
Mumbai : भारत आणि मालदीवचे संबंध मागील काही काळात ताणले गेले आहेत. भारतासोबतच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये मालदीव चीनला (China) समर्थन करताना दिसत आहे. चीनची पाठराखण करणाने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांचं सरकार सध्या संकटात सापडल्याचं समोर आलं आहे. भारताकडून मालदीव सैन्याला दान केलेले तीन विमान उडवण्यासाठी कुणी पात्र नसल्याचं समोर आलं आहे. खुद्द मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांनी हे मान्य केलं आहे. भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी मालदीवकडे सध्या सक्षम वैमानिक नसल्याची कबुली संरक्षण मंत्री घसान मौमून यांनी दिली आहे.
भारतीय जवानांनी मालदीव सोडल्यानंतरची परिस्थिती
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांचं सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी चीनला समर्थन करत भारतीय सैन्य माघारी धाडलं. मोहम्मद मुइज्जू यांच्या आदेशानंतर 76 भारतीय संरक्षण कर्मचारी मालदीव सोडून मायदेशी परतले आहेत. त्यानंतर मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांचं हे मोठं वक्तव्य समोर आलं आहे. मालदीवच्या राष्ट्रपतींनी 10 मे 2024 पर्यंत मालदीवमधील तीन विमानचालन प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या सर्व भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याची भूमिका घेतल्यानंतर भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
|
|
भारतीय सैन्याने मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान दिलं होतं. मात्र, भारताने दिलेली विमाने चालवण्यासाठी मालदीवकडे पात्र वैमानिक नाहीत. राष्ट्रपती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान 11 मे रोजी, शनिवारी, मालदीवचे संरक्षण मंत्री घसान मौमून यांनी हे सांगितलं आहे. मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिक माघारी परतल्यानंतर पुन्हा भारतीय सैनिकांच्या आगमनासंबंधी प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
मालदीवकडे विमान चालवण्यासाठी पात्र वैमानिक नाही
मालदीवच्या संरक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सकडे (MNDF) एकही लष्करी कर्मचारी नाही, जो भारतीय लष्कराने दान केलेली तीन विमाने चालवू शकेल. काही सैनिकांना आधीच्या सरकारांच्या करारांतर्गत विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
संरक्षण मंत्री घसान मौमून काय म्हणाले?
मालदीवचे संरक्षण मंत्री घसान मौमून म्हणाले, विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते, ज्यासाठी वैमानिकांनी विविध टप्पे पार करणे आवश्यक होते. अनेक कारणांमुळे आमचे सैनिक ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे सध्याच्या स्थिती आपल्या लष्करी दलात अशी एकही व्यक्ती नाही, ज्याच्याकडे भारताने दिलेले दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमान उडवण्याचा परवाना आहे किंवा ज्याच्याकडे उड्डाणाचे पूर्ण प्रशिक्षण आहे. त्यामुळे सध्या भारताने दिलेली विमाने मालदीव वापरु शकत नाही, असं घसान मौमून यांनी म्हटल्याचं वृत्त 'Adhadhoo.com' या न्यूज पोर्टलने दिलं आहे.
शहर
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
- पुणे: साडेसात सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेलेली ७३ वर्षीय महिला नदीपात्रात मृदअवस्थेत आढळली; काही तासांतच मृतदेहाची पटली ओळख
- शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर
महाराष्ट्र
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- ठाणे: भिवंडीत इमारत दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, तर डोंबिवलीतील गुन्हेगारी आणि नवी मुंबईतील ड्रग्स कारवाईमुळे खळबळ
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




