
Mumbai: सलग दोन पराभव, तसेच अजूनही गुणफलकात नावासमोर भोपळा असे हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सचे अस्तित्व उद्या घरच्या मैदानावरच पणास लागणार आहे. एकीकडे हे आव्हान असताना आणि दुसरीकडे हार्दिक पंड्याविरुद्ध मुंबईकर प्रेक्षक हा सामना तेवढाच चर्चेचा विषय ठरणार आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईचा संघ उद्या वानखेडेवर म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेत नवी उभारी घेण्यासाठी मुंबईला विजय आवश्यकच आहे. सर्व खेळाडूंचा कस पणास लागेलच, पण कर्णधार हार्दिक पंड्यासाठी अस्तित्व पणास लागणारी परिस्थिती आहे.
खेळाडू म्हणून कामगिरी उंचावणे, कर्णधार म्हणून संघाला पहिला विजय मिळवून देणे यापेक्षा स्टेडियममधून होणाऱ्या विरोधाचा सामना करणे हे हार्दिकसाठी सर्वात आव्हानात्मक असू शकेल.
|
Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगर मनपाची 182 कोटीची विक्रमी कर वसुली |
रोहित शर्माला बाजूला करून हार्दिकला मिळालेले मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद मुंबई संघाच्या पाठीराख्यांना पटलेले नाही. गुजरात संघातून दूर झाल्यामुळे गुजरात संघाचे पाठीराखे दुखावले आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिकला दोन्हीकडच्या पाठीराख्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यातही तेथील प्रेक्षक रोहित...रोहित...असा नारा देत होते.
मुंबई संघटनेचे स्पष्टीकरण
मुंबईत उद्या होणाऱ्या सामन्यात हार्दिकला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो. याची कल्पना मुंबई इंडियन्स संघालाही आहे. हार्दिकला विरोध करणाऱ्या घोषणा दिल्या किंवा शेरेबाजी केली तर त्यांना पकडण्यात येईल आणि त्यासाठी स्टेडियममध्ये अतिरित्त पोलिस तैनात करण्यात येतील, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते; परंतु ही अफवा आहे.
यावर कोणी विश्वास ठेऊ नये, असे मुंबई क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सुरक्षा असेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सामना एका बाजूला आणि हार्दिकला होत असलेला विरोध दुसऱ्या बाजूला असे चित्र उद्या वानखेडेवर असण्याची शक्यता आहे.
गोलंदाजीत बदल आवश्यक
मुंबई इंडियन्स संघात खरे तर नावाजलेले गोलंदाज आहेत; परंतु बुमराचा अपवाद वगळता इतर सर्वांनी साफ निराशा केली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १८ वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा युवक गोलंदाज क्वेना एमफाका याला संधी देण्यात आली, पण त्याची भलतीच धुलाई झाली होती. मात्र गत स्पर्धेत बुमरा नसतानाही धुरा सांभाळणाऱ्या आकाश मधवाल याचा विचार करण्यात आलेला नाही. हैदराबादविरुद्ध २७७ धावांची लूट झाल्यानंतर उद्या गोलंदाजीत बदल अपेक्षित आहेत.
दुसऱ्या बाजूला राजस्थान संघाने दोनही सामने जिंकलेले असल्यामुळे ते विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी प्रयत्नशील असणारच. यशस्वी जयस्वाल घरच्या मैदानावर खेळणार आहे, तर रियान परागचा वेगळा अवतार सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांना सावधच रहावे लागणार आहे.
बुमराद्वारे आक्रमण?
इतर संघांविरुद्ध अडखळणाऱ्या, परंतु मुंबईविरुद्ध २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारणाऱ्या हैदराबाद संघाने कागदावर बलवान असलेल्या मुंबई गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. यात ज्याची क्रिकेट विश्वात धास्ती घेतली जाते त्या जसप्रित बुमराचे अस्त्र आपल्या भात्यात असताना त्याचा वापरच योग्य वेळी न करण्याच्या कर्णधार म्हणून हार्दिकच्या डावपेचांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिल्या १३ षटकांत बुमराला केवळ एकच षटक देण्यात आले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत बुमराद्वारे आक्रमण सुरू केले जाण्याची शक्यता आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



