नाशिक: मृत्यू अटळ असला तरी त्यातूनही इतरांना नवजीवन देण्याची ताकद 'अवयवदानात' असते, याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. एका १४ वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर, दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या त्याच्या कुटुंबाने अत्यंत धाडसी निर्णय घेत मुलाचे अवयव दान केले. या निर्णयामुळे अनेकांना नवे आयुष्य मिळाले असून, या आदिवासी कुटुंबाच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
बागलाण तालुक्यातील गोलवाड येथील विकास यशवंत महाले (वय १४) हा तरुण एका दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सटाणा आणि त्यानंतर नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तीन दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र त्याच्या मेंदूला झालेली दुखापत अत्यंत गंभीर होती. अखेर वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी विकासला 'ब्रेन डेड' घोषित केले.
असह्य वेदनेतही घेतला धाडसी निर्णय
आपला मुलगा आता कधीच डोळे उघडणार नाही, हे सत्य पचवणे कोणत्याही आई-वडिलांसाठी कठीण असते. मात्र, अशा कठीण प्रसंगी रुग्णालयातील अवयवदान समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांनी विकासच्या कुटुंबाला अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. "माझा मुलगा दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहील," हा विचार करून या कुटुंबाने आपल्या लाडक्या मुलाचे अवयव दान करण्यास संमती दिली.
ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवयवांचे वहन
शुक्रवारी रात्री उशिरा अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली. विकासचे दोन मूत्रपिंड (Kidneys) आणि यकृत (Liver) 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करून तातडीने पुणे येथील विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले. याव्यतिरिक्त त्याचे दोन्ही डोळे नाशिकमधील नेत्रपेढीत आणि त्वचा त्वचापेढीत दान करण्यात आली.
समाजासमोर आदर्श
या संपूर्ण प्रक्रियेत पोलीस प्रशासन, वैद्यकीय पथके आणि मविप्र संस्थेचे पदाधिकारी अहोरात्र झटत होते. एका ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबाने विज्ञानाची कोणतीही मोठी पदवी नसताना दाखवलेला हा समजूतदारपणा आणि माणुसकी समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे. विकासने जगाचा निरोप घेतला असला तरी, त्याच्या अवयवांच्या रूपात तो आता पाच ते सहा व्यक्तींमध्ये जिवंत राहणार आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



