
Pune : ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक ढोल-ताशा-झांज पथकातील वादकांची संख्या ३० एवढीच मर्यादित ठेवण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. ढोल-ताशा हे पुण्याचे हृदय असून, पथकांना त्यांचे वादन करू द्या, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामुळे ‘एनजीटी’च्या आदेशामुळे ढोल-ताशांचा बसलेला ‘आव्वाज’ पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.
गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी अॅड. मैत्रेय घोरपडे यांनी ‘एनजीटी’त याचिका दाखल केली होती. ही याचिका ३० ऑगस्टला निकाली काढताना ‘एनजीटी’ने ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवर नियंत्रण आणले होते. विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक ढोल-ताशा-झांज पथकातील वादकांची संख्या तीसपेक्षा जास्त नसावी, या नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांनी ढोल-ताशा-झांज ही वाद्ये जप्त करावी, असे निर्देश ‘एनजीटी’ने दिले होते. त्याविरोधात पुण्यातील वंदे मातरम संघटनेच्या युवा वाद्य पथक ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अनिश पाडेकर यांनी अॅड. अमित पै व अॅड. तेजस दंडगव्हाळ यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.
|
Alibaug : रायगड रोह्यातील साधना कंपनी स्फोट: २ कामगारांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी |
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर दुपारी दोन वाजता या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. ‘पुण्यात ढोल-ताशा वादनाचे शंभर वर्षांहून अधिक काळापासून मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव जवळ आला असताना, ढोल-ताशा पथकांची कोणतीही बाजू ऐकून न घेता ‘एनजीटी’ने हा आदेश दिला असून, ढोल-ताशा-झांज वादन करणाऱ्या पथकांवर त्याचा गंभीर परिणाम होईल,’ अशी बाजू अॅड. अमित पै यांनी मांडली. त्यावर, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व पुणे प्रशासनाला नोटीस काढण्याचा आदेश दिला; तसेच, ढोल-ताशा-झांज पथकातील वादकांची संख्येवर मर्यादा आणणाऱ्या ‘एनजीटी’च्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. या प्रकरणी आता चार ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
‘वाजवायची अन् गाजवायची संधी’
‘सर्वोच्च न्यायालयाने ‘एनजीटी’च्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे ढोल-ताशा पथकांना यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजवायची अन् गाजवायची संधी मिळाली आहे. गणेशोत्सवात ढोल-ताशा वादनाची अनेक वर्षांची परंपरा असताना ‘एनजीटी’चा निकाल लागू करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयापुढे आमची बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे,’ असे ‘ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र’चे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले.
पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच एक नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार एका पथकात ४० ढोल आणि १० ताशांना परवानगी आहे. त्याची अंमलबजावणी काही वर्षांपासून होत असून, यंदा तीच नियमावली कायम असेल.
ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘एनजीटी’ने आपल्या आदेशात नऊ निर्देश दिले आहेत. त्यापैकी केवळ ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवर मर्यादा आणण्याच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. अन्य आठ निर्देशांचे पालन करावे लागेल.
ढोल-ताशा हा महाराष्ट्राचा खोलवर रुजलेला सांस्कृतिक वारसा असून, तो गणेशोत्सवाचा अविभाज्य घटक आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवात ‘एनजीटी’ने ढोल-ताशा पथके व गणेश मंडळांची बाजू न ऐकता, थेट वादकांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय दिला होता.
शहर
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्र
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




