
Mumbai : धारावी पुनर्वसनासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अपात्र रहिवाशांसाठी भाडेतत्वावरील घरांच्या निर्मितीसाठी धारावीबाहेरील जागा रेडीरेकनरच्या २५ टक्के दरात अदानी समुहाला दिल्या जात असून यातून अदानी समुहाला कोट्यवधीचा फायदा होणार असल्याचा आरोप ‘लोक चळवळी’ने केला आहे. एकूणच धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीच्या फायद्यासाठी अनेक नियमांचे उल्लंघन करू एक मोठा जमीन गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप लोक ‘चळवळी’ने केला आहे. ‘लोक चळवळी’ने नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवविले असून या पत्राद्वारे कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेच्या हस्तांतरणासह रेडीरेकनरच्या २५ टक्के दरात जमिनी देण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी धारावी पुनर्विकासाचे कंत्राटही रद्द करण्याची मागणी आता ‘लोक चळवळी’ने केली आहे.
अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एनएमडीपीएल) मोठ्या प्रमाणावर धारावीबाहेरील जागेची मागणी करण्यात आली आहे. करारानुसार कंत्राटदाराने अर्थात एनएमडीपीएलने जागा शोधायची, जागा खरेदीसाठीची रक्कम अदा करायची आणि ही रक्कम विक्री घटकातील घरांच्या विक्रीतून वसूल करणे आवश्यक आहे. जमीन मात्र डीआरपीच्या नावावर असेल. असे असताना कंत्राटदाराला अर्थात अदानी समुहाला धारावीबाहेरील जमिनी रेडीरेकनरच्या २५ टक्के दरात देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
|
|
या निर्णयामुळे महागड्या जमिनी अगदी कमी किंमतीत एनएमडीपीएल अर्थात अदानीला कवडीमोल दरात दिल्या जात आहेत. यातून अदानी समुहाला कोट्यवधींचा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे विक्री घटकातूनही अदानीला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. पण त्याचवेळी राज्य सरकारचे नुकसान होणार आहे. सरकारच्या जमिनी कवडीमोल दरात दिल्या जाणार असल्याने सरकारला नुकसान होत असल्याचा आरोप लोक चळवळीने केला आहे. याच आरोपाच्या अनुषंगाने ‘लोक चळवळी’ने नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून धारावीबाहेरील जमिनी देण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी केल्याची माहिती ‘लोक चळवळी’चे किरण पैलवान यांनी दिली. या पत्रात पुनर्विकासासंबंधीच्या अनेक निर्णयांवर आक्षेप घेण्यात आला आहे.
अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर घरे देण्यासाठी जागा दिली जात आहे. मात्र अपात्र किती, किती जणांना धारावीबाहेर घरे द्यावी लागतील यासंबंधीचे सर्वेक्षण पूर्ण झाले नसताना जमिनी देण्याचा सपाटा लावण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करीत पैलवान यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रासोबत अनेक पुरावेही जोडल्याचे पैलवान यांनी सांगितले. कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेचे हस्तांतरण बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एकूणच धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, पुनर्विकासाचे कंत्राटच रद्द करावे, अशी मागणी पैलवान यांनी केली. तसेच मदर डेअरीच्या जागेच्या हस्तांतरणासह रेडीरेकनरच्या दराच्या २५ टक्के दरात जमिनी देण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, याविषयी एनएमपीडीपीएलला विचारले असता रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही






























Subscribe to my channel




