
Mumbai : इराण युद्धामुळे पश्चिम आशिया तसेच आखाती देशांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरवठा साखळी खंडित झाली असून याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींत वाढ झाल्याने स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना घरगुती वापराच्या सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्यास सांगितलं असल्याने त्याचा परिणाम मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना जाणवू लागला आहे.
व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ज्या हॉटेलांकडे सिलिंडरचा साठा नव्हता अशी जवळपास २० टक्के उपहारगृहे सोमवारपासूनच बंद असल्याचे निदर्शनास आले. ही परिस्थिती कायम राहिल्यास आज, मंगळवारपासून ७० ते ८० टक्के उपहारगृहे बंद होतील असा अंदाज 'आहार इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन' या संघटनेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
'आहार' संघटनेशी आठ हजार हॉटेले, रेस्तराँ, फाइन डाइन, कॅफेटेरिया संबंधित आहेत. यातील मुंबईतील अनेक हॉटेल सोमवारीच सिलिंडर पुरवठ्याशिवाय बंद झाल्याची माहिती 'आहार'चे २०२५-२६ चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिली.
'आहार' ही राज्यभरातील ६६ हॉटेल असोसिएशनची पालक संस्था आहे. या सगळ्याच संस्था घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्याच्या निर्बंधांना तोंड देत असून यावर सध्या तरी कोणताही उपाय नसल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेल व्यवसायावर चार लाख लोक थेट उपजीविकेसाठी अवलंबून आहेत.
पुण्यातही युद्धाची धग हॉटेलच्या चुलींना
पश्चिम आशियात भडकलेल्या युद्धाची धग थेट पुण्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या भटारखान्यात पोहोचली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद केला आहे. त्याचा सर्वांत मोठा फटका आदरातिथ्य व्यवसायाला बसणार आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे चॅप्टरचे अजिंक्य उडाणे म्हणाले, ‘व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा आहे. रेस्टॉरंट व हॉटेल उद्योग पूर्णपणे एलपीजीवर अवलंबून आहे. मात्र, तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद केल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. गॅस एजन्सींकडे केवळ एक ते दोन दिवस वितरण करता येईल, एवढाच सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेने पेट्रोलियम मंत्रालयाकडे निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही.
ऑल इंडिया गॅस वितरक संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण खंडाळकर म्हणाले, ‘तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. केवळ घरगुती ग्राहकांनाच एलपीजी सिलिंडर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घरगुती ग्राहकांना केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात सोमवारीही अनेक ग्राहकांनी गॅस एजन्सींच्या कार्यालयात गर्दी केली होती.’ दरम्यान, गॅस बुकिंग यंत्रणा विस्कळित असल्याच्या तक्रारी ग्राहक करत होते.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



