ण आणि मनमानी असण्याव्यतिरिक्त, तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या अनाथ, परित्यक्त किंवा आत्मसमर्पण केलेल्या मुलांशीदेखील भेदभाव करते, जे मातृत्व लाभ कायद्याचे तसेच बाल न्याय कायद्याशी पूर्णपणे विसंगत आहे. मूल दत्तक घेतलेल्या मातांना १२ आठवड्यांचा मातृत्व लाभ हा केवळ ‘दिखाऊपणा’ नाही, तर जैविक मातांना प्रदान केलेल्या २६ आठवड्यांच्या प्रसूतीच्या फायद्यासोबत मूर्खपणाची तुलनादेखील आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



