
Mumbai : चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याएवढे देशातील नागरिक मूर्ख वाटतात का ? सर्जनशील, काल्पनिक स्वातंत्र्याचे काय ? अशी प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावत हिच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या निमित्ताने गुरूवारी सेन्सॉर मंडळाला केली. तसेच, या चित्रपटाला प्रदर्शन प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करण्याच्या मंडळाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली व आठवडाभरात या प्रकरणावर निर्णय घेण्याचे आदेश दिले.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीपोटी सेन्सॉर मंडळ वैयक्तिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार देऊ शकत नाही. चित्रपट प्रदर्शनाबाबत सेन्सॉर मंडळाला निर्णय घ्यावाच लागेल. परंतु, चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही, असे मंडळाचे म्हणणे असेल तर त्याबाबतचे योग्य ते स्पष्टीकरण पुढील सुनावणीपर्यंत देण्याचे न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने सेन्सॉर मंडळाला बजावले.
|
Mumbai : “२२० वर्ष जुनी एशियाटिक सोसायटी ताब्यात घ्या”, कर्मचाऱ्यांची मोदी सरकारकडे मागणी! |
तत्पूर्वी, चित्रपटाबाबतच्या अंतिम निर्णयासाठी सेंन्सॉर मंडळाच्या अध्यक्षांनी हा चित्रपट फेरविचार समितीकडे पाठवला असल्याची माहिती मंडळाच्या वतीने वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला दिली. चित्रपटात धार्मिक भावना चिथवणारी काही दृश्य आणि संवाद आहेत. त्यामुळे, समाजात गोंधळ, अराजकता निर्माण होऊ शकते. म्हणूनच, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत समितीकडून अद्यापही विचारविनिमय सुरू असल्याचे मंडळातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र, हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे, ऑक्टोबरपूर्वी चित्रपट प्रदर्शित होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचा दावा चित्रपटाचे सहनिर्माते झी एंटरटेनमेंटच्या वतीने वरिष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी केला. त्यावर, मंडळाने न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचे पालन केलेले नाही आणि फक्त एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे प्रकरण वर्ग केले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याच्या निष्कर्षावर येणे हे मंडळाचे काम नाही, ते काम राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचे आहे, अशा शब्दात न्यायालयाने सेन्सॉर मंडळाची कानउघाडणी केली.
दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला शिरोमणी अकाली दलासह शीख संघटनांनी आक्षेप घेतला त्यातच, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शीख समुदायाचे आक्षेप विचारात घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे, चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



