
Mumbai: सलग दोन पराभव, तसेच अजूनही गुणफलकात नावासमोर भोपळा असे हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सचे अस्तित्व उद्या घरच्या मैदानावरच पणास लागणार आहे. एकीकडे हे आव्हान असताना आणि दुसरीकडे हार्दिक पंड्याविरुद्ध मुंबईकर प्रेक्षक हा सामना तेवढाच चर्चेचा विषय ठरणार आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईचा संघ उद्या वानखेडेवर म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेत नवी उभारी घेण्यासाठी मुंबईला विजय आवश्यकच आहे. सर्व खेळाडूंचा कस पणास लागेलच, पण कर्णधार हार्दिक पंड्यासाठी अस्तित्व पणास लागणारी परिस्थिती आहे.
खेळाडू म्हणून कामगिरी उंचावणे, कर्णधार म्हणून संघाला पहिला विजय मिळवून देणे यापेक्षा स्टेडियममधून होणाऱ्या विरोधाचा सामना करणे हे हार्दिकसाठी सर्वात आव्हानात्मक असू शकेल.
|
Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगर मनपाची 182 कोटीची विक्रमी कर वसुली |
रोहित शर्माला बाजूला करून हार्दिकला मिळालेले मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद मुंबई संघाच्या पाठीराख्यांना पटलेले नाही. गुजरात संघातून दूर झाल्यामुळे गुजरात संघाचे पाठीराखे दुखावले आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिकला दोन्हीकडच्या पाठीराख्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यातही तेथील प्रेक्षक रोहित...रोहित...असा नारा देत होते.
मुंबई संघटनेचे स्पष्टीकरण
मुंबईत उद्या होणाऱ्या सामन्यात हार्दिकला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो. याची कल्पना मुंबई इंडियन्स संघालाही आहे. हार्दिकला विरोध करणाऱ्या घोषणा दिल्या किंवा शेरेबाजी केली तर त्यांना पकडण्यात येईल आणि त्यासाठी स्टेडियममध्ये अतिरित्त पोलिस तैनात करण्यात येतील, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते; परंतु ही अफवा आहे.
यावर कोणी विश्वास ठेऊ नये, असे मुंबई क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सुरक्षा असेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सामना एका बाजूला आणि हार्दिकला होत असलेला विरोध दुसऱ्या बाजूला असे चित्र उद्या वानखेडेवर असण्याची शक्यता आहे.
गोलंदाजीत बदल आवश्यक
मुंबई इंडियन्स संघात खरे तर नावाजलेले गोलंदाज आहेत; परंतु बुमराचा अपवाद वगळता इतर सर्वांनी साफ निराशा केली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १८ वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा युवक गोलंदाज क्वेना एमफाका याला संधी देण्यात आली, पण त्याची भलतीच धुलाई झाली होती. मात्र गत स्पर्धेत बुमरा नसतानाही धुरा सांभाळणाऱ्या आकाश मधवाल याचा विचार करण्यात आलेला नाही. हैदराबादविरुद्ध २७७ धावांची लूट झाल्यानंतर उद्या गोलंदाजीत बदल अपेक्षित आहेत.
दुसऱ्या बाजूला राजस्थान संघाने दोनही सामने जिंकलेले असल्यामुळे ते विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी प्रयत्नशील असणारच. यशस्वी जयस्वाल घरच्या मैदानावर खेळणार आहे, तर रियान परागचा वेगळा अवतार सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांना सावधच रहावे लागणार आहे.
बुमराद्वारे आक्रमण?
इतर संघांविरुद्ध अडखळणाऱ्या, परंतु मुंबईविरुद्ध २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारणाऱ्या हैदराबाद संघाने कागदावर बलवान असलेल्या मुंबई गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. यात ज्याची क्रिकेट विश्वात धास्ती घेतली जाते त्या जसप्रित बुमराचे अस्त्र आपल्या भात्यात असताना त्याचा वापरच योग्य वेळी न करण्याच्या कर्णधार म्हणून हार्दिकच्या डावपेचांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिल्या १३ षटकांत बुमराला केवळ एकच षटक देण्यात आले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत बुमराद्वारे आक्रमण सुरू केले जाण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



