
Mumbai : मुंबई आणि नाशिक या दोन शहराचा प्रवास आता मुंबई-पुण्यासारखाच होणार आहे. कारण, कसारा-मनमाड या दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. १३१ किमी लांबीच्या या रेल्वे प्रकल्पासाठी १० हजार १५४ कोटींचा खर्च होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि नाशिक या दरम्यान प्रवास वेगात करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत होते. याला आता अखेर वेग आलाय. लवकरच या कामाला सुरूवात होऊ शकते.
कसारा-मनमाड या रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्यात यावी, अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. कसारा-इगकपुरी यादरम्यान रेल्वेला मार्गस्थ करताना अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. पण तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज लागणार नाही. काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक आणि मुंबई या दोन शहरातील प्रवास अधिक वेगाने होणार आहे. त्याशिवाय लोकल धावण्याचा मार्गाही मोकळा होईल. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि उत्तर-पूर्व भारत यामधील प्रवासही वेगात होईल, असे सांगितले जातेय.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मनमाड-कसारा यादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजूरी मिळाल्याची माहिती दिली. मुंबई-नाशिक हा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आणि मुंबईला उत्तर भारताशी जोडण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. कसारा घाटातील हा आव्हानात्मक प्रकल्प आहे. मनमाड-कसारा १३१ किमीचा लांबीचा प्रकल्प ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून जातोय.
मनमाड-कसारा १३१ किलोमीटर लांबीचा प्रकल्प पुढील ५ वर्षात सुरू पूर्ण कऱण्याचा प्लान सरकारने आखला आहे. या प्रकल्पात ३ महत्त्वाचे पूल, १६ मोठे पूल, २१८ लहान पूल, ५ रेल्वे उड्डाणपूल, २१ भुयारी मार्ग आणि ५ बोगद्यांचा समावेश आहे. यातील सर्वात मोठा बोगदा हा २४ किमीचा आहे. इगतपुरी-कसारा यादरम्यान घाटातून प्रवास करण्यासाठी रेल्वेला अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. पण भुयारी आणि बोगद्याचे काम झाल्यास या अतिरिक्त बॅकिंगची गरज लागणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
कसारा-मनमाड रेल्वेमार्ग क्षमतेमुळे वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि भारतीय रेल्वेच्या सेवेची विश्वासार्हतादेखील वाढेल. या बहुमार्गी प्रकल्पांचा उद्देश रेल्वेच्या कामात सुसूत्रता आणणे व वाहतूक कोंडी कमी करणे हा आहे. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या संकल्पनेशी निगडीत आहेत. या प्रकल्पांमुळे त्या भागात सर्वसमावेशक विकास होईल आणि नागरिक आत्मनिर्भर होतील तसेच रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, असे वैष्णव म्हणाले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



