
Mumbai : इराण युद्धामुळे पश्चिम आशिया तसेच आखाती देशांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरवठा साखळी खंडित झाली असून याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींत वाढ झाल्याने स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना घरगुती वापराच्या सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्यास सांगितलं असल्याने त्याचा परिणाम मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना जाणवू लागला आहे.
व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ज्या हॉटेलांकडे सिलिंडरचा साठा नव्हता अशी जवळपास २० टक्के उपहारगृहे सोमवारपासूनच बंद असल्याचे निदर्शनास आले. ही परिस्थिती कायम राहिल्यास आज, मंगळवारपासून ७० ते ८० टक्के उपहारगृहे बंद होतील असा अंदाज 'आहार इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन' या संघटनेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
'आहार' संघटनेशी आठ हजार हॉटेले, रेस्तराँ, फाइन डाइन, कॅफेटेरिया संबंधित आहेत. यातील मुंबईतील अनेक हॉटेल सोमवारीच सिलिंडर पुरवठ्याशिवाय बंद झाल्याची माहिती 'आहार'चे २०२५-२६ चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिली.
'आहार' ही राज्यभरातील ६६ हॉटेल असोसिएशनची पालक संस्था आहे. या सगळ्याच संस्था घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्याच्या निर्बंधांना तोंड देत असून यावर सध्या तरी कोणताही उपाय नसल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेल व्यवसायावर चार लाख लोक थेट उपजीविकेसाठी अवलंबून आहेत.
पुण्यातही युद्धाची धग हॉटेलच्या चुलींना
पश्चिम आशियात भडकलेल्या युद्धाची धग थेट पुण्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या भटारखान्यात पोहोचली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद केला आहे. त्याचा सर्वांत मोठा फटका आदरातिथ्य व्यवसायाला बसणार आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे चॅप्टरचे अजिंक्य उडाणे म्हणाले, ‘व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा आहे. रेस्टॉरंट व हॉटेल उद्योग पूर्णपणे एलपीजीवर अवलंबून आहे. मात्र, तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद केल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. गॅस एजन्सींकडे केवळ एक ते दोन दिवस वितरण करता येईल, एवढाच सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेने पेट्रोलियम मंत्रालयाकडे निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही.
ऑल इंडिया गॅस वितरक संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण खंडाळकर म्हणाले, ‘तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. केवळ घरगुती ग्राहकांनाच एलपीजी सिलिंडर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घरगुती ग्राहकांना केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात सोमवारीही अनेक ग्राहकांनी गॅस एजन्सींच्या कार्यालयात गर्दी केली होती.’ दरम्यान, गॅस बुकिंग यंत्रणा विस्कळित असल्याच्या तक्रारी ग्राहक करत होते.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




